AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी पंतप्रधान टीव्हीवर भाषणबाजी करताहेत’, ममता बॅनर्जींचा घणाघात

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे (Mamta Banerjee slams PM Narendra Modi).

'शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी पंतप्रधान टीव्हीवर भाषणबाजी करताहेत', ममता बॅनर्जींचा घणाघात
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 25, 2020 | 10:14 PM
Share

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान निधी योजनेचे पैसे दिले जात नसल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. या आरोपांना मतात बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मिटवण्याऐवजी मोदी लोकांची दिशाभूल करत आहेत. ते बंगालची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत”, अशा शब्दात ममता बॅनर्जींनी पलटवार केला (Mamta Banerjee slams PM Narendra Modi).

“नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी देशभरातील लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. हे कायदे शेतकरी विरोधी आहेत. कारण ते एमएसपी, राज्य खरेदी प्रणाली आणि संरक्षक यंत्रणा काढून टाकण्याची मागणी करतात. पंतप्रधान शेतकऱ्यांचे विषय सोडवण्याऐवजी टीव्हीवर चिंता व्यक्त करत आहेत”, असा टोला त्यांनी लगावला.

“त्यांनी पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना मदत करण्याचा इरादा जाहीरपणे व्यक्त केला आहे. दुसरीकडे त्यांनी राज्य सरकार सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. ते अर्धवट माहिती आणि विकृत तथ्य सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे”, असं मत ममता यांनी मांडली.

“मी शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार्य करण्यास तयार आहे. मी स्वतः त्यांना दोनवेळा पत्र लिहिलं आहे. दोन दिवसांपूर्वी संबंधित मंत्र्यांशी बोलले आहे, पण राजकीय फायद्यासाठी ते सहकार्य करण्यास नकार देत आहेत. दुसरीकडे चुकीचा प्रसार करत आहेत”, असं ममता म्हणाल्या (Mamta Banerjee slams PM Narendra Modi).

“भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकार नियमांचं उल्लंघन करुन राजकारण करत आहे. केंद्र सरकारने बंगालच्या मदतीसाठी काहीच केलं नाही. जीएसटीचे आतापर्यंतची साडेआठ हजार कोटी रुपयांचे पैसे दिलेले नाहीत. केंद्र सरकारने राज्यांना निदान त्यांच्या हक्काचा निधी द्यायला हवा जेणेकरुन राज्यांमधील सुविधांसाठी तो पैसा वापरता येईल. त्यांनी पैसे दिले तर बंगालच्या लोकांसाठी सगळं करु जे केंद्र सरकार “, अशी भूमिका ममता बॅनर्जी यांनी मांडली.

हेही वाचा : भाजपची हुकूमशाही, ईडी दाखवली तर आता सीडीही निघणार, अमोल मिटकरींचा इशारा

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...