AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता एवढंच ऐकायचं बाकी होतं… म्हणे, मांस खाल्ल्याने… आयआयटीच्या डायरेक्टरने तोडले तारे

आयआयटी मंडीचे डायरेक्टर लक्ष्मीधर बेहरा एका वेगळ्याच वादात अडकले आहेत. त्यांनी वादग्रस्त विधान केल्याने त्यावर देशभरातून टीका होत आहे. विशेष म्हणजे बेहरा यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधान केलं होतं.

आता एवढंच ऐकायचं बाकी होतं... म्हणे, मांस खाल्ल्याने... आयआयटीच्या डायरेक्टरने तोडले तारे
Laxmidhar BeheraImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 08, 2023 | 8:33 AM
Share

मंडी | 8 सप्टेंबर 2023 : भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी ठरली आहे. भारताने चंद्रावर पाऊल ठेवून आपण विज्ञानक्षेत्रात मोठी गरूड झेप घेतल्याचं जगाला दाखवून दिलं आहे. एकीकडे भारत विज्ञानक्षेत्रात मोठी प्रगती करत असतानाच दुसरीकडे आयआयटी सारख्या महत्त्वाच्या संस्थांमधील प्रमुख लोकच काहीही बरळताना दिसत आहेत. आयआयटीचे संचालक प्रा. लक्ष्मीधर बेहरा यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांचीच कान टवकारले आहेत. एवढेच नव्हे तर बेहरा यांचं हे विधान विज्ञानाला अजिबात धरून नसल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. असा व्यक्ती आयआयटीच्या प्रमुखपदावर कसा? असा सवालही या निमित्ताने व्यक्त केला जात आहे.

आयआयटीच्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. लक्ष्मीधर बेहरा यांनी हे विधान केलं आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे याची माहिती मिळाली नाही. पण बेहरा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. बेहरा यांच्या या व्हिडीओवर आयआयटीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कारण हिमाचल प्रदेशात काही दिवसांपूर्वी प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे हिमाचलमध्ये मोठ्या प्रमाणावर भुस्खलन झालं. त्यामुळे घरेदारे आणि इमारती कोसळल्या आहेत.

काय म्हणाले बेहरा

लक्ष्मीधर बेहरा हे आयआयटी मंडीचे संचालक आहेत. या व्हिडीओत ते विद्यार्थ्यांना मांस न खाण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. हिमाचल प्रदेशात लोक जनावरांना मारून त्यांचं मांस खात आहे. त्यामुळेच हिमाचलमध्ये भुस्खलन होत आहे. नैसर्गिक प्रकोप होत असल्याचा दावा बहेरा यांनी केला आहे. लोकांना जर चांगला माणूस बनायचं असेल तर त्याने मांस खाणे बंद केलं पाहिजे, असं आवाहन करतानाच बेहरा हे यावेळी विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ देतानाही दिसत आहेत. प्राण्यांची हत्या करणं निसर्गाच्या विरुद्ध आहे. प्राण्यांची हत्या होत असल्यानेच हिमाचलमध्ये ढगफुटी होत आहे, असे तारेही त्यांनी तोडले आहेत.

काहीच माहिती नाही

या व्हिडीओबाबत आयआयटी मंडीच्या मीडिया सेलशी चर्चा करण्यात आली. पण बेहरा यांनी कोणत्या कार्यक्रमात हे विधान केलं ते माहीत नसल्याचं मीडिया सेलचं म्हणणं आहे. मांस न खाण्याचा सल्ला बेहरा यांनी दिला आहे. ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, असंही मीडिया सेलचं म्हणणं आहे.

यापूर्वीही वादात

आयआयटीचे डायरेक्टर बेहरा हे भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत. मंडी डायरेक्टर म्हणून येण्यापूर्वी त्यांचा एक व्हीडीओ व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी आपल्या घरातून भूत पळवून लावल्याचा दावा केला होता. चेन्नईतील एका मित्राच्या घरातून मंत्रोच्चार करून भूत पळवून लावल्याचाही त्यांचा दावा होता. त्यांनी आपण भूतप्रेतांवर विश्वास ठेवत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे ते वादात सापडले होते.

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण.
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक.
आई देव पाण्यात ठेवून... हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया
आई देव पाण्यात ठेवून... हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया.
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?.
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर.
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान.
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने...
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने....
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी.
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!.
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?.