AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Underwater Metro : डोळ्याचं पारणं फिटणार! लवकरच पाण्याखाली धावेल मेट्रो, या राज्यात पहिला प्रयोग

Underwater Metro : भारतातही पाण्याखाली लवकरच मेट्रो धावणार आहे. या मेट्रो ट्रेनची लवकरच चाचणी होणार आहे. पाण्याखालून प्रवासाची पर्वणी लवकरच नागरिकांना मिळेल.

Underwater Metro : डोळ्याचं पारणं फिटणार! लवकरच पाण्याखाली धावेल मेट्रो, या राज्यात पहिला प्रयोग
| Updated on: Apr 08, 2023 | 8:17 PM
Share

नवी दिल्ली : लंडन-पॅरिसच्या धरतीवर भारतातही पाण्याखालून मेट्रो रेल्वे (Underwater Metro) धावेल. देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचा श्रीगणेशा होईल. देश प्रगतीच्या वाटेवरच नाही तर पाण्याखालूनही धावणार असल्याचे हे चिन्ह आहे. विशेष म्हणजे यासाठी काही 10-20 वर्षे लागणार नाहीत. या अंडरवॉटर मेट्रोचा प्रयोग सुरु आहे. त्याची चाचणी सुरु आहे. ही चाचणी (Testing) संपल्यानंतर, त्याच्या यशस्वीनंतर ही पाण्याखालची मेट्रो सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्चून मालदीवला जाण्याची गरज उरणार नाही. पाण्याखालून प्रवासाची पर्वणी लवकरच नागरिकांना मिळेल.

कुठे होणार श्रीगणेशा देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रोचे काम सध्या हुबळी नदीमध्ये सुरु आहे. त्यासाठी एक सुरुंग तयार करण्यात येत आहे. ही मेट्रो ट्रेन या टनलमधून जाईल. यामध्ये 6 कोच असतील. यामधून अंडरवॉटर प्रवासाच अद्भूत नजारा प्रवाशांना याची देही याची डोळा अनुभवता येईल. इतर देशातील प्रगत तंत्रज्ञानाने भारावलेल्या भारतीयांना हा सूखद अनुभव देशातच घेता येईल.

चाचणीनंतर मेट्रो धावणार कोलकत्ता ईस्ट-वेस्ट मेट्रो प्रोजेक्ट अंतर्गत दोन 6 कोचची मेट्रो धावेल. त्यासाठीची चाचपणी आणि चाचणी सुरु आहे. या दोन्ही रेल्वेचे चाचणी हावडा समुद्रकिनारा आणि ट्रायल एस्प्लेनेड या दरम्यान करण्यात येत आहे. हे अंतर 4.8 किलोमीटरचे आहे.

पहिली मेट्रोचा कोलकत्यातून श्रीगणेशा देशाची पहिली मेट्रो कोलकत्यातून धावली होती. मेट्रोची पहिली सुरुवात 1984 मध्ये कोलकत्ता येथे झाली होती. त्यानंतर दुसरी मेट्रो दिल्लीत 2002 मध्ये सुरु झाली होती. त्यानंतर इतर अनेक शहरात मेट्रोचे जाळे विणण्यात आले. महाराष्ट्रात मुंबईनंतर पुणे, नागपूर आणि इतर शहरात मेट्रो सेवा सुरु होणार आहे. आता देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रोचा श्रीगणेशा पण कोलकत्त्यातून होत आहे.

डिसेंबरपर्यंत काम होईल पूर्ण कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (KMRC) या प्रकल्पाची जबाबदारी खाद्यावर घेतली आहे. अंडरवॉटर मेट्रोची सेवा या वर्षी डिसेंबरपर्यंत सुरु करण्याचा मानस आहे. हे काम आता प्रगतीपथावर आहे. लवकरच हे काम पूर्ण करण्यात येऊन, यावर्षाच्या अखेरीला पाण्याखालून प्रवासाचा आनंद लुटता येईल.

लंडन, पॅरिससारखी सेवा भारताची ही पहिली पाण्याखालील मेट्रो ट्रेन लंडन-पॅरिसच्या धरतीवर सुरु होत आहे. यामध्ये वर्ल्ड क्लास सेवा असेल. हा प्रकल्प पूर्ण होण्याअगोदरच याची तुलना लंडनमधील युरोस्टारशी करण्यात येत आहे. लंडन आणि पॅरिस अंडर वॉटर रेल्वे सेवा आहे. लाखो यात्री त्यातून प्रवास करतात.

120 कोटींचा खर्च या मेट्रोसाठी सुरुंग तयार करण्यासाठी जवळपास 120 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. एवढंच नाही तर सर्वात खोल रेल्वे स्टेशनचा मानही या प्रकल्पातील हावडा स्टेशनने पटकावला आहे. हौज खास नंतर, कोलकात्याचे हावडा स्टेशन कमाल 33 मीटर खोल असेल. सध्या हौज खास हे 29 मीटरपर्यंत सर्वात खोल मेट्रो स्थानक आहे.

Follow Us
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.