AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांचा गोळीबार, 20 हून अधिक पर्यटक ठार

पर्यटकांवर गोळीबार केल्याच्या या घटनेनंतर सुरक्षा दलानी या परिसराची संपूर्ण घेराबंदी केली असून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. अतिरेक्यांनी शोधण्यासाठी मोठी मोहिम सुरु करण्यात आली आहे.

जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांचा गोळीबार, 20 हून अधिक पर्यटक ठार
| Updated on: Apr 22, 2025 | 7:28 PM
Share

जम्मू-कश्मीरमध्ये अतिरेक्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे आणि प्रथमच पर्यटकांना टार्गेट केले आहे. अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात २० हून अधिक पर्यटक ठार झाल्याचे वृत्त असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कश्मीरमध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच पर्यटकांना टार्गेट करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर दहशत निर्माण करण्यासाठी हा हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे.

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात २० ते २५ पर्यटक ठार  झाले आहेत. हा हल्ला जम्मूच्य  पहलगाम जिल्ह्यातील बैसरण परिसरात झाल्याची माहिती आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून, परिसराची नाकाबंदी करून तपास सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांनी पर्यटकांवर गोळीबार केला. हल्लेखोर मोटारसायकलवरून आले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे, परंतु याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही.

यापूर्वी झालेले हल्लेः

18 मे 2024 हल्ला:

पहलगाममधील यन्नर परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी जयपूर येथील पर्यटक दांपत्यावर (तबरेज आणि फरहा खान) गोळीबार केला होता. फरहाला खांद्याला आणि तबरेजला चेहऱ्यावर गोळी लागली होती. दोघांनाही श्रीनगरमधील लष्कराच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

या हल्ल्यातील दोन संशयित दहशतवाद्यांना (वसीम अहमद शाह आणि आदनान अहमद बैग) 28 मे 2024 रोजी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पिस्तूल, ग्रेनेड आणि 120 एके राउंड्स जप्त केले गेले.

6 मे 2022 चकमक:

पहलगामच्या सिरचन टॉप जंगल परिसरात हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मुहम्मद अशरफ खान उर्फ मौलवी आणि दोन अन्य दहशतवादी ठार झाले होते.

2 ऑगस्ट 2000 :

पहलगाममध्ये यापूर्वीही दहशतवादी हल्ले झाले आहेत, विशेषत: अमरनाथ यात्रेदरम्यान  2 ऑगस्ट 2000 रोजी नुनवान बेस कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात 32 जण ठार झाले होते, यात 21 हिंदू भाविक, 7 मुस्लिम दुकानदार आणि 3 सुरक्षा जवानांचा समावेश होता.

सद्यस्थिती:

पहलगाम आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीमुळे आणि अलीकडील हल्ल्यांमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे. लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिस संयुक्तपणे तपास आणि गस्त घालत आहेत.

पर्यटकांमध्ये भीती

पहलगाम हे जम्मू-काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. अशा हल्ल्यांमुळे पर्यटकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते, विशेषत: मे-जूनच्या पर्यटन हंगामात आणि आगामी अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर भीती निर्माण करण्यासाठी हा हल्ला केल्याचे म्हटले जात आहे.

Follow Us
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका