AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझा शुभम तर गेला..; पहलगाम हल्ल्यात मुलाला गमावलेल्या आईच्या वेदना

पहलगाममधील हल्ल्यात आपल्या मुलाला गमावलेल्या सीमा द्विवेदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कानपूरच्या शुभम द्विवेदीचं दोन महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं. आपल्या कुटुंबीयांसोबत तो काश्मीरला फिरायला गेला होता.

माझा शुभम तर गेला..; पहलगाम हल्ल्यात मुलाला गमावलेल्या आईच्या वेदना
Seema Dwivedi with her late son ShubhamImage Credit source: Instagram
| Updated on: May 11, 2025 | 3:35 PM
Share

लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांतच कानपूरच्या शुभम द्विवेदीने पहलगाममध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यात आपले प्राण गमावले. शुभम त्याच्या कुटुंबीयांसोबत काश्मीरला फिरायला गेला होता. बैसरन पठारावर पत्नीसोबत फिरत असताना दहशतवाद्यांनी त्याला धर्म विचारून त्याच्यावर गोळी झाडली होती. शुभमच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी एशान्या आणि इतर सर्व कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ‘मदर्स डे’ला शुभमविषयी बोलताना, आठवणी सांगताना त्याच्या आईचा कंठ दाटून आला. “शुभम आणि पहलगाम हल्ल्यातील इतरांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आज सीमेवर कित्येक आईंची मुलं धैर्याने, हिंमतीने उभी आहेत. देव त्या सर्वांचं रक्षण करो”, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

‘लाइव्ह हिंदुस्तान’शी बोलताना त्या म्हणाल्या, “आपल्या मुलाला गमावल्याचं दु:ख फक्त एक आईच समजू शकते, जिने तिच्या मुलाला गमावलंय. इतर कोणीच या वेदनांना समजू शकत नाही. आता आयुष्यभर मला हे दु:ख सहन करायचं आहे. माझं दुर्दैव असं होतं की मुलाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतरही मी त्याचा चेहरा पाहू शकले नाही.”

22 एप्रिल रोजी हल्ल्याच्या दिवशी शुभम आणि त्याचे कुटुंबीय पहलगामला ट्रेकिंगला गेले होते. “आम्ही जेव्हा वर पहलगामला जात होतो, तेव्हा मधूनच आम्ही खाली उतरलो. मी त्याला विचारलं की, शुभम खाली येशील का? तेव्हा त्याने घोडेवाल्याला विचारलं की, भैय्या.. वर नेटवर्क असेल का? घोडेवाल्याने सांगितलं की वर नेटवर्क असेल. त्यानंतर शुभमने वर बैसरनला जायचं ठरवलं होतं. जर त्या घोडेवाल्याने सांगितलं असतं की वर नेटवर्क नसतं, तर कदाचित आज माझा मुलगा माझ्यासोबत असता”, अशा शब्दांत शुभमची आई सीमा यांनी भावना व्यक्त केल्या.

पहलगाममधील बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी शुभमला कुराणमधील कलमा बोलून दाखवण्यास सांगितलं. शुभमला ते म्हणता न आल्याने अतिरेक्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. “शुभम आणि एशान्या हे घोडेस्वारी करत परिसरात फिरत होते, तेव्हाच दहशतवाद्यांनी हल्ला केला. सैन्याच्या वेशात असलेल्या एका अतिरेक्याने शुभमला विचारलं की, तू मुस्लीम आहे का? तर दुसऱ्याने त्याला कलमा म्हटल्यास सांगितलं. त्यावर शुभमने कलमा येत नसल्याचं सांगताच त्याला गोळी झाडली”, अशी माहिती शुभमचा चुलत भाऊ सौरभने दिली होती.

भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलाची दुरावस्था, प्रवाशांचा जीव धोक्यात
भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलाची दुरावस्था, प्रवाशांचा जीव धोक्यात.
विलीनीकरणाचा पोपट मेला? रोहित पवार सोमवारी बोलणार
विलीनीकरणाचा पोपट मेला? रोहित पवार सोमवारी बोलणार.
नरहरी झिरवाळांच्या विभागाला हादरा! एसीबीची मोठी कारवाई
नरहरी झिरवाळांच्या विभागाला हादरा! एसीबीची मोठी कारवाई.
चालकाचे लक्ष विचलित होणार नाही का? म्युझिकल रोडवर अमित ठाकरेंची टीका
चालकाचे लक्ष विचलित होणार नाही का? म्युझिकल रोडवर अमित ठाकरेंची टीका.
चंद्रपूरात शेण खाल्ले त्यांच्यावर...; संजय राऊत कडाडले
चंद्रपूरात शेण खाल्ले त्यांच्यावर...; संजय राऊत कडाडले.
शिवसेनेला दोष देऊ नका! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
शिवसेनेला दोष देऊ नका! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.