AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सगळ्या गोंधळाला मुलगीच जबाबदार, जावयासोबत पळालेल्या सासूने काढली मनातली भडास

Saas Damad Case Update: अलिगडमधील प्रसिद्ध सासू-सून-जावई प्रकरणातील, सासू अपना देवी यांनी जो खुलासा केला, त्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे. सासूने स्वतःच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले. हा त्रास कसा सुरू झाला ते सांगितले. तिने तिच्या जावयाशी लग्न का करण्याचा निर्णय घेतला? त्याबद्दलही ती स्पष्ट बोलली

सगळ्या गोंधळाला मुलगीच जबाबदार, जावयासोबत पळालेल्या सासूने काढली मनातली भडास
सासूचा मुलीवरच आरोपImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Apr 17, 2025 | 1:03 PM
Share

उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील बहुचर्चित सास-जावई पळून गेल्याच्या प्रकरणात पोलिस दोघांचीही सतत चौकशी करत आहेत. दोघेही पोलिसांसमोर अशा अनेक गोष्टी सतत उघड करत आहेत, ज्यामुळे पोलिसही आश्चर्यचकित झाले आहेत. जावयासोबत पळून गेलेल्या सासूच्या सांगण्यानुसार, तिचा पती तिला मारहाण करायचा, पण तिची मुलगीही काही कमी नव्हती. या सगळ्या गोंधळाला माझी मुलगीच जबाबदार आहे, असा दावा सासूने केला. तीच (मुलगी) माझ्याशी आधी वाईट वागली, मी जावयाशी बोलायला लागले की ती मला उलटसुलट बोलायची असा दावा सासूने केला आहे.

रडत रडत सासून आपली आपबिती सांगितली – मीच माझ्या मुलीचं राहुलशी जमवलं होतं, पण माझी मुलगीच माझ्यावर संशय घ्यायची. ती सतत मला टोकायची. तू राहुलशी बोलू नको, असं मला म्हणायची, तेव्हा माझं राहुलशी असं काहीच नात नव्हतं. आम्ही फक्त इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचो. पण आमच्या घरातल्या लोकांनींच या नात्याकडे चुकीच्या नजरेनं पाहिलं, माझी मुलगीच नव्हे तर नवऱ्यानेही सर्व मर्यादा ओलांडल्या असा दावा सासूने केला.

तुझे राहुलशी अनैतिक संबंध, नवराच करायचा आरोप

अपना देवी म्हणाल्या की ( माझे पती) जितेंद्र दररोज दारू पिऊन मला राहुलबद्दल चिडवायचा. मग तो मला शिवीगाळ करायचा आणि म्हणायचा की तुझे राहुलशी अनैतिकध संबंध आहेत. असं काहीच नाहीये सांगत मी त्याला खूप समजावलं पण तो काहीही ऐकायला तयार नाही. फक्त माझ्यावर आरोप करत रहायचा. मला सगळ्या गोष्टींचा वीट आला होता, पण माझ्या मुलीचं लग्न होतं, तारीख जवळ आली होती म्हणून मी शांत बसले. या सगळ्या गोष्टी मी राहुलला सांगायचे, त्याच्याशी शेअर करायचे कारण तो समजून घ्यायचा, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

पण एके दिवशी तर हद्द झाली, माझा परतीच मला म्हणाला की तू राहुलसोबत पळून जा. ते ऐकून मी थक्क झाले. पती काय बोलला ते मी राहुलला सांगतिलं. आणि तेव्हा आम्ही ठरवलं की आता आम्ही दोघेच एकत्र राहणार, त्यानंतरच आम्ही पळून जाण्याचा प्लान रचला. मग आम्ही बिहारच्या मुझफ्फरपूरला गेलो. सगळ्यांपासून दूर आम्ही इथेच राहू असं ठरवलं, काही दिवस आम्ही मुझ्फ्फरपूरच्या हॉटेलमध्ये राहिलो. नंतर बिहार-नेपाळच्या बॉर्डरजवळ आम्ही पोचलो, तेव्हा आम्हाला समजलं की पोलिस आम्हाला शोधत आहे. मग आम्ही स्वत:च सरेंडर करण्याचा निर्णय घेतला असं त्यांनी नमूद केलं.

एकाच अटीवर करणार लग्न

सासूसोबत पळून गेलेल्या जावयाने सांगितले की, आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. तिचा नवरा तिला त्रास द्यायचा. ती मला फोनवर सगळं सांगायची. त्यांना आधीही छळण्यात आले होते पण माझे आणि शिवानीचे नाते जुळल्यानंतर त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. मी फक्त त्यांना पाठिंबा दिला आहे. जर त्यांची इच्छा असेल तर मी तिच्याशी लग्न करायलाही तयार आहे. माझी फक्त एक अट आहे की त्या यासाठी तयार असल्या पाहिजेत, असं जावयाने सांगितलं.

लग्नाशिवायही राहूलसोबत राहण्यास तयार

तर सासू म्हणते, की मलाही राहुलसोबत राहायचे आहे आणि त्याच्याशी लग्न करायचे आहे. घटस्फोटाशिवाय तू लग्न करू शकत नाहीस, असं जेव्हा तिला सांगण्यात आलं तेव्हा ती म्हणाली की – मी त्याच्यासोबत असेच राहण्यास तयार आहे. मला फक्त त्याच्यासोबत राहायचे आहे, याचा पुनरुच्चार सासूने केला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.