Naxalist : 2 जिल्हे, 1 टॉप कमांडर उरला, देशातून नक्षली चळवळीचा असा झाला खात्मा, 13 वर्षात कमाल, 180 जिल्ह्यातून नक्षलवाद हद्दपार, इनसाईड स्टोरी वाचली का?
Naxalite Movement Inside Story: नक्षलवादी चळवळ भारतात इतिहास जमा झाली आहे. आदिवासींचे हक्क संरक्षणापासून ते त्यांचेच दमन आणि शोषण करत भारताच्या अखंडतेला नख लावण्याचा प्रयत्न या 13 वर्षांत हाणून पाडण्यात आला. 2013 मध्ये 182 नक्षलग्रस्त जिल्हे होते, आज त्यांची संख्या छत्तीसगडमधील विजापूर आणि सुकमा जिल्ह्यापर्यंत मर्यादीत झाली आहे.

Naxalite Movement Inside Story: देशातील’लाल’ दहशतवाद संपला. नक्षल चळवळ हद्दपार झाली. देशात 2013 मध्ये 182 नक्षलग्रस्त जिल्हे होते, आज छत्तीसगडमधील विजापूर आणि सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद अखेरची घटका मोजत आहे. या दोन जिल्ह्यात येत्या 10 दिवसात नक्षली शस्त्र खाली ठेवण्याची शक्यता आहे. मोदी सरकारला याचे श्रेय न देणे हे कोत्या मनाचं लक्षण ठरेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्यावर्षीच 31 मार्च 2026 पर्यंत भारत नक्षलमुक्त असेल अशी घोषणा केली होती. त्याची प्रचिती देशाने घेतली. अर्थात देश नक्षलमुक्त झाला असला तरी विचार मरत नाहीत. अन्यायाला वाचा फुटतेच आणि जर योग्य दखल घेतली नाही तर सशस्त्र लढा उभारल्या जातो हे न्याय सूत्र अनादी काळापासून सुरू आहे. आदिवासी, जंगल यामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न झाल्यास गतप्राण झालेल्या विचारांना संजीवनी मिळू शकते. लाल दहशतवाद ठेचताना कायम स्वरुपी उपायांवर अधिक भर देणे गरजेचे आहे. ...
