AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Netaji : इंग्रजांना घाबरून नेताजी जर्मनीला पळाले, चौथीच्या पुस्तकात घोडचूक, राज्य सरकार म्हणाले काय?

Subhashchandra Bose : सध्या अनेक राज्यात आणि केंद्र सरकारच्या पाठ्यपुस्तकात बदल करण्यात आल्याचे दिसते. सर्वाधिक बदल हे इतिहास विषयात झाले आहेत.

Netaji : इंग्रजांना घाबरून नेताजी जर्मनीला पळाले, चौथीच्या पुस्तकात घोडचूक, राज्य सरकार म्हणाले काय?
नेताजी सुभाषचंद्र बोस
| Updated on: Aug 19, 2025 | 11:51 AM
Share

देशातील आणि अनेक राज्यातील इतिहासातील पुस्तकात मोठ्या बदलाला सुरूवात झाली आहे. मुघलांचा इतिहास कमी झाला आहे. तर दुसरीकडं काही घोडचुका सुद्धा झाल्याचे दिसून येत आहे. केरळ राज्यातील शाळेच्या पुस्तकात अशीच मोठी चूक झाली आहे. महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी ही चूक करण्यात आली आहे. तर केरळ सरकारने ही चूक कबुल करत ती दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा केला आहे. इयत्ता 4 वीच्या पुस्तकात, टीचर्स हँडबुकमध्ये ही चूक समोर आली. त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस हे इंग्रजांना घाबरून जर्मनीला पळाल्याचा दावा करण्यात आला होता.

सदस्य मंडळांवर कारवाई

नेताजी सुभाषचंद्र बोस हे इंग्रजांना घाबरून जर्मनीला पळाल्याचा दावा शिक्षकांना देण्यात आलेल्या पुस्तकात करण्यात आला होता. हे इयत्ता 4 ची पुस्तक होतं. त्यावर मग राज्य सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं. केरळचे शिक्षणमंत्री व्ही.शिवनकट्टी यांनी सोमवारी यांनी ही चूक कबुल केली. त्यांनी ही त्रुटी झाल्याचे मान्य करत या पुस्तक मंडळाच्या सदस्यांवर कारवाईचे आश्वासन दिले. त्यांना भविष्यात मंडळात स्थान न देण्याची घोषणा पण त्यांनी केली.

ऐतिहासिक चूक

शिक्षणमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली. त्यात ही ऐतिहासीक घोडचूक झाल्याचे मान्य केले. केरळ राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचा एक सदस्य यासाठी जबाबदार असल्याचे समोर आले आहे. शिवनकुट्टी यांनी सदर चूक तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले. तसेच बाजारात अथवा शाळेतील शिक्षकांपर्यंत पोहचलेली पुस्तकं परत मागवलेली आहे. तर दुरुस्त केलेली पुनःप्रकाशित पुस्तकं लवकरच पुरवण्यात येणार आहे. तर ऑनलाईन जे पुस्तक उपलब्ध आहे, त्यात बदल करण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.

ABVP आक्रमक

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या सर्व प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. या पुस्तकात अजून अनेक चुका आहेत. त्या कधी दुरुस्त करणार असा सवाल एबीव्हीपीने विचारला आहे. परिषदेचे राष्ट्रीय सचिव श्रवण बी राज यांनी इतिहासातील अशा चुका कशा होतात असा सवाल केला आहे. डावा गट देशाची एकता आणि अखंडता तोडू इच्छित असल्याचा आरोप त्यांनी केला.

Follow Us
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही.....
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV.
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला.