AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Army Chief Lt Gen Manoj Pandey : नागपुरकर मराठमोळे मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख, इंजिनिअर शाखेतून पहिले

सध्या लष्कराचे उपप्रमुख मनोज पांडे हे आहेत, 29 वे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे (Manoj Naravane) यांचा 30 एप्रिल रोजी कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता नव्या लष्करप्रमुखाची नियुक्ती ताडतडीने करण्यावर सरकार भर देत आहे.

New Army Chief Lt Gen Manoj Pandey : नागपुरकर मराठमोळे मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख, इंजिनिअर शाखेतून पहिले
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे भावी लष्करप्रमुख असण्याची शक्यता Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 19, 2022 | 11:16 AM
Share

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Lt Gen Manoj Pandey) हे आपल्या देशाचे नवे लष्करप्रमुख (New Army Chief) असतील असे चित्र सध्या दिसू लागले आहे. सध्या लष्कराचे उपप्रमुख मनोज पांडे हे आहेत, 29 वे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे (Manoj Naravane) यांचा 30 एप्रिल रोजी कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता नव्या लष्करप्रमुखाची नियुक्ती ताडतडीने करण्यावर सरकार भर देत आहे. मात्र चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) कोण असतील यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सीडीएस बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यापासून हे पद रिक्त आहे. सीडीएसची निवड लष्करातूनच केली जाईल अशी अपेक्षा आहे कारण सीडीएस हे अर्थातच लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख असतात. भारतीय हवाई दलातील एका निवृत्त अधिकाऱ्याचे नाव या पदासाठी चर्चेत आहे. लष्करप्रमुखांच्या नावावर अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही, परंतु या आठवड्यात लेफ्टनंट जनरल पांडे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. जनरल नरवणे यांच्या निवृत्तीच्या सुमारे 10 दिवस आधी नव्या लष्करप्रमुखांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

View this post on Instagram

A post shared by Asian News International (@ani_trending)

मनोज पांडे यांची लष्करातील कामगिरी

  1. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करप्रमुख म्हणून नियुक्त होणारे पहिले इंजिनिअर असतील. मनोज पांडे हे लष्कर प्रमुख बनणारे कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्सचे पहिले अधिकारी असतील, ज्या पदावर आतापर्यंत इन्फैंट्री, आर्मर्ड और आर्टिलरी अधिकारी कार्यरत राहिले आहेत.
  2. नॅशनल डिफेन्स अकादमीचे माजी विद्यार्थी, मनोज पांडे यांना डिसेंबर 1982 मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समध्ये नियुक्त करण्यात आले.
  3. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील पल्लनवाला सेक्टरमध्ये ऑपरेशन पराक्रम दरम्यान एका इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले.
  4. डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑपरेशन पराक्रमचा भाग म्हणून, त्यांनी सैन्य आणि शस्त्रे मोठ्या प्रमाणावर भारत- पाकिस्तानच्या सीमेवर हलवली.
  5. संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
  6. आपल्या 39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत लेफ्टनंट जनरल पांडे यांनी वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे.
  7. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ते अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ होते.

Sadhvi Rithambara : हिंदूराष्ट्रासाठी प्रत्येक हिंदुंनी 4 मुलं जन्माला घाला, 2 मुलं RSS, विश्व हिंदू परिषदला द्या, साध्वी ऋतंभरांचा अजब सल्ला

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आता देशाचे नवे सेना प्रमुख; त्यांच्या नियुक्तीसाठी सरकारचा ग्रीन सिग्नल

Sharad Pawar on Raj Thackeray: कुणाला धोका असेल आणि सुरक्षा पुरवली जात असेल तर हरकत नाही: शरद पवार

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.