AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंडीत नेहरु आणि अटलबिहारी वाजपेयी भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते, सर्व पक्षांनी आत्मचिंतन करावं : नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते आहेत, असं मत व्यक्त केलंय. तसेच सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असं सर्वांनीच आत्मचिंतन करत जबाबदारीने वागलं पाहिजे असंही नमूद केलं.

पंडीत नेहरु आणि अटलबिहारी वाजपेयी भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते, सर्व पक्षांनी आत्मचिंतन करावं : नितीन गडकरी
| Updated on: Aug 20, 2021 | 10:52 AM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते आहेत, असं मत व्यक्त केलंय. तसेच सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असं सर्वांनीच आत्मचिंतन करत जबाबदारीने वागलं पाहिजे असंही नमूद केलं. दिल्लीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली ही मतं मांडली.

नितीन गडकरी म्हणाले, “पंडीत जवाहरलाल नेहरु आणि अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते होते. दोघेही आम्ही आमच्या लोकशाही मर्यादांचं पालन करु असे म्हणत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कामाचा वारसा आमच्यासाठी प्रोत्साहनचा स्त्रोत आहे. जवाहरलाल नेहरु यांचंही भारतीय लोकशाहीत मोठं योगदान आहे.”

संसदेच्या मान्सून अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांनी कृषी कायदे, इंधन दरवाढ आणि पेगसस मालवेअरचा उपयोग करुन पाळत ठेवल्याच्या आरोपावरुन जोरदार गोंधळ घातला. यावर नितीन गडकरी यांनी भाष्य केलं.

लोकशाहीत वागण्याची ही पद्धत नाही, अटलजींनी गडकरींना सुनावलं

नितीन गडकरी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्याबाबत एक महत्त्वाची आठवण सांगितली. ते म्हणाले, “मी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता होतो. तेव्हा मी सभागृहातील गोंधळाचं नेतृत्व करत होतो. दरम्यान मी अटलबिहारी वाजपेयी यांना भेटलो. तेव्हा वाजपेयी यांनी ही लोकशाहीत वागण्याची पद्धत नाही. लोकांपर्यंत योग्य संदेश देणं महत्त्वाचं आहे.”

“आजचे सत्ताधारी विरोधी पक्ष होतील आणि विरोधी पक्ष सत्ताधारी होईल”

आज जे सत्तेत आहेत ते विरोधी पक्षात जातील आणि आज विरोधी पक्षात आहेत ते उद्या सत्तेत येतील. आपल्या भूमिका बदलत राहतात. मात्र, सर्व पक्षांनी आत्मचिंतन करण्याती गरज आहे. प्रत्येकाने मर्यादेचं पालन केलं पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे लोकशाहीची दोन चाकं आहेत. त्यामुळे मजबूत विरोधी पक्ष लोकशाहीसाठी महत्त्वाचा आहे. म्हणूनच काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून मजबूत बनावी, असंही गडकरींनी नमूद केलं.

हेही वाचा :

Vehicle Scrappage Policy : सामान्य माणसांसाठी उत्तम काम करणार स्क्रॅपेज धोरण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितले 2 मोठे फायदे

आता शिवसेनाही टाकणार लेटरबॉम्ब, गडकरींना करणार सवाल; उदय सामंतांची माहिती

‘बाकीचे भाषण करतात, गडकरी काम करतात’, बच्चू कडू यांच्याकडून कौतुक; गडकरींच्या पत्राबाबत कारवाईची मागणी

व्हिडीओ पाहा :

Nitin Gadkari say Pandit Nehru and Atalbihari Vajpayee are ideal leaders of Indian democracy

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.