AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपला रोखण्यासाठी इंडिया आघाडीची मोठी खेळी, नितीश कुमार, राहुल गांधी उत्तर प्रदेशातून लढणार; सपा साथ देणार?

बेनी प्रसाद वर्मा यांच्यानंतर उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला कोणताही मोठा चेहरा मिळाला नाही. मात्र, नितीश कुमार यांच्या रुपाने हा प्रश्न सुटणार आहे.

भाजपला रोखण्यासाठी इंडिया आघाडीची मोठी खेळी, नितीश कुमार, राहुल गांधी उत्तर प्रदेशातून लढणार; सपा साथ देणार?
rahul gandhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2023 | 7:00 AM
Share

लखनऊ | 5 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान पदाचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं सांगितलं जातं. त्यामुळे उत्तर प्रदेशातच भाजपला मात देण्यावर इंडिया आघाडीने भर देण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. त्याचाच एक भाग म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातून निवडणुकीला उतरवण्याचं इंडिया आघाडीत घटत आहे. त्यासाठी समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव हे इंडिया आघाडीला मदत करणार असल्याचं सांगितलं जात आहे. अखिलेश यादव यांच्या सहमतीने इंडिया आघाडीने उत्तर प्रदेशात एक सर्व्हेही केला आहे.

नितीश कुमार यांना उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि राहुल गांधी यांना अमेठीतून उतरवण्यासाठी हा सर्व्हे करण्यात आला होता. फुलपूरमध्ये कुर्मी समाजाची मोठी व्होट बँक आहे. ही व्होटबँक आपल्याकडे वळवण्यासाठी नितीश कुमार हे अखिलेश यादव यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. फूलपूर हा मतदारसंघ म्हणजे राजाकरणाची प्रयोगशाळा मानली जात आहे. या मतदारसंघात जवाहरलाल नेहरू, कांशीराम यांच्यापासून ते अतिक अहमदपर्यंत अनेकांनी भाग्य आजमावलं होतं.

कुर्मी मतांवर डोळा

या मतदारसंघातील कुर्मी समाजाची मते मिळवायची असेल तर या मतदारसंघातून मोठा चेहरा द्यायला हवं असं समाजवादी पार्टीचं मत आहे. नितीश कुमार हे राजकारणातील मोठं नाव आहे. ते या मतदारसंघात उभे राहिल्यास भाजपला मोठा पराभव पत्करावा लागेल. बेनी प्रसाद वर्मा यांच्यानंतर उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला कोणताही मोठा चेहरा मिळाला नाही. मात्र, नितीश कुमार यांच्या रुपाने हा प्रश्न सुटणार आहे. विशेष म्हणजे नितीश कुमार फूलपूरमधून उभे राहिल्यास उत्तर प्रदेशातील 10 जागांवर मोठा फरक पडणार आहे. कारण उत्तर प्रदेशातील 10 लोकसभा मतदारसंघात कुर्मी समाजाचे निर्णायक मते आहेत. ही मते आपल्याकडे खेचण्याचा इंडिया आघाडीचा हा प्रयोग यशस्वी होतो का? हे पाहिलं पाहिजे.

या मतदारसंघासाठीही चर्चा

उत्तर प्रदेशातील 25 हून अधिक जिल्ह्यात कुर्मी समाजाचा प्रभाव आहे. यातील 16 जिल्ह्यात 12 टक्के मतदार कुर्मी समाजातील आहे. पूर्वांचल, बुंदलखंड अवध आणि रुहेलखंडमध्ये कुर्मी सामाजाची सर्वाधिक मते आहेत. त्यामुळेच इंडिया आघाडी फूलपूरमधून नितीश कुमार यांना उतरवण्याच्या तयारीत आहे. या शिवाय जौनपूर, आंबेडकर नगर आणि प्रतापूरमधूनही नितीश कुमार यांना उतरवण्याची चर्चा आहे.

राहुल गांधी अमेठीसाठी

याशिवाय अमेठीतून राहुल गांधी यांना बळ देण्याचा विचारही इंडिया आघाडी करत आहे. भाजपच्या गडातच आक्रमकपणे लढत देण्याची इंडिया आघाडीची रणनीती आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या बड्या राज्यात आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली असून काँग्रेसने या दोन्ही राज्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.