AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येतील पराभवानंतर मोदी सरकारचा मोठा निर्णय, अयोध्यात होणार आता…

ayodhya ram mandir: अयोध्येत राम मंदिराचे निर्माण झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे राम मंदिरची सुरक्षा व्यवस्था कठोर करण्याकडे केंद्र सरकारने लक्ष दिले आहे. अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली.

अयोध्येतील पराभवानंतर मोदी सरकारचा मोठा निर्णय, अयोध्यात होणार आता...
ayodhya ram mandir
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 12, 2024 | 2:39 PM
Share

लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात धक्का बसला आहे. राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील लोकांनी भाजपला नकारले. अयोध्येतही भाजप उमेदवार पराभूत झाला. त्यानंतर आता मोदी 3.0 सरकारचे कामकाज सुरु होताच अयोध्येसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्येत नॅशनल सिक्यूरिटी गार्डचे (NSG) हब बनवण्यात येणार आहे. अतिरेक्यांकडून होणारा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिरेकी हल्ल्यांमुळे देशातील इतर संवेदनशील ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

अयोध्या एनएसजी हब होणार

अयोध्येत राम मंदिराचे निर्माण झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे राम मंदिरची सुरक्षा व्यवस्था कठोर करण्याकडे केंद्र सरकारने लक्ष दिले आहे. अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर देशभरातून येणाऱ्या भाविकांची गर्दी प्रचंड वाढली आहे. रोज दीड लाखांपेक्षा जास्त भाविक येत आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कठोर करण्याकडे पावले उचलण्यात आली आहे. आता केंद्र सरकारने अयोध्येत एनएसजी हब बनवण्यासाठी योजना तयार केली आहे. एनसीजीमध्ये ब्लॅक कॅट कमांडो तैनात असतात.

एनएसजी तैनात करण्याचा निर्णय

केंद्र सरकारने अयोध्येत एनएसजी कमांडो तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्येत येणाऱ्या रामभक्तांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. तसेच दहशतवादी हल्ल्यासारखा परिस्थितीचा सामना करण्यासाठी या योजनेवर काम करण्यात आले आहे. अयोध्या मंदिराच्या सुरक्षेचे नेतृत्व एनएसजीकडे देण्यात येणार आहे. एनएसजी कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन करण्यासाठी नेहमी तयार असते.

सध्या अयोध्येची सुरक्षा एसएसएफकडे

केंद्र सरकारकडून अयोध्येत एनएसजी नियुक्तीची पूर्ण तयारी केली गेली आहे. यासंदर्भात राज्य सरकारला माहिती दिली आहे. एनएसजी हब करण्यासाठी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सध्या अयोध्येची सुरक्षा एसएसएफकडे दिली आहे. या कमांडोना एनएसजीकडून प्रशिक्षण दिले गेले आहे. स्पेशल फोर्सचे 200 कमांडो अयोध्याची सुरक्षा पाहत आहे.

Follow Us
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प