AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Railway Accident: देशातील मोठ्या रेल्वे अपघातांच्या यादीत समाविष्ट झालेल्या या अपघाताने संपूर्ण देश हादरला, पण देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत की भारतातील सर्वात मोठा रेल्वे अपघात कसा झाला.

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
BIGGEST TRAIN ACCIDENT
| Updated on: Jun 05, 2023 | 10:26 AM
Share

बालासोर: ओरिसातील बालासोर येथे 2 जून 2023 रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास घडलेल्या भीषण रेल्वे अपघाताने देश हादरला. या रेल्वे अपघातात तीन गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोमंडल शालिमार एक्स्प्रेस रुळावरून घसरून मालगाडीला धडकली. मालगाडीचे डबे रुळावरून घसरून यशवंतपूर-हावडा सुपरफास्ट ट्रेनला धडकले. या दुर्घटनेत सुमारे 280 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून सुमारे 900 प्रवासी जखमी झाले आहेत. देशातील मोठ्या रेल्वे अपघातांच्या यादीत समाविष्ट झालेल्या या अपघाताने संपूर्ण देश हादरला, पण देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत की भारतातील सर्वात मोठा रेल्वे अपघात कसा झाला.

रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा रेल्वे अपघात 6 जून 1981 रोजी झाला होता, जेव्हा प्रवाशांनी खचाखच भरलेली पॅसेंजर ट्रेन क्रमांक 416dn मानसीहून सहरसाकडे निघाली होती. बदला घाट ते धमारा घाट स्थानकाअसा या गाडीचा मार्ग होता. या मार्गात बागमती नदी होती. ही रेल्वे पूल क्रमांक 51 मधून जात असताना अचानक नदीत कोसळली. या ट्रेनमध्ये एकूण 9 डबे होते, त्यातील शेवटचे 7 डबे नदीत पडले. पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती, काही कळायच्या आत रेल्वे पाण्यात बुडाली.

बुडणाऱ्या प्रवाशांना वाचवण्यासाठी लोक नदीजवळ पोहोचले, तोपर्यंत शेकडो प्रवासी पाण्यात बुडाले होते. हा देशातील सर्वात मोठा आणि जगातील दुसरा सर्वात मोठा रेल्वे अपघात असल्याचे म्हटले जात आहे. अनेक दिवस शोधमोहीम. 5 दिवसांत 200 हून अधिक मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. सरकारी आकडेवारीनुसार या दुर्घटनेत सुमारे ३०० जणांचा मृत्यू झाला असला तरी स्थानिक लोक आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार यात 800 ते 900 लोकांचा मृत्यू झाला.

या अपघाताची अनेक कारणे आहेत, काही लोक जोरदार वादळाला या अपघाताचे कारण सांगतात, तर काही नदीला अचानक आलेल्या पुरामुळे ही दुर्घटना झाल्याचे सांगतात. तर काही लोकांचे म्हणणे आहे की, पुलावर एक गाय आली होती, जी वाचवण्यासाठी लोको पायलटने अचानक ब्रेक लावला आणि अनियंत्रित ट्रेनमुळे शेवटचे 7 डबे उलटले, जे नदीत पडले.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.