AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Railway Accident: देशातील मोठ्या रेल्वे अपघातांच्या यादीत समाविष्ट झालेल्या या अपघाताने संपूर्ण देश हादरला, पण देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत की भारतातील सर्वात मोठा रेल्वे अपघात कसा झाला.

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
BIGGEST TRAIN ACCIDENT
| Updated on: Jun 05, 2023 | 10:26 AM
Share

बालासोर: ओरिसातील बालासोर येथे 2 जून 2023 रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास घडलेल्या भीषण रेल्वे अपघाताने देश हादरला. या रेल्वे अपघातात तीन गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोमंडल शालिमार एक्स्प्रेस रुळावरून घसरून मालगाडीला धडकली. मालगाडीचे डबे रुळावरून घसरून यशवंतपूर-हावडा सुपरफास्ट ट्रेनला धडकले. या दुर्घटनेत सुमारे 280 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून सुमारे 900 प्रवासी जखमी झाले आहेत. देशातील मोठ्या रेल्वे अपघातांच्या यादीत समाविष्ट झालेल्या या अपघाताने संपूर्ण देश हादरला, पण देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत की भारतातील सर्वात मोठा रेल्वे अपघात कसा झाला.

रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा रेल्वे अपघात 6 जून 1981 रोजी झाला होता, जेव्हा प्रवाशांनी खचाखच भरलेली पॅसेंजर ट्रेन क्रमांक 416dn मानसीहून सहरसाकडे निघाली होती. बदला घाट ते धमारा घाट स्थानकाअसा या गाडीचा मार्ग होता. या मार्गात बागमती नदी होती. ही रेल्वे पूल क्रमांक 51 मधून जात असताना अचानक नदीत कोसळली. या ट्रेनमध्ये एकूण 9 डबे होते, त्यातील शेवटचे 7 डबे नदीत पडले. पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती, काही कळायच्या आत रेल्वे पाण्यात बुडाली.

बुडणाऱ्या प्रवाशांना वाचवण्यासाठी लोक नदीजवळ पोहोचले, तोपर्यंत शेकडो प्रवासी पाण्यात बुडाले होते. हा देशातील सर्वात मोठा आणि जगातील दुसरा सर्वात मोठा रेल्वे अपघात असल्याचे म्हटले जात आहे. अनेक दिवस शोधमोहीम. 5 दिवसांत 200 हून अधिक मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. सरकारी आकडेवारीनुसार या दुर्घटनेत सुमारे ३०० जणांचा मृत्यू झाला असला तरी स्थानिक लोक आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार यात 800 ते 900 लोकांचा मृत्यू झाला.

या अपघाताची अनेक कारणे आहेत, काही लोक जोरदार वादळाला या अपघाताचे कारण सांगतात, तर काही नदीला अचानक आलेल्या पुरामुळे ही दुर्घटना झाल्याचे सांगतात. तर काही लोकांचे म्हणणे आहे की, पुलावर एक गाय आली होती, जी वाचवण्यासाठी लोको पायलटने अचानक ब्रेक लावला आणि अनियंत्रित ट्रेनमुळे शेवटचे 7 डबे उलटले, जे नदीत पडले.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.