AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Railway Accident: देशातील मोठ्या रेल्वे अपघातांच्या यादीत समाविष्ट झालेल्या या अपघाताने संपूर्ण देश हादरला, पण देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत की भारतातील सर्वात मोठा रेल्वे अपघात कसा झाला.

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
BIGGEST TRAIN ACCIDENT
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 05, 2023 | 10:26 AM
Share

बालासोर: ओरिसातील बालासोर येथे 2 जून 2023 रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास घडलेल्या भीषण रेल्वे अपघाताने देश हादरला. या रेल्वे अपघातात तीन गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोमंडल शालिमार एक्स्प्रेस रुळावरून घसरून मालगाडीला धडकली. मालगाडीचे डबे रुळावरून घसरून यशवंतपूर-हावडा सुपरफास्ट ट्रेनला धडकले. या दुर्घटनेत सुमारे 280 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून सुमारे 900 प्रवासी जखमी झाले आहेत. देशातील मोठ्या रेल्वे अपघातांच्या यादीत समाविष्ट झालेल्या या अपघाताने संपूर्ण देश हादरला, पण देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत की भारतातील सर्वात मोठा रेल्वे अपघात कसा झाला.

रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा रेल्वे अपघात 6 जून 1981 रोजी झाला होता, जेव्हा प्रवाशांनी खचाखच भरलेली पॅसेंजर ट्रेन क्रमांक 416dn मानसीहून सहरसाकडे निघाली होती. बदला घाट ते धमारा घाट स्थानकाअसा या गाडीचा मार्ग होता. या मार्गात बागमती नदी होती. ही रेल्वे पूल क्रमांक 51 मधून जात असताना अचानक नदीत कोसळली. या ट्रेनमध्ये एकूण 9 डबे होते, त्यातील शेवटचे 7 डबे नदीत पडले. पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती, काही कळायच्या आत रेल्वे पाण्यात बुडाली.

बुडणाऱ्या प्रवाशांना वाचवण्यासाठी लोक नदीजवळ पोहोचले, तोपर्यंत शेकडो प्रवासी पाण्यात बुडाले होते. हा देशातील सर्वात मोठा आणि जगातील दुसरा सर्वात मोठा रेल्वे अपघात असल्याचे म्हटले जात आहे. अनेक दिवस शोधमोहीम. 5 दिवसांत 200 हून अधिक मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. सरकारी आकडेवारीनुसार या दुर्घटनेत सुमारे ३०० जणांचा मृत्यू झाला असला तरी स्थानिक लोक आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार यात 800 ते 900 लोकांचा मृत्यू झाला.

या अपघाताची अनेक कारणे आहेत, काही लोक जोरदार वादळाला या अपघाताचे कारण सांगतात, तर काही नदीला अचानक आलेल्या पुरामुळे ही दुर्घटना झाल्याचे सांगतात. तर काही लोकांचे म्हणणे आहे की, पुलावर एक गाय आली होती, जी वाचवण्यासाठी लोको पायलटने अचानक ब्रेक लावला आणि अनियंत्रित ट्रेनमुळे शेवटचे 7 डबे उलटले, जे नदीत पडले.

Follow Us
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य