AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Railway Accident: देशातील मोठ्या रेल्वे अपघातांच्या यादीत समाविष्ट झालेल्या या अपघाताने संपूर्ण देश हादरला, पण देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत की भारतातील सर्वात मोठा रेल्वे अपघात कसा झाला.

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
BIGGEST TRAIN ACCIDENT
| Updated on: Jun 05, 2023 | 10:26 AM
Share

बालासोर: ओरिसातील बालासोर येथे 2 जून 2023 रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास घडलेल्या भीषण रेल्वे अपघाताने देश हादरला. या रेल्वे अपघातात तीन गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोमंडल शालिमार एक्स्प्रेस रुळावरून घसरून मालगाडीला धडकली. मालगाडीचे डबे रुळावरून घसरून यशवंतपूर-हावडा सुपरफास्ट ट्रेनला धडकले. या दुर्घटनेत सुमारे 280 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून सुमारे 900 प्रवासी जखमी झाले आहेत. देशातील मोठ्या रेल्वे अपघातांच्या यादीत समाविष्ट झालेल्या या अपघाताने संपूर्ण देश हादरला, पण देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत की भारतातील सर्वात मोठा रेल्वे अपघात कसा झाला.

रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा रेल्वे अपघात 6 जून 1981 रोजी झाला होता, जेव्हा प्रवाशांनी खचाखच भरलेली पॅसेंजर ट्रेन क्रमांक 416dn मानसीहून सहरसाकडे निघाली होती. बदला घाट ते धमारा घाट स्थानकाअसा या गाडीचा मार्ग होता. या मार्गात बागमती नदी होती. ही रेल्वे पूल क्रमांक 51 मधून जात असताना अचानक नदीत कोसळली. या ट्रेनमध्ये एकूण 9 डबे होते, त्यातील शेवटचे 7 डबे नदीत पडले. पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती, काही कळायच्या आत रेल्वे पाण्यात बुडाली.

बुडणाऱ्या प्रवाशांना वाचवण्यासाठी लोक नदीजवळ पोहोचले, तोपर्यंत शेकडो प्रवासी पाण्यात बुडाले होते. हा देशातील सर्वात मोठा आणि जगातील दुसरा सर्वात मोठा रेल्वे अपघात असल्याचे म्हटले जात आहे. अनेक दिवस शोधमोहीम. 5 दिवसांत 200 हून अधिक मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. सरकारी आकडेवारीनुसार या दुर्घटनेत सुमारे ३०० जणांचा मृत्यू झाला असला तरी स्थानिक लोक आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार यात 800 ते 900 लोकांचा मृत्यू झाला.

या अपघाताची अनेक कारणे आहेत, काही लोक जोरदार वादळाला या अपघाताचे कारण सांगतात, तर काही नदीला अचानक आलेल्या पुरामुळे ही दुर्घटना झाल्याचे सांगतात. तर काही लोकांचे म्हणणे आहे की, पुलावर एक गाय आली होती, जी वाचवण्यासाठी लोको पायलटने अचानक ब्रेक लावला आणि अनियंत्रित ट्रेनमुळे शेवटचे 7 डबे उलटले, जे नदीत पडले.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.