शेतकऱ्यांची थट्टा, मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं फक्त 25 रुपये कर्ज माफ

भोपाळ : मध्य प्रदेशात गेल्या दोन महिन्यांपासून कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेले शेतकरी यादीत त्यांचं नाव पाहून चक्रावून गेले आहेत. कारण, या शेतकऱ्यांसोबत कमलनाथ सरकारने अशी थट्टा केलीय, जे पाहून कुणाचाही संताप होईल. अनेक शेतकऱ्यांचं फक्त 25 रुपये ते 300 रुपयांपर्यंतचं कर्ज माफ झालंय. मध्य प्रदेशतील खरगोन भागातील हा प्रकार आहे. तर प्रशासनाच्या मते, 31 मार्च […]

शेतकऱ्यांची थट्टा, मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं फक्त 25 रुपये कर्ज माफ
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

भोपाळ : मध्य प्रदेशात गेल्या दोन महिन्यांपासून कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेले शेतकरी यादीत त्यांचं नाव पाहून चक्रावून गेले आहेत. कारण, या शेतकऱ्यांसोबत कमलनाथ सरकारने अशी थट्टा केलीय, जे पाहून कुणाचाही संताप होईल. अनेक शेतकऱ्यांचं फक्त 25 रुपये ते 300 रुपयांपर्यंतचं कर्ज माफ झालंय.

मध्य प्रदेशतील खरगोन भागातील हा प्रकार आहे. तर प्रशासनाच्या मते, 31 मार्च 2018 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय त्यांचं कर्ज माफ करण्यात आलंय. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. सरकार आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला.

जय किसान ऋण मुक्ति योजना मध्य प्रदेशात जाहीर करण्यात आली आहे. सध्या याची अंमलबजावणी सुरु आहे. काही गावांमध्ये लाभार्थ्यांची यादी लावण्यात आली आहे. पण ‘जागरण’च्या वृत्तानुसार, फक्त 25 रुपयांपर्यंतचंच कर्ज माफ झाल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केलाय. जैतपूरच्या एका शेतकऱ्याचं 25 रुपये कर्ज माफ झालं, तर सिकंदरपुरातील शेतकऱ्याचे 300 रुपये माफ झाले.

दुसरीकडे मध्य प्रदेशातील शेतकरी कर्जमाफीत घोटाळा झाल्याचा आरोपही करण्यात येतोय. ग्वालियर जिल्ह्यातील 76 सहकारी समित्यांमध्ये हा प्रकार घडल्याचं बोललं जातंय. या समित्यांनी शेतकऱ्यांच्या नावाची यादी ग्रामपंचायतीच्या कार्यालायत लावली. पण यामध्ये असे नावं निघाले, ज्यांनी कधी कर्ज घेतलंच नव्हतं.

शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हा सहकारी बँका आणि सहकारी समित्यांमध्ये तक्रारी दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मते, आम्ही कर्ज घेतलेलं नसतानाही ते माफ करण्यात आलंय. जिल्हा सहकारी बँकेकडून सहकारी समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलं जातं.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.