AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात भारतासह फक्त 9 देशांकडे अणुबॉम्ब, इतर देश का नाही बनवत अण्वस्त्रे?

ज्या देशांकडे अणूबॉम्ब नाही, त्या देशांवर अण्वस्त्र हल्ला झाल्यावर काय करणार? या प्रश्नाचे उत्तर अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर देण्यात आले आहे. त्यानुसार जर अण्वस्त्र नसलेल्या देशांवर हल्ला झाला तर ज्या देशांना अण्वस्त्र ठेवण्याचा अधिकार आहे, ते देश त्या देशांच्या मदतीसाठी जातील.

जगात भारतासह फक्त 9 देशांकडे अणुबॉम्ब, इतर देश का नाही बनवत अण्वस्त्रे?
atomic test
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 01, 2025 | 9:21 AM
Share

जगात 9 देशांकडे अण्वस्त्र आहेत. त्यात भारत, अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्त्राइलचा समावेश आहे. सर्वात जास्त अण्वस्त्र रशियाकडे आहेत. 5580 अण्वस्त्र असून त्यानंतर अमेरिकेचा क्रमांक आहे. अमेरिकेकडे 5044 अण्वस्त्र आहे. संपूर्ण जगात एकूण 12,121 अण्वस्त्र आहेत. म्हणजेच जगातील एकूण अण्वस्त्रांपैकी 90% अण्सस्त्र रशिया आणि अमेरिकेकडे आहे.

अमेरिका, रशिया, चीन, भारत यांच्यासारख्या नऊ देशांकडेच अण्वस्त्र का आहेत? असा प्रश्न निर्माण होत आहे. या देशांशिवाय इतर अनेक देश मिलिट्री पॉवर आहे. तसेच त्यांची अर्थव्यवस्था चांगली आहे. त्यानंतर त्या देशांनी अणू बॉम्ब बनवले नाहीत.

करारापूर्वी त्या देशांकडे अण्वस्त्रे

जर्मनी, दक्षिण कोरिया, जापान आणि ऑस्ट्रेलिया यासारखे देश शक्तीशाली आहेत. त्यानंतर त्या देशांनी अणूबॉम्ब बनवला नाही. त्यामागे कारण न्युक्लियर नॉन-प्रोलिफेरेशन ट्रीटी(NPT) आहे. जगाला अण्वस्त्रपासून वाचवण्यासाठी 1968 मध्ये हा करार करण्यात आला. 1970 च्या दशकात तो लागू करण्यात आला. या करारावर 190 देशांनी सह्या केल्या आहेत. या करारानुसार अणू चाचणीवर बंदी आहे. या करारातंर्गत फक्त अमेरिका, रशिया, इंग्लंड, चीन आणि फ्रॉन्स यांनी अण्वस्त्र ठेवण्याचा अधिकार आहे. कारण या देशांची हा करार अस्तित्वात येण्यापूर्वी अणूचाचणी केली.

इतर देश अण्वस्त्रांशिवाय राहणार?

ज्या देशांकडे अणूबॉम्ब नाही, त्या देशांवर अण्वस्त्र हल्ला झाल्यावर काय करणार? या प्रश्नाचे उत्तर अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर देण्यात आले आहे. त्यानुसार जर अण्वस्त्र नसलेल्या देशांवर हल्ला झाला तर ज्या देशांना अण्वस्त्र ठेवण्याचा अधिकार आहे, ते देश त्या देशांच्या मदतीसाठी जातील.

भारत, पाकिस्तानने कसे बनवले अण्वस्त्रे?

न्यूक्लियर नॉन-प्रोलिफेरेशन ट्रिटीनुसार अमेरिका, रशिया, ब्रिटेन, चीन आणि फ्रान्स अण्वस्त्र ठेऊ शकतात. मग भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्त्रायलने अणूचाचणी कशी केली? भारत आणि पाकिस्तानने अण्वस्त्र करारावर सही केली नाही. उत्तर कोरिया आधीपासून या कराराचा भाग आहे. परंतु अणूचाचणी केल्यानंतर तो करारातून बाहेर पडला. इस्त्रायलने गुपचूप अणूचाचणी केली आहे.

Follow Us
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी