AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानवर भारताची दुसरी मोठी कारवाई, 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले

India Pakistan Tensions: भारताने पाकिस्तानवर दुसरी मोठी कारवाई केली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताने पाकिस्तानवर ड्रोन हल्ले केले आहे. पाकिस्तानमधील 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले करण्यात आले आहे. यासंदर्भात भारताने अधिकृत निवेदनही काढले आहे.

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानवर भारताची दुसरी मोठी कारवाई, 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानवर भारताचा ड्रोन हल्ला
| Updated on: May 08, 2025 | 3:55 PM
Share

India Pakistan Tensions: भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंधूरचा पार्ट 2 केला आहे. भारताने पाकिस्तानवर दुसरी मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने पाकिस्तानवर आता पाकिस्तानमधील शहरांवर ड्रोन हल्ले केले आहेत. पाकिस्तानमधील 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होतो. तो प्रयत्न भारताला हाणून पडला. यासंदर्भात भारत सरकारने अधिकृत पत्रक काढून ड्रोन हल्ला आणि पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचे  म्हटले आहे.

पाकिस्तानकडून भारताच्या नियंत्रण रेषेवर वारंवार गोळीबार सुरु केला आहे. तसेच भारतावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. त्यामुळे भारताने पाकिस्तानला चांगला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. भारताच्या एस ४०० हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानची क्षेपणास्त्र नष्ट केली. त्याचे अवशेष सीमा भागात दिसून येत आहे. भारताने पहिल्यांदाच एस ४०० या हवाई प्रणालीचा वापर भारताने केला आहे. रशियाने विकसित केलेली ही प्रणाली आहे. भारताने रशियाकडून ती घेतली आहे.

भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आली. ड्रोन हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या HQ-9 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली युनिट्सचे मोठे नुकसान झाले आहे. लाहोर व्यतिरिक्त, गुजरांवाला, रावळपिंडी, चकवाल, बहावलपूर, मियांवाली, कराची, चोर, मियांओ आणि अट्टॉक येथेही असे ड्रोन हल्ले झाले आहेत.

भारताने काय म्हटले?

भारत सरकारने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. पीआयबीकडून आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. भारतानेही पाकिस्तानला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे. लाहोरमधील एक हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यात आली आहे.”

पीआयबीने म्हटले आहे की, 8 मे रोजी भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानवर हवाई संरक्षण प्रणालीवर हल्ला केला. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पुंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये तोफगोळे टाकण्यात आले. मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. त्यामुळे भारताचे 12 नागरिक आणि एक सैनिक शहीद झाला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.