AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : अखेर हाजीपूरच्या महिलांची ‘ती’ प्रतिज्ञा पूर्ण, भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करताच लावलं कुंकू

भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर हाजीपूरच्या महिलांनी एकमेकिंना कुंकू लावून आनंद साजरा केला आहे. आमचा बदला पूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Operation Sindoor : अखेर हाजीपूरच्या महिलांची 'ती' प्रतिज्ञा पूर्ण, भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करताच लावलं कुंकू
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 07, 2025 | 3:53 PM
Share

22 एप्रिल रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट होती. या घटनेमुळे अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं होतं. त्यामुळे ज्यांनी या महिलांचं कुंकू पुसलं तो मरत नाही, आपला बदला पूर्ण होत नाही, तोपर्यंत कुंकू लावणार नाही अशी प्रतिज्ञा हाजीपूरच्या महिलांनी केली होती. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे एकूण 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत, भारतानं पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे, त्यानंतर आता हाजीपूरच्या महिलांनी आपल्या कपाळाला कुंकू लावलं आहे.

भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर हाजीपूरच्या गांधी आश्रमातील महिलांनी एकमेकिंना कुंकू लावून आनंद साजरा केला आहे. आज आमचा बदला पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ज्या पद्धतीनं भारतीय लष्कराने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले ते पाहून मनाला खूप बरं वाटलं, अशी प्रतिक्रिया या महिलांनी दिली आहे. तसेच या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी एक पत्र देखील लिहिलं आहे.

भारतानं मध्यरात्रीच्या सुमारास पीओके आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 5 तर पाकिस्तानमधील 4 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यामध्ये एकाही पाकिस्तानमधील सामान्य नागरिकाची जीवितहानी झालेली नाही, मात्र भारतानं ज्या ठिकाणी हल्ले केले तिथे दहशतवाद्यांचे अड्डे नव्हतेच, या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे 26 लोक मारले गेले तर 46 जण जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. तसेच आम्ही भराताचे पाच लढाऊ विमानं पाडल्याचा दावा देखील पाकिस्ताननं केला आहे. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानला चांगलीच धडकी भरल्याचा चित्र आहे. या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.