राऊत म्हणाले, मुंबईचा दादा शिवसेनाच, आता देवेंद्र फडणवीसांनी ‘गिधाडाची’ आठवण करुन दिली

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईचा दादा शिवसेनाच असल्याचं विधान केलं. तसेच आम्ही जर घुसलो तर नागपूरला जाणंही त्यांना मुश्किल होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता.

राऊत म्हणाले, मुंबईचा दादा शिवसेनाच, आता देवेंद्र फडणवीसांनी 'गिधाडाची' आठवण करुन दिली
राऊत म्हणाले, मुंबईचा दादा शिवसेनाच, आता देवेंद्र फडणवीसांनी 'गिधाडाची' आठवण करुन दिली
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 1:47 PM

पणजी: शिवसेना नेते संजय राऊत  (sanjay raut) यांनी मुंबईचा दादा शिवसेनाच (shiv sena) असल्याचं विधान केलं. तसेच आम्ही जर घुसलो तर नागपूरला जाणंही त्यांना मुश्किल होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता. त्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पलटवार केला आहे. शेर कभी गिदड धमकी से डरा नही करते, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत. रोज सकाळी येऊन ते मनोरंजन करत असतात. संपादक असल्याने चर्चेत राहण्यासाठी काय विधाने केली पाहिजे हे त्यांना माहीत आहे, असं सांगतानाच राऊत यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन म्हणणं मांडावं, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

ईडी काय करते हे ईडी सांगेल. ते का करतात तेही ईडी सांगेल. संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. हे जे वक्तव्य आहे तो व्हिक्टिम कार्डचा एक भाग आहे. त्यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी न्यायालयात जाऊन मांडावं, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

राऊतांकडून मनोरंजन

राऊत रोज सकाळी 9 वाजता येऊन मनोरंजन करत असतात. त्यांच्या म्हणण्याला अधिक गांभीर्याने घ्यायची गरज नाही. मोदी सरकारने कुणाला व्हिक्टिमाईज केलं नाही. मोदी सरकारमध्ये असं कधी होत नाही. त्यांनी व्हिक्टिम कार्ड खेळू नये, राऊत हे संपादक आहेत. हेडलाईन कशी द्यावी हे त्यांना माहीत आहे. दिवसभर आपल्यावर फोकस कसा राहील, आपलं नाव चर्चेत कसे राहील याप्रकारचे काम ते करत असतात, असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादीशी युती नाहीच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची स्तुती केली होती. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी असं समीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणतंही नवीन समीकरण नाही. भाजप महाराष्ट्रात विरोधी पक्षात राहूनच काम करेल. पूर्ण शक्तीने आमच्या मेजोरिटीने आम्ही राज्यात सरकार स्थापन करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुणाचा पायपोस कुणात नाही

यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेसचा त्यांच्या लोकांवर विश्वास राहिलेला नाही. भाजपला कोणाला शपथ देण्याची गरज नाही. प्रतिज्ञापत्र देण्याची गरज नाही. काँग्रेस कमकुवत झाली आहे. त्यांच्या केंद्रीय नेत्यांपासून गल्लीतल्या नेत्यांपर्यंत कोणीच कुणाचं ऐकत नाही. पक्षात कुणाचा पायपोस कुणात नाही. त्यामुळे ते कमकुवत झाले आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.

काँग्रेस पाठिंबा देणार का?

लता मंगेशकर यांच्या स्मारकावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. लतादीदी महान होत्या. त्यांच्या स्मारकाचा वाद होऊ नये. सर्वांनी मिळून त्यांचं चांगलं स्मारक निर्माण केलं पाहिजे. राज्यातील सरकार स्मारक करणार असेल तर काँग्रेस त्याला पाठिंबा देणार का? असा सवाल करतानाच काँग्रेसचा एकही नेता लतादीदीच्या अंत्यविधीला उपस्थित नसल्याने हा प्रश्न पडल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

तेव्हा मी काहीच बोललो नाही… नंतर ते माझ्यासाठी आले… पास्टर निमोलरच्या कवितेतून राऊतांचा सावधानतेचा इशारा

बिकिनी असो की घुंगट! अल्लाहू अकबर म्हणणाऱ्या मुलीच्या समर्थनात प्रियंका गांधींचं ट्विट, ट्विटरवर #Bikiniचा पूर

Nashik Murder Mystery | डॉ. सुवर्णा वाजे जळीत कांड; पतीच्या 3 मित्रांची चौकशी, पण शेवटचा मोहरा बाकी!

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.