AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 जानेवारीला दोन मिनिटांचं मौन, हालचालींवरही निर्बंध, शहीद दिवसासाठी केंद्राचा नवा आदेश

देशाच्या स्वातंत्र्यांसाठी बलिदान देणाऱ्यांच्या स्मरणार्थ मौन ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय, यादरम्यान काम आणि हालचालींवरही निर्बंध असतील

30 जानेवारीला दोन मिनिटांचं मौन, हालचालींवरही निर्बंध, शहीद दिवसासाठी केंद्राचा नवा आदेश
| Updated on: Jan 20, 2021 | 2:08 PM
Share

नवी दिल्ली : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या पुण्यतिथीबाबत म्हणजेच 30 जानेवारीबाबत केंद्र सरकारने (Order For Martyrs Day) एक नवा आदेश जारी केला आहे. हा दिवस नेहमीप्रमाणे शहीद दिवसाच्या रुपात साजरा केला जाईल. सोबतच सर्व राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी निर्देश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये देशाच्या स्वातंत्र्यांसाठी बलिदान देणाऱ्यांच्या स्मरणार्थ मौन ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय, यादरम्यान काम आणि हालचालींवरही निर्बंध असतील (Order for Martyrs Day).

शहीद दिवसासाठी जे आदेश गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहेत त्यानुसार, 30 जानेवारीला प्रत्येक वर्षी सकाळी 11 वाजता दोन मिनिटांचं मौन ठेवलं जाईल. त्यासोबतच संपूर्ण देशात त्या दोन मिनिटांसाठी कुठलंही काम किंवा हालचाल होणार नाही. ज्या ठिकाणी सायरनची व्यवस्था असेल त्या ठिकाणी सायरन वाजवून मौनबाबत आठवण करुन दिली जाईल. काही-काही ठिकाणी याबाबत गनने फायर करुनही सूचना दिली जाईल. हा अलर्ट सकाळी 10.59 वाजता केला जाईल. त्यानंतर दोन मिनिटांसाठी मौन ठेवावं लागेल.

ज्या ठिकाणांवर सिग्नल नसेल तिथे सुविधेनुसार कुठल्याही पद्धतीने सूचना पोहोचवली जाऊ शकते. आधी काही कार्यालयांमध्ये मौनदरम्यान कामकाज सुरु राहायचं. सध्या याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महात्मा गांधी यांचा मृत्यू

30 जानेवारी 1948 ला महात्मा गांधी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. 30 जानेवारी 1948 च्या संध्याकाली जेव्हा सायंकाळच्या प्रार्थनेसाठी जात होते तेव्हा नथुराम गोडसेने त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या, यामध्ये महात्मा गांधी यांचा मृत्यू झाला होता (Order For Martyrs Day).

संबंधित बातम्या :

ड्रॅगन फ्रुटच्या वाढत्या प्रसिद्धीचा फायदा घेण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न? फळाचं चक्क नावच बदललं

दोन दिवस तीन अपघात, गुजरात-महाराष्ट्र-बंगाल, 28 मृत्यू, थंडी ठरतेय काळरात्र?

‘काँग्रेसच्या 50 वर्षाच्या काळातील विनाशकारी नितीमुळेच शेतकरी गरीब’, जावडेकरांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.