AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगाम शब्दाचा नेमका अर्थ काय? हिंदू धर्माशी आहे खास कनेक्शन

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर या ठिकाणाचा इतिहास आणि नाव याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हे ठिकाण आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असून, हिंदू पौराणिक कथेनुसारही याचे महत्त्व आहे. हल्ल्यामुळे पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे.

पहलगाम शब्दाचा नेमका अर्थ काय? हिंदू धर्माशी आहे खास कनेक्शन
pahalgam name
| Updated on: Apr 24, 2025 | 7:06 PM
Share

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी २२ एप्रिल दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणाला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते. मात्र पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानतंर आता तिथे भयाण शांतता पसरली आहे. जम्मू काश्मीरमधील सर्वच रस्ते हे ओस पडले आहेत. भारताचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र भीती आणि दहशत पसरली आहे. मात्र पहलगाम नाव नक्की कसं पडलं? त्या ठिकाणी नेमकं काय आहे? याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे हिंसाचार घडवला, त्यामुळे हे ठिकाण चर्चेत आले. काश्मीरमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक असलेल्या पहलगाम या नावाचा अर्थ काय आहे आणि या ठिकाणाला हे नाव कसे पडले, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.पहलगाम हे शहर आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जात होते. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी हिरवीगार झाडं, घनदाट जंगल आणि प्राचीन तलाव पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. या ठिकाणाला जणू स्वर्गाचेच रूप मानले जाते.

पहलगामचा अर्थ काय?

प्रत्येक ठिकाणाच्या नावामागे काहीतरी इतिहास दडलेला असतो. पहलगामच्या बाबतीतही असेच आहे. पहलगाम विकास प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, पहलगामचे नाव दोन कश्मिरी शब्द मिळून बनलेले आहे. यामध्ये ‘पुहेल’ (पहल) म्हणजे मेंढपाळ आणि ‘गोअम’ (गाम) म्हणजे गाव. पूर्वी या ठिकाणाला पुहेलगोअम असे म्हटले जायचे. यानंतर त्याला पहलगाम म्हणून ओळखले जाऊ लागले आणि याचा थेट अर्थ मेंढपाळांचे गाव असा होतो.

काही लोकांच्या मते हिंदू मान्यतेनुसार याला ‘बैलांचे गाव’ असेही म्हटले जाते. मुगल बादशाह अकबर यांचे हे आवडते ठिकाण होते. ते उन्हाळ्यामध्ये येथे राहण्यासाठी यायचे. जेव्हा ब्रिटिश भारतात आले, तेव्हा त्यांनाही या थंड हवेच्या ठिकाणाने खूप आकर्षित केले होते.

भगवान शंकरासोबत आहे नाते

हिंदू पौराणिक कथांनुसार, पहलगामचा संबंध ऋषी कश्यप यांच्याशी जोडलेला आहे. या ठिकाणी अनेक संत आणि ऋषीमुनींना आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाले. या ठिकाणी भगवान शंकराचे ममलेश्वर मंदिर देखील आहे. असे म्हटले जाते की जेव्हा भगवान शिव माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगण्यासाठी अमरनाथ गुहेकडे जात होते, तेव्हा त्यांनी आपला वाहन नंदी बैलाला याच ठिकाणी सोडले होते. अमरनाथ गुहेचा मार्ग येथून केवळ 48 किलोमीटर अंतरावर आहे, जो भाविक 3 ते 5 दिवसांत पूर्ण करतात.

पहलगाम हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. मात्र या शांत ठिकाणाला दहशतवादाच्या क्रूर घटनेमुळे कायमचा डाग लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पहलगाम केवळ आपल्या सौंदर्यासाठी नव्हे, तर येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणींसाठीदेखील ओळखले जाईल.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत