AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जनतेने वारंवार नाकारलेली लोक संसदेत’,…नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधींवर मोठा हल्ला

Parliament Winter Session Narendra Modi: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या निवडणुकांना विद्यामान सरकारला अधिक ताकद दिली आहे. आता संसदेत प्रत्येक मुद्यावर सखोल विश्लेषण झाले पाहिजे. जग भारताकडे आशेने पाहत आहे. जगात भारताचे आकर्षण वाढत आहे.

'जनतेने वारंवार नाकारलेली लोक संसदेत',...नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधींवर मोठा हल्ला
नरेंद्र मोदी
| Updated on: Nov 25, 2024 | 10:58 AM
Share

Parliament Winter Session Narendra Modi: महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीनंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात मणिपूर हिंसाचार आणि गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत बजावलेला वॉरंट या प्रकरणांवरुन केंद्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधक करणार आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातील विधानसभेत आणि पोटनिवडणुकीत मिळालेल्या मोठ्या विजयामुळे एनडीए सरकारचे मनोधर्य वाढले आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जाण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जनतेने ८० ते ९० वेळा नाकारलेली लोक संसदेत गोंधळ घालत असल्याचा आरोप केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांनी हा हल्ला करत अधिवेशनात भाजप आक्रमक राहणार असल्याचे दाखवून दिले.

ती लोक संसदेचे काम चालू देत नाही

नरेंद्र मोदी म्हणाले, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १६ विधेयक मांडण्यात येणार आहेत. या अधिवेशनातील चर्चेत जास्तीत जास्त खासदारांनी सहभागी व्हावे. परंतु जनतेने ज्यांना आतापर्यंत ८० ते ९० वेळा नाकारले आहे, ते संसदेत चर्चा होऊ देत नाही. संसदेचे कामकाज ठप्प करतात. ते लोकांच्या अपेक्षा समजून घेत नाही. त्यामुळे जनतेला वारंवार त्यांना नाकारावे लागत आहे, असे राहुल गांधी यांचे नाव न घेता मोदी म्हणाले.

संसदेचे काम ठप्प झाल्यावर सर्वाधिक वेदना नवीन खासदारांना होत आहे. कारण त्या खासदांचे अधिकार काही लोक दाबून टाकतात. त्यांना संसदेत बोलू दिले जात नाही. लोकशाहीत मागील पुढीने पुढील पिढीला तयार करायचे असते. काही विरोधी पक्ष जबाबदारीने काम करत आहे. संसदेचे काम चालू देण्याची त्यांची इच्छा असते. परंतु ज्यांना जनतेने नाकारला आहे, ते त्यांना दाबून टाकतात, असे मोदी यांनी म्हटले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या निवडणुकांना विद्यामान सरकारला अधिक ताकद दिली आहे. आता संसदेत प्रत्येक मुद्यावर सखोल विश्लेषण झाले पाहिजे. जग भारताकडे आशेने पाहत आहे. जगात भारताचे आकर्षण वाढत आहे. त्याला बळ मिळावे, असे उदाहरण आपण ठेवले पाहिजे. संसदेतून तो संदेश गेला पाहिजे, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.