AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला भारताचा हेवा : PM MODI यांची गिर अभयारण्याला भेट, घेतला जंगल सफारीचा अनुभव

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी वन्य जीव दिनानिमित्त मोदी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या (NBWL) बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी जंगल सफारीचा आनंद घेतला आहे.

जगाला भारताचा हेवा : PM MODI यांची गिर अभयारण्याला भेट, घेतला जंगल सफारीचा अनुभव
PM Modi visits Gir Sanctuary, experiences jungle safari
| Updated on: Mar 03, 2025 | 3:47 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या सोमनाथ मंदिरात महादेवाची पूजा केली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त जुनागढ येथे जंगली सफारीचा आनंद घेतला. जगभरात वाघांची संख्या स्थिर किंवा घटत असताना भारतात मात्र वाघांची संख्या सतत वाढतच आहे. यामागे भारत इकॉलॉजी आणि इकॉनॉमी यात अंतर राखत नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की अन्नसाखळीत प्रत्येक प्राणी महत्वाचा भूमिका बजावत असतो, त्यामुळे त्याचे रक्षण करणे महत्वाचे असते असेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

PM Modi visits Gir Sanctuary

जगाला भारताचा हेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी वन्य जीव दिनानिमित्त राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या (NBWL) बैठकीचे अध्यक्षस्थान ते भूषवणार आहेत. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी जुनागड जिल्ह्यातील गिर वन्यजीव अभयारण्याचे मुख्यालय असलेल्या सासन गिर येथे पोहोचले आणि त्यांनी जंगल सफारीचा आनंद घेतला. भारत हा असा देश आहे जिथे निसर्गाशी संबंधित गोष्टींचे संरक्षण करणे हा भारतीयांच्या संस्कृतीचा एक भाग आहे. भारताने वन्यजीवांच्या संरक्षणात अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. अनेक देशांमध्ये वाघांची लोकसंख्या स्थिर आहे किंवा कमी होत आहे, परंतु भारतात ती वेगाने का वाढत आहे? असा प्रश्न जगभरातील वन्यजीव प्रेमींच्या मनात असा निर्माण होत आहे, त्यांना याचा हेवा वाटत आहे असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

इकॉलॉजी आणि इकॉनॉमी वेगळे नाही

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृती आणि आपल्या येथील समृद्ध जैव विविधता आणि पर्यावरणाबद्दल असलेली आपली नैसर्गिक ओढ ही या यशाचे कारण आहे. ते म्हणाले की, आम्ही इकॉलॉजी आणि इकॉनॉमी यांच्यातील वेगळेपणावर विश्वास ठेवत नाही, तर आम्ही दोघांमधील सह अस्तित्वाला महत्त्व देतो, म्हणजेच दोन्हीही देशासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे

pm modi visit gir Sanctuary

भारताच्या योगदानाचा अभिमान

पृथ्वीवरील अविश्वसनीय जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आपण आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला पाहिजे. निसर्गातील प्रत्येक प्रजातीची अन्न साखळीत स्वतःची महत्त्वाची भूमिका आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांचे भविष्य आपण सुरक्षित करूया. वन्यजीवांच्या संवर्धन आणि संरक्षणात भारताच्या योगदानाचा आम्हाला अभिमान आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.