AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4399 दिवस… मोदींच्या नेतृत्वाने देशाला आत्मविश्वास दिला; मेघना बोर्डीकर यांच्याकडून गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४३९९ दिवसांचा विक्रम करत देशाच्या विकासात मैलाचा दगड रोवला. त्यांच्या १२ वर्षांच्या नेतृत्वाने भारताला जागतिक स्तरावर आत्मविश्वास आणि नवी ओळख दिली आहे. महिला सक्षमीकरण, डिजिटल इंडिया, आणि प्रत्येक क्षेत्रातील प्रगती हे मोदी सरकारच्या यशस्वी वाटचालीचे वैशिष्ट्य आहे.

4399 दिवस... मोदींच्या नेतृत्वाने देशाला आत्मविश्वास दिला; मेघना बोर्डीकर यांच्याकडून गौरव
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Jun 10, 2026 | 12:26 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 4399 दिवस पंतप्रधानपदी राहण्याचा नवा विक्रम मोदींनी केला आहे. हा विक्रम आधी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर होता. मात्र, नेहरूंनंतर सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले मोदी हे दुसरे महत्त्वाचे नेते ठरले आहेत. मोदींचा हा 12 वर्षाचा कालखंड भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील विक्रमांचा आहे. हा कालखंड भारताच्या जागतिक पटलावरील उदयाचा आहे. मोदींच्या नेतृत्वाने या 12 वर्षात देशाला नवा आत्मविश्वास दिला आहे, असं मत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केलं आहे.

मंत्री मेघना बोर्डीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करत मोदींच्या नेतृत्वात भारत कसा झपाट्याने प्रगतीपथावर गेल्याचं नमूद केलं आहे. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दक्षिण आशियातील देशांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा केवळ एक सत्तांतराचा औपचारिक कार्यक्रम नव्हता. तर शपथविधीनंतर गेल्या १२ वर्षांच्या कालखंडावर नजर टाकली, तर हा क्षण संपूर्ण देशाच्या स्थित्यंतराचा आणि अनेक दशकांच्या निद्रेनंतर झालेल्या राष्ट्र उदयाचा सोहळा होता. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कालखंडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी देशाला आत्मविश्वास दिला, नेतृत्व दिले, देशाची स्वतंत्र ओळख निर्माण करीत भारताचे नाव जगामध्ये नव्या उंचीवर नेले; त्याचवेळी देशातील जनतेची मानसिकताच बदलून टाकली. त्यामुळेच, आज भारत प्रत्येक क्षेत्रामध्ये घोडदौड करीत आहे आणि जगही भारताकडे मोठ्या विश्वासाने आणि आशेने पाहात आहे, असं मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं आहे.

महिलांना आत्मसन्मान

सरकारच्या पहिल्या दिवसापासून ‘सब का साथ, सब का विकास’ हेच मोदींचे ब्रीदवाक्य आहे. आतापर्यंत कायम गृहीत धरलेला महिला वर्ग म्हणजे निम्मी लोकसंख्या. वर्षानुवर्षे मुख्य प्रवाहाच्या काठावरच राहिलेल्या महिलांमध्ये मोदींनी सुरक्षिततेची भावना निर्माण केली, त्यातून महिलांमध्ये आत्मविश्वास आला. ‘बेटी बचाव’चा नारा देतानाच मुलींचे शिक्षण आणि पायाभूत सुविधांवरही लक्ष दिले. त्यामुळे मुलींच्या शाळागळतीचे प्रमाण आज कमी झाले आहे. विज्ञानज्योती योजनेतून ग्रामीण भागातील मुलींना अभियांत्रिकी व विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कारकीर्द घडविण्यासाठी मार्गदर्शन आणि अन्य सहाय्य मिळाले. त्याचा लाभ देशभरातील ८० हजार मुलींना झाला आहे. तर, आयआयटी व एनआयटीमध्ये अतिरिक्त २० टक्के जागा निर्माण केल्या. त्या जागांवरील प्रवेशामुळे आयआयटीमधील मुलींचे प्रमाण आठ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढले आहे, असंही बोर्डीकर यांनी म्हटलं आहे. प्रत्येक योजनेतून महिला वर्गाला संरक्षण, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान मिळाला. त्यांच्यातील वाढलेल्या आत्मविश्वासातून आता ‘ड्रोन दीदी’सारख्या योजना राबविण्यात येत आहेत आणि त्यामुळे महिलांचा आत्मनिर्भर होण्याचा मार्ग खुला झाला आहे, असं त्यांनी सांगितलं.

विकासाची पायाभरणी

पारदर्शकतेला तंत्रज्ञानाची जोड देताना, डिजिटल पेमेंट अर्थव्यवस्थेला प्रोत्सादन दिले. ‘यूपीआय’च्या माध्यमातून होणारे डिजिटल व्यवहार हा आज दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून शासनाच्या सेवा नागरिकांच्या मोबा लपर्यंत पोचल्या आहेत. आज भारत जगातील सर्वांत मोठी डिजिटल पेमेंट अर्थव्यवस्था बनलेले आहे. २०२६ च्या मे महिन्यात यूपीआय व्यवहारांचे एकूण मूल्य सुमारे ३० लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोचले आहे. एप्रिल २०१६ मध्ये यूपीआय पद्धती सुरू झाल्यापासूनचा हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा विक्रम आहे, असं त्यांनी नमूद केलंय.

मोदींच्या पंतप्रधानपदाचा प्रवास पाहिला असता, स्पष्टपणे जाणवते, भारतात विकासाची गती, आत्मविश्वास आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा यात मोठी वाढ झाली आहे. हा प्रवास केवळ एका सरकारचा कालखंड नाही, तर तो भारताच्या वाढत्या आत्मविश्वासाचा, नव्या आकांक्षांचा आणि विकासाच्या नव्या पर्वाचा इतिहास आहे. सामान्य नागरिकाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून भारताला जागतिक नेतृत्वाच्या दिशेने नेण्याचा हा प्रयत्न आगामी काळातही देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ ठरेल, अशी अपेक्षा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार