AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parliament Monsoon Session : ऑपरेशन सिंदूर आणि सीजफायरवर प्रश्न, अखेर सरकारने संसदेत सांगितलं सत्य

Parliament Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या गदारोळादरम्यान सरकारने ऑपरेशन सिंदूरवर उत्तर दिलय. ऑपरेशन सिंदूर आणि सीजफायरवर प्रश्न झाला. सीजफायरवरुन अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. कारण आपली बाजू वरचढ असताना सीजफायरची घोषणा झाली.

Parliament Monsoon Session : ऑपरेशन सिंदूर आणि सीजफायरवर प्रश्न, अखेर सरकारने संसदेत सांगितलं सत्य
फाईल फोटो
| Updated on: Jul 25, 2025 | 3:01 PM
Share

संसदेच पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या सत्रात आतापर्यंत मोठा गदारोळ पहायला मिळाला आहे. विरोधी पक्षाचा विरोध आणि घोषणाबाजीमुळे अनेकदा कामकाज स्थगित करावं लागलय. सरकारकडून ऑपरेशन सिंदूरवर उत्तर देण्यात आलं. सरकारने सांगितलं ऑपरेशन सिंदूरची सुरुवात का केली?. ऑपरेशन सिंदूरवर राज्यसभेत सरकारने उत्तर दिलय. सपा खासदाराने विचारलं की, काय ऑपरेशन सिंदूरची घोषणा आंतरराष्ट्रीय दबावापोटी झाली होती?. सपा खासदार रामजी लाल सुमन यांनी विचारलं की, ऑपरेशन सिंदूर सुरु असताना अचानक युद्धविरामाच्या घोषणेचा सैन्याच्या मनोबलावर काय परिणाम झाला?. कारण आपलं सैन्य त्यावेळी यशस्वी ठरत होतं. अचानक झालेला युद्धविराम सैन्याचं मनोबल आणि देशवासियांच्या भावनेच्या विरोधात होता.

पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाला उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची सुरुवात झाली. याचा उद्देश दहशतवादी इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट करणं आणि भारतात दहशतवाद्यांना पाठवण्यापासून रोखणं हा होता, असं सरकारकडून उत्तर देण्यात आलं.

सरकारने संसेदत काय सांगितलं?

“भारताची कारवाई ही टार्गेट ठरवून आणि मोजून-मापून होती. पाकिस्तानने काही सैन्य ठिकाणांशिवाय भारतीय नागरिक क्षेत्रांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या या चिथावणीखोर कारवायांना भारतीय सैन्य दलाने कठोर आणि निर्णायक प्रत्युत्तर दिलं. त्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं” असं सरकारकडून सांगण्यात आलं.

DGMO मध्ये झालेल्या चर्चेचा तपशील काय?

त्यानंतर 10 मे 2025 रोजी पाकिस्तान सैन्य अभियानाच्या महासंचालकांनी आपल्या भारतीय समकक्षांसोबत चर्चा केली. त्यांनी गोळीबार आणि सैन्य कारवाई रोखण्याची विनंती केली. त्यावर त्याच दिवशी सहमती बनली. त्यानंतर सीजफायरची घोषणा करण्यात आली.

पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्धवस्त

22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले. पहलगामचा बदला घेण्यासाठीच भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. त्यात पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्धवस्त करण्यात आले.

Follow Us
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा
मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
Rajyasabha | मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक,
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक, CJP च्या इशाऱ्यानंतर मोठा डाव?
कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर
Pune | कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर चढले!
आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कप
Shivsena | आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद