AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parliament Monsoon Session : ऑपरेशन सिंदूर आणि सीजफायरवर प्रश्न, अखेर सरकारने संसदेत सांगितलं सत्य

Parliament Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या गदारोळादरम्यान सरकारने ऑपरेशन सिंदूरवर उत्तर दिलय. ऑपरेशन सिंदूर आणि सीजफायरवर प्रश्न झाला. सीजफायरवरुन अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. कारण आपली बाजू वरचढ असताना सीजफायरची घोषणा झाली.

Parliament Monsoon Session : ऑपरेशन सिंदूर आणि सीजफायरवर प्रश्न, अखेर सरकारने संसदेत सांगितलं सत्य
फाईल फोटो
| Updated on: Jul 25, 2025 | 3:01 PM
Share

संसदेच पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या सत्रात आतापर्यंत मोठा गदारोळ पहायला मिळाला आहे. विरोधी पक्षाचा विरोध आणि घोषणाबाजीमुळे अनेकदा कामकाज स्थगित करावं लागलय. सरकारकडून ऑपरेशन सिंदूरवर उत्तर देण्यात आलं. सरकारने सांगितलं ऑपरेशन सिंदूरची सुरुवात का केली?. ऑपरेशन सिंदूरवर राज्यसभेत सरकारने उत्तर दिलय. सपा खासदाराने विचारलं की, काय ऑपरेशन सिंदूरची घोषणा आंतरराष्ट्रीय दबावापोटी झाली होती?. सपा खासदार रामजी लाल सुमन यांनी विचारलं की, ऑपरेशन सिंदूर सुरु असताना अचानक युद्धविरामाच्या घोषणेचा सैन्याच्या मनोबलावर काय परिणाम झाला?. कारण आपलं सैन्य त्यावेळी यशस्वी ठरत होतं. अचानक झालेला युद्धविराम सैन्याचं मनोबल आणि देशवासियांच्या भावनेच्या विरोधात होता.

पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाला उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची सुरुवात झाली. याचा उद्देश दहशतवादी इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट करणं आणि भारतात दहशतवाद्यांना पाठवण्यापासून रोखणं हा होता, असं सरकारकडून उत्तर देण्यात आलं.

सरकारने संसेदत काय सांगितलं?

“भारताची कारवाई ही टार्गेट ठरवून आणि मोजून-मापून होती. पाकिस्तानने काही सैन्य ठिकाणांशिवाय भारतीय नागरिक क्षेत्रांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या या चिथावणीखोर कारवायांना भारतीय सैन्य दलाने कठोर आणि निर्णायक प्रत्युत्तर दिलं. त्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं” असं सरकारकडून सांगण्यात आलं.

DGMO मध्ये झालेल्या चर्चेचा तपशील काय?

त्यानंतर 10 मे 2025 रोजी पाकिस्तान सैन्य अभियानाच्या महासंचालकांनी आपल्या भारतीय समकक्षांसोबत चर्चा केली. त्यांनी गोळीबार आणि सैन्य कारवाई रोखण्याची विनंती केली. त्यावर त्याच दिवशी सहमती बनली. त्यानंतर सीजफायरची घोषणा करण्यात आली.

पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्धवस्त

22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले. पहलगामचा बदला घेण्यासाठीच भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. त्यात पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्धवस्त करण्यात आले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.