AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mann ki Baat: पंतप्रधान मोदींकडून कौतूक, जाणून घ्या झारखंडमधील अ‍ॅलोवेरा व्हिलेजबद्दल

रांचीजवळील देवरी गावातील महिलांनी मंजू कच्छप जी यांच्या नेतृत्वाखाली बिरसा कृषी विद्यापीठातून कोरफड लागवडीचे प्रशिक्षण घेतले होते. यानंतर त्यांनी कोरफडीची लागवड सुरू केली. या शेतीचा केवळ आरोग्य क्षेत्रात फायदा झाला नाही, तर या महिलांचे उत्पन्नही वाढले. | aloevera village

Mann ki Baat:  पंतप्रधान मोदींकडून कौतूक, जाणून घ्या झारखंडमधील अ‍ॅलोवेरा व्हिलेजबद्दल
अ‍ॅलोवेरा व्हिलेज
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Sep 26, 2021 | 1:00 PM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात झारखंडमधील एका गावाविषयी कौतुकोद्गार काढले. त्यामुळे झारखंडमधील देवरी हे गाव अचानक प्रकाशझोतात आले आहे. अ‍ॅलोवेरा व्हिलेज या टोपणनावाने ओळखले जाणारे देवरी हे गाव रांचीपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये या गावाची यशोगाथा कथन केली. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, सध्या आपल्याला सर्वत्र कोरोनाविषयी ऐकायला मिळत आहे. शंभर वर्षातील सर्वात मोठा साथीचा रोग असलेल्या कोरोनाने आपल्या बरेच काही शिकवले आहे. मात्र, त्यामुळे हेल्थकेअर आणि वेलनेस या क्षेत्राविषयीची लोकांची जागरुकता वाढल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

भारतात नैसर्गिक उत्पादने मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, जी निरोगीपणासाठी खूप फायदेशीर आहेत. यासाठी त्यांनी देवरी गावातील कोरफडीच्या शेतीचे उदाहरण दिले. रांचीजवळील देवरी गावातील महिलांनी मंजू कच्छप जी यांच्या नेतृत्वाखाली बिरसा कृषी विद्यापीठातून कोरफड लागवडीचे प्रशिक्षण घेतले होते. यानंतर त्यांनी कोरफडीची लागवड सुरू केली. या शेतीचा केवळ आरोग्य क्षेत्रात फायदा झाला नाही, तर या महिलांचे उत्पन्नही वाढले. कोविड -19 साथीच्या काळातही त्याने चांगले उत्पन्न मिळवले. याचे एक प्रमुख कारण म्हणजे सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपन्या थेट त्यांच्याकडून कोरफड खरेदी करत होत्या. आज सुमारे 40 महिलांची टीम या कामात सामील आहे आणि कोरफडीची लागवड अनेक एकरांमध्ये केली जाते.

कोरफडीच्या शेतीमुळे गावकऱ्यांना फायदा

डिसेंबर 2018 मध्ये, भारतीय कृषी संशोधन परिषद, ICAR (भारतीय कृषी संशोधन परिषद) आणि बिरसा कृषी विद्यापीठाने आदिवासी उपयोजने अंतर्गत देवरी गावात सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर कोरफडीच्या लागवडीसाठी या परिसराची निवड करण्यात आली. तेव्हापासून हे गाव अ‍ॅलोवेरा व्हिलेज म्हणून ओळखले जाऊ लागले. गावातील बहुतांश महिलांनी कोरफडीच्या लागवडीमध्ये रस दाखवला. काही वर्षातच या गावाची चर्चा झारखंडमध्येच नव्हे तर देशपातळीवर होऊ लागली.

देवरी पंचायतीच्या प्रमुख मंजू कच्छप स्वत: देखील कोरफडची शेती करतात. उन्हाळ्यात काही दिवसांच्या अंतराने सिंचन आवश्यक असते, तर इतर हंगामात कोरफडीला पाण्याची विशेष गरज नसते. कोरफडीच्या लागवडीसाठी इतर कोणताही विशेष खर्च होत नाही. बाजारात कोरफडीची रोपं सहज उपलब्ध असतात. मात्र, गावात कोरफडीवर प्रक्रिया करणाऱ्या केंद्राची स्थापना झाली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न आणखी वाढेल, असे मंजू कच्छप यांनी सांगितले.

औषधी गुणांमुळे कोरफडीला मागणी

कोरफडीत अनेक औषधी गुण असतात. कावीळसह इतर अनेक आजारांवर कोरफडीचा वापर केला जातो. याशिवाय सौंदर्यप्रसाधने, फेस वॉश, साबण बनवण्यासह इतर कामांमध्ये कोरफड वापरली जाते. मोठ्या शहरांतील लोक आता कोरफडीचा वापर पेय म्हणून देखील करत आहेत. या गुणांमुळे, रांची आणि आसपासचे लोक मोठ्या संख्येने कोरफड पाने खरेदी करण्यासाठी येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा करणार आणखी 2000 रुपये; जाणून घ्या सर्वकाही

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; शेतमालाच्या साठवणुकीसाठी आता घरीच उभारता येणार सौरउर्जेवर चालणारे कोल्ड स्टोरेज युनिट

शेतकऱ्यांनो महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा अन् रब्बीचे बियाणे मिळवा, हरभऱ्यावर अधिकचा भर

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ