AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi Speech : ‘EVM जिवंत आहे की मेलं’ काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

PM Narendra Modi Speech : "इंडिया आघाडीचे नेते ईव्हीएमला विरोध करतात. त्यांच्यासाठी टेक्नोलॉजीच महत्त्व नाही. ते टेक्नोलॉजी स्वीकारायला तयार नाहीत. इंडिया आघाडीवाले मागच्या शतकातले लोक आहेत. प्रगती, आधुनिकता आणि टेक्नोलॉजीला त्यांचा विरोध आहे" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Narendra Modi Speech : 'EVM जिवंत आहे की मेलं' काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
PM Narendra Modi
| Updated on: Jun 07, 2024 | 1:59 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भाजप्राप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय नेतेपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी उपस्थित खासदारांना मार्गदर्शन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी EVM वरुन इंडिया आघाडीवर निशाणा साधला. “4 जूनला निकाल येत होते, तेव्हा मी कामात व्यस्त होतो. त्यावेळी मी कोणाला तरी विचारलं, आकडे वैगेरे ठीक आहेत. पण मला सांग, EVM जिवंत आहे की मेलं. कारण या लोकांनी आधीच ठरवलेलं भारताच्या लोकशाहीवरचा विश्वास उडाला पाहिजे, म्हणून ईव्हीएमला शिव्या घातल होते. पण 4 जूनच्या संध्याकाळी त्यांना टाळी लागली. EVM ने त्यांना शांत केलं” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“ही भारताच्या लोकशाहीची, निष्पक्षतेची, निवडणूक आयोगाीची ताकद आहे. मी आशा करतो आता पुढची पाच वर्ष EVM चा आवाज ऐकू येणार नाही. 2029 मध्ये पुन्हा EVM घेऊन येतील. निवडणूक काळात मी पाहिलं, प्रत्येक तिसऱ्यादिवशी निवडणूक आयोगाच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. हे सर्व करणारी एकच टोळी होती. हे सर्व तेच लोक होते, ज्यांचा लोकशाहीवर अविश्वास आहे” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

‘ताकदीचा मोठा हिस्सा तिथे खर्च झाला’

“सुप्रीम कोर्टाचा वापर करुन अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाच्या ताकदीचा मोठा हिस्सा तिथे खर्च झाला. बरीच निराशा घेऊन ते मैदानात उतरले होते. निवडणूक आयोगावर हल्ला केला. निकाल काहीही लागो, भारताला बदनाम करणं हे त्यांच षडयंत्र होतं. देश त्यांना कधीही माफ करणार नाही” असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

‘इंडिया आघाडीवाले मागच्या शतकातले’

“इंडिया आघाडीचे नेते ईव्हीएमला विरोध करतात. त्यांच्यासाठी टेक्नोलॉजीच महत्त्व नाही. ते टेक्नोलॉजी स्वीकारायला तयार नाहीत. इंडिया आघाडीवाले मागच्या शतकातले लोक आहेत. प्रगती, आधुनिकता आणि टेक्नोलॉजीला त्यांचा विरोध आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Follow Us
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ.
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!.
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत.
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो.
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे...
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे....
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली..
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली...
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी.....
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं.......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं........
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.