AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीनं धाव घेतली त्यावेळेस टोळकं तिच्या बापावर वार करत होतं, भाजप नेत्याच्या हत्येचा थरारक घटनाक्रम

ज्यांची हत्या झाली ते राजकीयदृष्ट्या वयाने तरुण होते. पण विचारसरणीची लढाई खून, हत्येपर्यंत आलीय. पश्चिम बंगाल, केरळमध्ये अशा राजकीय हत्यांचं सत्र थांबताना दिसत नाहीय. त्यातली भाजप नेत्याची ज्या पद्धतीनं हत्या केली गेलीय, ते अंगावर काटा आणणारं आहे.

मुलीनं धाव घेतली त्यावेळेस टोळकं तिच्या बापावर वार करत होतं, भाजप नेत्याच्या हत्येचा थरारक घटनाक्रम
रणजित श्रीनिवास आणि के.एस.शान यांची हत्या
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 10:43 AM
Share

फक्त केरळच नाही तर दोन राजकीय हत्यांनी देश हादरुन गेलाय. ह्या दोन्ही हत्या चोवीस तासाच्या अंतरानं घडलेल्या आहेत. त्या ज्या पद्धतीनं घडल्यात, त्यानं अंगावर काटा उभा रहातो. आधी एसडीपीआय नेत्याची हत्या केली गेली. (Kerala Political Killings) तिचा बदला म्हणून भाजपच्या राज्य सचिवाची हत्या करण्यात आली. ज्यांची हत्या झाली ते राजकीयदृष्ट्या वयाने तरुण होते. पण विचारसरणीची लढाई खून, हत्येपर्यंत आलीय. पश्चिम बंगाल, केरळमध्ये अशा राजकीय हत्यांचं सत्र थांबताना दिसत नाहीय. त्यातली भाजप नेत्याची ज्या पद्धतीनं हत्या केली गेलीय, ते अंगावर काटा आणणारं आहे.

मुलीसमोर हत्या भाजपचे राज्य सचिव (BJP Leader killed) होते रणजित श्रीनिवास. त्यांची आई मंदिरात गेलेली होती आणि ते स्वत: लहान मुलीला ट्युशनला सोडून घरी परतले होते. सकाळची वेळ होती. त्याच वेळेस दहा एक जणांचं एक टोळक्यानं त्यांना घरात गाठला आणि त्यांच्यावर सपासप वार केले, चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. त्याच वेळेस त्यांची मुलगी धावत आली तर हल्लेखोरांनी तिच्यावरही तलवार रोखली. पत्नी मदतीसाठी आली तर तिलाही शस्त्रानं धमकावलं गेलं. मुलीच्या समोरच हल्लेखोरांनी रणजित श्रीनिवास यांचा जीव घेतला. मुलीकडे वडीलांची रक्ताच्या थारोळ्यातली अवस्था बघत रहाण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. अनेक गंभीर जखमी झाल्यानं शेवटी रणजित श्रीनिवास यांचा जीव गेला. विशेष म्हणजे त्याच दिवशी ते ओबीसी मोर्चाच्या बैठकीसाठी कोचीला जाणार होते. पण त्याआधीच त्यांची हत्या झाली. श्रीनिवास यांनी 2016 साली भाजपच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक लढवली होती. एका सामान्य कुटूंबातून आलेल्या रणजित श्रीनिवास यांचं आता कुठे राजकीय करिअर सुरु झालं होतं. पण ते बहरण्याच्या आधीच संपलं.

रणजित श्रीनिवासची हत्या का? ह्या प्रश्नाचं उत्तर आदल्या दिवशी जी घटना घडली त्यात आहे. दोन्ही घटना ह्या केरळच्या अल्लफुजा जिल्ह्यातल्या आहेत. शनिवारी रात्री SDPI चे जनरल सेक्रेटरी के.एस. बाईकवरुन जात होते. (SDPI Leader Killed) ही घटना आहे मन्नाशेरीतली आहे. त्याच वेळेस एका कारनं त्यांच्या बाईकला धडक दिली आणि ते जागेवर कोसळले. त्यानंतर कारमधून एक टोळकं खाली उतरलं आणि खाली पडलेल्या के.एस. शानवर हल्ला केला. त्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्याही चेहऱ्यावर गंभीर जखमा केल्या गेल्या. नंतर त्यांना आधी लोकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि नंतर कोचीला हलवलं, तिथं रात्री 11.30pm ला मृत घोषीत करण्यात आलं. SDPI (Social Democratic Party of India) ही PFI (Popular Front of India) ची राजकीय शाखा आहे. शान हे अवघ्या 39 वर्षांचे होते तर रणजित श्रीनिवास हे 45 वर्षांचे.

हे सुद्धा वाचा:

दुष्काळात तेरावा : सोयाबीनसह आठ शेतीमालाच्या वायद्यांवरही निर्बंध, काय होणार दरावर परिणाम?

Mumbai Water Taxi: नव्या वर्षात मुंबईकरांना गिफ्ट, जानेवारी पंतप्रधानांच्या हस्ते वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन!

Nashik Omicron| कळते पण वळत नाही; दुसरा डोस फक्त 40 टक्के लोकांनीच घेतला, धास्ती प्रशासनाला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.