AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवृत्तीचं वय आणि पेन्शन रकमेत वाढ?, केंद्राचं कर्मचाऱ्यांना ‘डबल’ गिफ्ट; सरकारची नवी योजना

केंद्र सरकारनं लष्करात भरतीसाठी इच्छुक युवकांसाठी नुकतीच नव्या योजनेची घोषणा केली होती. केंद्र सरकारने अग्निपथ भरती योजनेची आखणी केली आहे.

निवृत्तीचं वय आणि पेन्शन रकमेत वाढ?, केंद्राचं कर्मचाऱ्यांना ‘डबल’ गिफ्ट; सरकारची नवी योजना
पेन्शन Image Credit source: tv9
| Updated on: Jun 15, 2022 | 7:16 PM
Share

नवी दिल्ली- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. केंद्र सरकार (Central Government) कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय आणि निवृत्तीवेतनाच्या रकमेत वाढ करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीनं पंतप्रधानांसमोर हा प्रस्ताव ठेवला आहे. समितीनं देशातील नागरिकांचे काम करण्याचे वय वाढविण्याविषयी शिफारस केली आहे. यासोबतच सल्लागार समितीनं कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचे (Retirement) वय वाढविण्यासोबत युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीम (Universal Pension System) सुरू करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्याचं केद्राला सुचविलं आहे. समितीच्या अहवालानुसार, कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला किमान 2000 रुपयांचे निवृत्तीवेतन द्यायला हवं. देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची भूमिका समितीच्या या शिफारशीच्या मागे आहे.

देशातील कार्यगटाच्या वयोमर्यादेत वाढ करण्यासाठी सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याची आवश्यकता असल्याचं समितीनं अहवालात म्हटलं आहे. सामाजिक सुरक्षा प्रणालीवर अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी महत्वाचं असल्याचं समितीचं म्हणणं आहे. अहवालात 50 वर्षापुढील व्यक्तींसाठी कौशल्य विकासाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.

केंद्र व राज्य सरकारांनी कौशल्य विकासाच्या धोरणांची आखणी करावी. असंघटित क्षेत्रातील कामगार, निर्वासित तसेच स्थलांतरितांचा देखील यामध्ये समावेश करावा.

जागतिक लोकसंख्या दृष्टीकोन अहवालाचा आधार समितीनं अहवाल निर्मितीवेळी घेतला आहे. वर्ष 2050 पर्यंत भारतात तब्बल 32 कोटी ज्येष्ठ नागरिक असणार आहेत. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत 19.5 टक्के व्यक्ती सेवानिवृत्तीच्या श्रेणीत समाविष्ट होतील. वर्ष 2019 मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या 10 टक्के म्हणजे 14 कोटी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक वर्गवारीच्या कक्षेत असणार आहेत.

युवकांना रोजगार संधी-

केंद्र सरकारनं लष्करात भरतीसाठी इच्छुक युवकांसाठी नुकतीच नव्या योजनेची घोषणा केली होती. केंद्र सरकारने अग्निपथ भरती योजनेची आखणी केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केलेल्या योजनेत तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे. यातूनच रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा होणार आहे. येत्या काही महिन्यांत योजनेला मूर्त स्वरुप दिलं जाणार आहे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...