AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चर्चा नकोच, काळा कृषी कायदाच रद्द केला पाहिजे; राहुल गांधी कडाडले

कृषी कायदा रद्द व्हावा म्हणून शेतकऱ्यांचे जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जंतरमंतरवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. (rahul gandhi)

चर्चा नकोच, काळा कृषी कायदाच रद्द केला पाहिजे; राहुल गांधी कडाडले
rahul gandhi
| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 3:42 PM
Share

नवी दिल्ली: कृषी कायदा रद्द व्हावा म्हणून शेतकऱ्यांचे जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जंतरमंतरवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी राहुल यांनी केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला. चर्चा हवीच कशाला? काळा कृषी कायदाच रद्द केला पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi, Other Leaders Join Farmers Protest At Delhi’s Jantar Mantar)

आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. त्यांच्या मागण्या न्याय आहेत. त्यामुळेच आम्ही जंतरमंतरवर आलो आहोत. विरोधी पक्षाचे सर्वच नेते शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत, असं सांगतानाच केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द केले पाहिजेत. आता चर्चेतून काही निष्पन्न होणार नाही, असं राहुल यांनी सांगितलं.

पेगाससवर चर्चा होत नाही

संसदेत काय होत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आम्हाला संसदेत पेगाससवर चर्चा घडवून आणायची आहे. पण चर्चा केली जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांच्या फोनमध्ये पेगासस भरलेलं आहे, असं ते म्हणाले.

खासदारांची नारेबाजी

जंतरमंतरवर आलेल्या या खासदारांनी शेतकऱ्यांची विचारपूस केली. यावेळी या खासदारांनी शेतकरी वाचवा, देश वाचवाचे नारेही दिले. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती.

आप, तृणमूलची दांडी

दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सर्वच विरोधी पक्ष एकवटले होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे खासदारही यावेळी उपस्थित होते. मात्र ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल, मायावतींच्या बसपा आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी यावेळी दांडी मारली होती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Rahul Gandhi, Other Leaders Join Farmers Protest At Delhi’s Jantar Mantar)

संबंधित बातम्या:

पवार बंगळुरुत पोहोचले आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा फोन आला, पुढे नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

‘राजीव गांधी हे देशाचे सुपुत्र आणि हिरो, मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे स्थान हलणार नाही’, काँग्रेसचा हल्लाबोल

राज ठाकरेंच्या दारातून चंद्रकांत पाटलांचं संजय राऊतांना खुलं आव्हान!

(Rahul Gandhi, Other Leaders Join Farmers Protest At Delhi’s Jantar Mantar)

Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.