AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चर्चा नकोच, काळा कृषी कायदाच रद्द केला पाहिजे; राहुल गांधी कडाडले

कृषी कायदा रद्द व्हावा म्हणून शेतकऱ्यांचे जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जंतरमंतरवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. (rahul gandhi)

चर्चा नकोच, काळा कृषी कायदाच रद्द केला पाहिजे; राहुल गांधी कडाडले
rahul gandhi
| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 3:42 PM
Share

नवी दिल्ली: कृषी कायदा रद्द व्हावा म्हणून शेतकऱ्यांचे जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जंतरमंतरवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी राहुल यांनी केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला. चर्चा हवीच कशाला? काळा कृषी कायदाच रद्द केला पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi, Other Leaders Join Farmers Protest At Delhi’s Jantar Mantar)

आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. त्यांच्या मागण्या न्याय आहेत. त्यामुळेच आम्ही जंतरमंतरवर आलो आहोत. विरोधी पक्षाचे सर्वच नेते शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत, असं सांगतानाच केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द केले पाहिजेत. आता चर्चेतून काही निष्पन्न होणार नाही, असं राहुल यांनी सांगितलं.

पेगाससवर चर्चा होत नाही

संसदेत काय होत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आम्हाला संसदेत पेगाससवर चर्चा घडवून आणायची आहे. पण चर्चा केली जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांच्या फोनमध्ये पेगासस भरलेलं आहे, असं ते म्हणाले.

खासदारांची नारेबाजी

जंतरमंतरवर आलेल्या या खासदारांनी शेतकऱ्यांची विचारपूस केली. यावेळी या खासदारांनी शेतकरी वाचवा, देश वाचवाचे नारेही दिले. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती.

आप, तृणमूलची दांडी

दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सर्वच विरोधी पक्ष एकवटले होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे खासदारही यावेळी उपस्थित होते. मात्र ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल, मायावतींच्या बसपा आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी यावेळी दांडी मारली होती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Rahul Gandhi, Other Leaders Join Farmers Protest At Delhi’s Jantar Mantar)

संबंधित बातम्या:

पवार बंगळुरुत पोहोचले आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा फोन आला, पुढे नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

‘राजीव गांधी हे देशाचे सुपुत्र आणि हिरो, मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे स्थान हलणार नाही’, काँग्रेसचा हल्लाबोल

राज ठाकरेंच्या दारातून चंद्रकांत पाटलांचं संजय राऊतांना खुलं आव्हान!

(Rahul Gandhi, Other Leaders Join Farmers Protest At Delhi’s Jantar Mantar)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली