AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi Twitter : मतदार वाढत नाहीत म्हणून निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार का, राहुल ट्विटप्रकरणी नेटकऱ्यांत जुंपली !

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरला लिहिलेल्या पत्रावरून आता ट्विटरवर जोरदार खडाजंगी रंगलीय. राहुल गांधी यांनी 27 डिसेंबरला ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिले आहे. त्यात ट्विटरला आपल्या नव्या फॉलोअर्ची संख्या घटल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

Rahul Gandhi Twitter : मतदार वाढत नाहीत म्हणून निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार का, राहुल ट्विटप्रकरणी नेटकऱ्यांत जुंपली !
राहुल गांधी, काँग्रेस नेते
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Jan 27, 2022 | 1:37 PM
Share

नवी दिल्लीः काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटरला (Twitter) लिहिलेल्या पत्रावरून आता ट्विटरवर जोरदार खडाजंगी रंगलीय. राहुल गांधी यांनी 27 डिसेंबरला ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिले आहे. त्यात ट्विटरला आपल्या नव्या फॉलोअर्ची संख्या घटल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. सुरुवातील दरमहा राहुल गांधी यांच्या ट्विटरला फॉलो करणाऱ्यांची संख्या दरमहा 2.3 लाख होती. ती 6.5 लाखांवर पोहोचली होती. मात्र, ऑगस्ट 2021 नंतर ती संख्या दरमहा अडीच हजारांवर आली आहे. राहुल गांधींनी या काळात त्यांचे 19.5 दशलक्ष फॉलोअर्स गोठवण्यात आल्याचे म्हंटले आहे.

कुठून झाली सुरुवात?

राहुल गांधी यांनी ऑगस्ट 2021 अत्याचारग्रस्त पीडितेच्या कुटुंबाचा फोटो ट्विट केला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी ट्विटरकडे तक्रार केली. ट्विटरचे नियम राहुल गांधी यांनी मोडल्याने त्यांचे अकाऊंट आठ दिवसांसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात आले होते. काँग्रेसने त्या घटनेपासून राहुल गांधी यांच्या नव्या फॉलोअर्सची संख्या घटत चालली असल्याचे म्हटले आहे. यावरून ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

प्यादा बनण्यापासून चेतावणी…

राहुल यांच्या ट्विटप्रकरणावर राहुल शिवशंकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रिय पराग…राहुल गांधींनी ट्विटर फॉलोअर्समध्ये झपाट्याने घसरण होत असल्याचा दावा करत या एसएम प्लॅटफॉर्मला “प्यादा” बनवू नये असा, सावधगिरीचा इशारा दिला आहे. कॉंग्रेस “चीफ-इन-वेटिंग” साठी ही ऑन-लाइन अशुभघंटा आहे. राहुल यांच्या ट्विटरवर रोहन दुआ यांनी हा विचित्र लोभ आणि धक्कादायक तळमळ असल्याचे म्हटले आहे.

तर निवडणूक आयोगाला दोष देतील…

ऋषी बागरी यांनी याप्रकरणी राहुल यांधी यांच्यावर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, अमेठी हरल्यावर ईव्हीएमला दोष देतात. आता फॉलोअर्स गमावल्यावर ट्विटरला दोष देतात. काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडला, तेव्हा भाजपला दोष देतात. आता त्यांचा पक्ष राज्याच्या निवडणुका हरेल, तेव्हा मतदारांना दोष द्या, अशी तिरकस टिप्पणी त्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानेही अशीच टीका केली आहे. तो म्हणतो, फॉलोअर्स वाढत नाहीत म्हणून राहुल गांधी ट्विटर सीईओ पराग अग्रवाल यांच्याकडे तक्रार करत आहेत. मग आता यांना निवडणुकीत जनेतेने मते दिली नाहीत, तर ते निवडणूक आयोगाला दोषी मानतील.

आभासी जगातही प्रेक्षक मिळेना…

अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 2021 मध्ये खाते तात्पुरते निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली नसल्याची तक्रार राहुल गांधी यांनी ट्विटरवर केली आहे. राहुलला खऱ्या जगात आणि आता आभासी जगातही प्रेक्षक मिळत नाहीत! पुढे काय? निवडणूक आयोगाला पत्र लिहून मते न मिळाल्याची तक्रार करणार का, असा सवालही केला आहे.

बनावट फॉलोअर्स

आलोक भट्ट आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, नुकताच @राहुलगांधी रडत गेला आणि निवडणूक जिंकू शकला नाही म्हणून अमेरिकेचे समर्थन मागितले. तर अंकुर सिंग यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर राहुल गांधी निवडणूक आयोगाला मतदार वाढ नाहीत म्हणून पत्र लिहिणार असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने ट्विटर तुमचे मोठ्या प्रमाणात बनावट फॉलोअर्स असल्याचे सांगत असल्याचे म्हटले आहे.

इतर बातम्याः

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?