AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी 2024मध्ये पंतप्रधान होतील काय?; संजय राऊत यांचा दावा काय?

थर्ड फ्रंटचा प्रयोग अनेकदा झाला. तो अपयशी झाला आहे. सेकंड, थर्ड फ्रंटच्या गोष्टी सोडल्या पाहिजे. वेगवेगळे गट चालू शकत नाहीत. काँग्रेसशिवाय कोणताही फ्रंट चालू शकत नाही.

राहुल गांधी 2024मध्ये पंतप्रधान होतील काय?; संजय राऊत यांचा दावा काय?
संजय राऊत Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 21, 2023 | 1:08 PM
Share

जम्मू: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत सध्या जम्मूत आहेत. जम्मूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ते सहभागी झाले होते. या यात्रेत जम्मूतील हजारो नागरीक सहभागी झाले आहेत. इतर राज्यांप्रमाणेच जम्मूतही या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची प्रतिमा पुन्हा एकदा उजळून निघाली आहे. संजय राऊत यांनीही राहुल गांधी यांची प्रतिमा बदलली असल्याचं सांगितलं आहे. तसेच येणाऱ्या काळात राहुल गांधी चमत्कार घडवतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. राहुल गांधी हे पंतप्रधान बनतील काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर राऊत यांनी थेट उत्तर दिलं. राहुल गांधी देशाचं नेतृत्व करू शकतात. कोणताही व्यक्ती देशाचं नेतृत्व करू शकतो. पंतप्रधानपदाबाबत 2024नंतर ठरवू. लोकांना जर वाटलं राहुल गांधी यांनी पंतप्रधान बनावं तर त्यांना बनावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

राहुल गांधी तेच आहेत

पूर्वीचे राहुल गांधी आणि आताच्या राहुल गांधी यांच्यात काय फरक पडला? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. व्यक्ती आणि नेतृत्वात फरक करणार नाही. राहुल गांधी तेच आहेत. ज्या राहुल गांधींच्या बाबत तुम्ही विचार करता त्या राहुल गांधींना मी मारलं आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. ते आपण पाहातच आहात, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपने ती प्रतिमा तयार केलीय

राहुल गांधींची जी भाजपने प्रतिमा तयार केली आहे. ती चुकीची आहे. तुमच्या मनातील राहुल गांधी यांची जी प्रतिमा आहे. ती लोकांनी तोडली आहे. राहुल गांधी 4500 किमीपेक्षा अधिक अंतर पायी चालत आहेत. हे हिंमतीचं काम आहे. त्याकडे आम्ही राजकारण म्हणून पाहत नाही. त्यामुळेच शिवसेना या यात्रेत सामील झाली, असंही त्यांनी सांगितलं.

राहुल गांधी चमत्कार घडवतील

येणाऱ्या काळात राहुल गांधी यांचं नेतृत्व चमत्कार करेल. राहुल गांधी हे येणाऱ्या काळात आपल्या नेतृत्वाची चमक दाखवून आव्हान उभं करतील, असा विश्वास व्यक्त करतानाच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही राजकीय नाही. त्याकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहू नका, असंही ते म्हणाले.

सेकंड, थर्ड फ्रंट सोडा

यावेळी त्यांनी तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगाची खिल्ली उडवली. थर्ड फ्रंटचा प्रयोग अनेकदा झाला. तो अपयशी झाला आहे. सेकंड, थर्ड फ्रंटच्या गोष्टी सोडल्या पाहिजे. वेगवेगळे गट चालू शकत नाहीत. काँग्रेसशिवाय कोणताही फ्रंट चालू शकत नाही. आज काँग्रेसकडे खासदार कमी आहेत. पण 2024मध्ये काँग्रेसचे खासदार वाढतील, असा दावाही त्यांनी केला.

Follow Us
पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला....
Maharashtra Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला विरोधक घेरणार!
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा फूट पडणार? काही खासदार थेट...
मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर आता पुन्हा दबाव!
महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप
Kalyan | महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप; स्मार्ट मीटरवरून कल्याणमध्ये हल्लाबोल!
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल, काय मिळालं उत्तर?
वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन
मोठी बातमी! मनोरंजन विश्व हादरलं; वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन, नेमकं काय घडलं?
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसल
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसलं तिकडे स्वबळाची भाषा; राजकारणात मोठं वादळ?
संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; ठाकरेंचा भाजपला सल्ला
Sharmila Thackeray | आमची पोरं कशाला चोरता, संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; शर्मिला ठाकरेंचा भाजपला सल्ला
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस उपस्थित
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार शाळांमध्ये उपस्थित
सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
Manoj Jaranage | सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत