AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आयोगावर सरकारचा दबाव, त्यामुळेच निकालाला वेळ; संजय राऊत यांचा आरोप

जे आम्ही महाराष्ट्र आणि मुंबईत करतो, तेच जम्मूत करणार आहोत. येथील भूमिपुत्रांना प्राधान्याने रोजगार दिला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे.

निवडणूक आयोगावर सरकारचा दबाव, त्यामुळेच निकालाला वेळ; संजय राऊत यांचा आरोप
संजय राऊत Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 21, 2023 | 12:43 PM
Share

जम्मू: निवडणूक आयोगावर सरकारचा दबाव आहे. त्यामुळेच निकाल द्यायला वेळलागत आहे, असा आरोप करतानाच शिवसेनेचा अध्यक्ष कोण असावा हे आमचा पक्ष ठरवेल. इतर कोणीही ठरवणार नाही. अध्यक्ष ठरवणं न ठरवणं हा तांत्रिक मुद्दा आहे, असं ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत हे जम्मूच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्यांवर भाष्य केलं. तसेच जम्मूत शिवसेना निवडणूक लढणार असल्याचंही जाहीर केलं.

पक्षाचा अध्यक्ष ठरवण्याच्या प्रकरणात निवडणूक आयोग आला आहे. पण आमचा अध्यक्ष कोण असावा हे आमचा पक्ष ठरवेल. बाळासाहेब ठाकरे हे अजीवन अध्यक्ष होते. निवडणूक आयोगाने नियम केल्यानंतर आम्ही नंतर निवडणूक घ्यायचो. उद्धव ठाकरे हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. तेच राहतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

सरकार येतात आणि जातात

यावेळी त्यांनी जम्मूतील समस्यांवरही भाष्य केलं. आम्ही आश्वासन देत नाही. आमचा आश्वासनावर विश्वास नाही. आमचा वचननामा असतो. आम्ही प्रश्नावर बोलत असतो. सरकार येतात आणि जातात. आजही बेरोजगारी आहे. आम्ही प्रश्नांची यादी तयार केली आहे. स्थानिकांना रोजगार देण्यावर आमचा भर राहील, असं त्यांनी सांगितलं.

राजकारण बंद झालं पाहिजे

जे आम्ही महाराष्ट्र आणि मुंबईत करतो, तेच जम्मूत करणार आहोत. येथील भूमिपुत्रांना प्राधान्याने रोजगार दिला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. आमच्या पक्षाची स्थापना भूमिपूत्राच्या मुद्द्यावरच झाली आहे. जम्मू-काश्मीर आणि इतर ठिकाणी जाऊन पाहा. रोजगाराची समस्या तशीच आहे.

370 कलम हटवल्यावर रोजगार येतील असं सरकारने सांगितलं होतं. पण रोजगार आले नाही. हे केवळ राजकारण आहे. राजकारण बंद झालं पाहिजे. महापालिका असो की लोकसभेची निवडणूक जम्मूतील प्रश्न तसेच आहेत, असं ते म्हणाले.

तर युतीही करू

जम्मूत निवडणूक लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे. आमच्या कार्यकारिणीशी चर्चा सुरू आहे. जम्मूत इतर पक्षांशी आघाडी होत असेल आणि आम्हाला सन्मानजनक स्थान मिळत असेल तर आम्ही युती करू. नाही तर स्वबळावर लढू. आमच्याकडे अनेक मुद्दे आहेत. जम्मू बाबत आमची आस्था राहिली आहे, असंही ते म्हणाले.

सर्व हवेत आहे

ब्लास्ट झाले आहेत. ब्लास्ट होणार आहे. कुठे आहे सुरक्षा? मी आधीही सवाल केला होता. सर्व काही ठिकठाक होईल हे वचन या राज्याला मिळालं होतं. ते सर्व हवेत आहे, असं टोला त्यांनी लगावला.

Follow Us
मोठी बातमी! अभिजीत दिपकेंना मारहाण; थेट व्हिडीओ आला समोर, पहा...
मोठी बातमी! अभिजीत दिपकेंना मारहाण; थेट व्हिडीओ आला समोर, पहा...
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका? ठाकरे गटातील खासदार दिल्लीत
Sudhir Mungantiwar On Thackeray | ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका? ठाकरे गटातील खासदार दिल्लीत; फुटीच्या चर्चांनी राजकारण तापलं!
अचानक नाही, आधीपासूनच तयारी; थेट... ठाकरे गटातील फुटीबाबत विश्लेषकांचा
अचानक नाही, आधीपासूनच तयारी; थेट... ठाकरे गटातील फुटीबाबत विश्लेषकांचा मोठा दावा
पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला....
Maharashtra Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला विरोधक घेरणार!
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा फूट पडणार? काही खासदार थेट...
मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर आता पुन्हा दबाव!
महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप
Kalyan | महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप; स्मार्ट मीटरवरून कल्याणमध्ये हल्लाबोल!