AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी Gen Z ला भडकवण्याचं काम करत आहेत, मत चोरीच्या आरोपांवरून भाजपचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाविरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपने जोरदार हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी Gen Z ला भडकवण्याचं काम करत आहेत, मत चोरीच्या आरोपांवरून भाजपचा जोरदार हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2025 | 8:16 PM
Share

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाविरोधात गंभीर आरोप केले आहेत. एकट्या हरियाणामध्ये 25 लाख बोगस मतदान असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान त्यानंतर राहुल गांधी यांच्या या आरोपांवर भाजपच्या वतीनं देखील जोरदार पलटवार करण्यात आला आहे. भाजप नेते आणि मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी हे आपलं अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असल्यचां रिजिजू यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांचा हॉयड्रोजन बॉम्ब कधीच फुटत नाही असा टोला देखील यावेळी रिजजू यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. राहुल गांधी बिनबुडाचे आरोप करत आहेत, राहुल गांधी हे Gen-Z ला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

गेल्यावेळेस एका महिलेचं नाव आपल्या टी शर्टवर छापून ते फिरत होते, त्यानंतर या महिलेनं त्यांना चांगलंच फटकारलं होतं. बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी आता थोड्याच दिवसांमध्ये मतदान होणार आहे, तेव्हा हे आता तुम्हाला हरियाणाची कथा ऐकवत आहेत, कारण आता बिहारमध्ये यांच्यासाठी फार काही उरलं नाही, खोटे अरोप करून ते तुमचं लक्ष विचलित करत आहेत, अशी टीका देखील यावेळी रिजजू यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की, राहुल गांधी हे आज एका परदेशी महिलेचं नाव घेत होते, ते सारखं परदेशामध्ये जात असतात आणि तिथून त्यांना जी प्रेरणा मिळते, ते तुम्हाला सांगत असतात. मात्र त्यांच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाहीये, ते त्यांचा वेळ वाया घालवत आहेत. असा घनाघात यावेळी रिजजू यांनी राहुल गांधींवर केला आहे. राहुल गांधी नेहमी म्हणतात बॉम्ब फुटणार आहे, मात्र त्यांचा बॉम्ब कधीच फुटत नाही. काँग्रेसचे अनेक नेते मला म्हणतात की जोपर्यंत राहुल गांधी आमचे नेते आहेत, तोपर्यंत आम्ही निवडणूक कधीच जिंकू शकत नाहीत, असा टोलाही यावेळी रिजजू यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.