AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RRB NTPC Exam: या शहरातील परीक्षा रद्द, रेल्वे विभागाकडून नोटीस जारी

रेल्वे विभागाने एनटीपीसी (RRB NTPC) परीक्षेबाबत मोठा निर्णय घेताला आहे. यानुसार रेल्वे विभागाने नोटीस काढत 22 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान होणाऱ्या एनटीपीसी परीक्षा (RRB NTPC Exam) रद्द केल्या आहे.

RRB NTPC Exam: या शहरातील परीक्षा रद्द, रेल्वे विभागाकडून नोटीस जारी
रेल्वे
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 20, 2021 | 9:48 PM
Share

नवी दिल्ली : रेल्वे विभागाने एनटीपीसी (RRB NTPC) परीक्षेबाबत मोठा निर्णय घेताला आहे. यानुसार रेल्वे विभागाने नोटीस काढत 22 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान होणाऱ्या एनटीपीसी परीक्षा (RRB NTPC Exam) रद्द केल्या आहे. जयपूरच्या ग्लोबल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे (सेंटर कोड : 2441) 22 फेब्रुवारी 2021 ते 3 मार्च 2021 या काळात ही परीक्षा होणार होती. रेल्वेने याबाबत अधिकृत नोटीस (RRB Notice) जारी करत ही माहिती दिली. याबाबत रेल्वेच्या वेबसाईटवर सविस्तर माहिती देण्यात आलीय (Railway department canceled RRB NTPC Exam of 4th phase).

रेल्वेच्या नोटीसमध्ये परीक्षा रद्द करण्यामागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणं असल्याचं म्हटलं आहे. मात्र, नेमकं कोणतं कारण याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. या काळात परीक्षा देणाऱ्यांना आता 5 व्या टप्प्यातील परीक्षांमध्ये सहभागी करुन घेतलं जाणार आहे. परीक्षा रद्द झाल्याची माहिती सर्व परीक्षार्थींना व्हावी म्हणून रेल्वे परीक्षा विभागाकडून सर्वांना एसएमएस आणि ईमेल पाठवण्यात येत आहेत.

रेल्वेकडून 5 व्या टप्प्यातील परीक्षा जाहीर झाल्यानंतर सर्व परीक्षार्थींना आपल्या परीक्षेची तारीख आणि ठिकाण कळणार आहे. RRB ने नोटीसमध्ये म्हटलं आहे, “परीक्षेबाबत उमेदवार कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी किंवा मदतीसाठी हेल्प डेस्कशी संपर्क साधू शकतात. याशिवाय अधिकच्या माहितीसाठी वेळोवेळी आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटवरील अपडेट्सही पाहाव्यात.”

सध्या एनटीपीसी भरती परीक्षेचा चौथा टप्पा सुरु आहे. याची प्रक्रिया 3 मार्चपर्यंत चालणार होती. यात 15 लाख उमेदवार बसणार होते. रेल्वे भरती मंडळाने 35 हजारपेक्षा अधिक पदांसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय. एनटीपीसी भरतीसाठी एकूण 1 कोटी 25 लाख तरुणांनी अर्ज केले होते. पहिल्या टप्प्यात परीक्षेसाठी 23 लाख, दुसऱ्या टप्प्यात 27 लाख आणि तिसऱ्या टप्प्यात 28 लाख तरुणांनी याआधीच ही परीक्षा दिलीय.

पहिल्या टप्प्यातील परीक्षा ही एकप्रकारे स्क्रीनिंग टेस्ट आहे. ही परीक्षा कम्प्युटरवर होते. या परीक्षेत गणित, जनरल इंटेलिजन्स आणि बुद्धीमत्तेसह सामान्य ज्ञान यावर प्रश्न विचारले जातात. या परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ लागतो.

हेही वाचा :

भारतीय सुरक्षा दलात भरती व्हायचंय? मग ही तुमच्यासाठी मोठी संधी, अर्ज करण्याची सोपी पद्धत

5 लाख लोकांना रोजगार देण्याची रामदेव बाबांची घोषणा, काय आहे प्लॅन वाचा सविस्तर !

‘मराठा आरक्षणासाठी राजे एकत्र आलेत; मग अठरापगड जातीचे मावळे गोळा करुन ओबीसी आरक्षण वाचवू’

व्हिडीओ पाहा :

Railway department canceled RRB NTPC Exam of 4th phase

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...