AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील प्रसिद्ध उद्योगपतीचा परदेशात अपघात, तातडीने मुंबईला आणलं, उपचार सुरू

भारतातील एका प्रसिद्ध उद्योगपतीचा परदेशात अपघात झाला असून त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबईला आणण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतातील प्रसिद्ध उद्योगपतीचा परदेशात अपघात, तातडीने मुंबईला आणलं, उपचार सुरू
SinghaniyaImage Credit source: Google
| Updated on: Mar 20, 2026 | 11:18 PM
Share

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रेमंड ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर गौतम सिंघानिया यांच्यासोबत मोठा अपघात झाला आहे. मालदीवमध्ये स्पीडबोट उलटल्यामुळे झालेल्या अपघातात ते जखमी झाले आहे. या अपघातानंतर त्यांना एअर लिफ्ट करून मुंबईत उपचारासाठी आणण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्या सोबत बोटीत देशातील दिग्गज रॅली ड्रायव्हर हरी आणि आणखी एक मित्र होता, हे दोघे सध्या बेपत्ता आहेत. एएनआयच्या एक्सवरील पोस्टनुसार, सिंघानिया यांच्या प्रवक्त्याने सांगितले की अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली असून ते मुंबईत उपचार घेत आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

टेक्सटाइल उद्योगाला मोठी ओळख मिळवून दिली

गौतम सिंघानिया हे देशातील प्रमुख उद्योगपतींपैकी एक आहेत. ते रेमंड लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. व्यवसायाव्यतिरिक्त ते कार रेसिंग, एव्हिएशन आणि लक्झरी जीवनशैलीसाठीही ओळखले जातात. 9 सप्टेंबर 1965 रोजी जन्मलेले सिंघानिया हे त्या कुटुंबाच्या चौथ्या पिढीतले आहेत, ज्यांनी भारतातील टेक्सटाइल उद्योगाला मोठी ओळख मिळवून दिली आहे.

2000 मध्ये रेमंड ग्रुपची धुरा सांभाळली

गौतम सिंघानिया 1990 च्या दशकात कौटुंबिक व्यवसायात सक्रिय झाले. 2000 साली त्यांनी रेमंड ग्रुपची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी कंपनीला पारंपरिक सूटिंग-शर्टिंग ब्रँडपासून जागतिक लाइफस्टाइल ब्रँडमध्ये रूपांतरित केले. ‘The Complete Man’ ही ब्रँड ओळख त्यांनीच दिली. टेक्सटाइलसोबतच रेडीमेड कपडे आणि रिटेल क्षेत्रातही कंपनीचा विस्तार झाला आहे.

गौतम सिंघानिया यांचे वैयक्तिक आयुष्य

गौतम यांचा विवाह नवाज मोदी सिंघानिया यांच्याशी झाला होता. अलीकडील काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत, विशेषतः वाद आणि घटस्फोटाच्या चर्चेमुळे ते वारंवार प्रकाशझोपात राहिले. याशिवाय कौटुंबिक मालमत्ता, पत्नीबरोबरचे मतभेद आणि कंपनीतील अंतर्गत निर्णय यांमुळेही ते चर्चेत राहिले आहेत. आता त्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यात त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र रॅली ड्रायव्हर हरी आणखी एक मित्र अपघातानंतर बेपत्ता आहेत. त्यांचा सध्या शोध सुरू आहे.

Follow Us
राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहिण योजनेवरून वाद पेटला, 65 लाख.....
राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहिण योजनेवरून वाद पेटला, 65 लाख......
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या..
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या...
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?.
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदार
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदार.
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर....
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर.....
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी...
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी....
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं.
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक.....
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक......
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.