AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रिपब्लिक भारत टीव्ही’चे अँकर विकास शर्मांचं निधन, काही दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त

अर्णव गोस्वामी यांच्या रिपब्लिक भारत टीव्हीचे अँकर विकास शर्मा (Vikas Sharma) यांचं गुरुवारी निधन झालं आहे. Republic Bharat anchor Vikas Sharma

‘रिपब्लिक भारत टीव्ही’चे अँकर विकास शर्मांचं निधन, काही दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त
विकास शर्मा
| Updated on: Feb 05, 2021 | 7:33 AM
Share

नवी दिल्ली: अर्णव गोस्वामी यांच्या रिपब्लिक भारत टीव्हीचे अँकर विकास शर्मा (Vikas Sharma) यांचं गुरुवारी निधन झालं आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते आजारी होते. गुरुवारी रात्री उत्तर प्रदेशातील नोएडामधील एका रुग्णालयात त्यांचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार विकास शर्मांना ताप आला होता. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. मात्र, त्यातून बरे झाले होते. (Republic Bharat anchor Vikas Sharma passes away)

विकास शर्मा रिपब्लिक भारत टीव्हीवर रात्री 9 वाजताचा ‘ये भारत की बात है’ हा कार्यक्रम घ्यायचे. विकास शर्मा यांच्या निधनावर रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. विकास शर्मा यांच्या निधनानं रिपब्लिक नेटवर्कचं मोठं नुकसान झाल्याची भावना अर्णव गोस्वामी यांनी व्यक्त केलीय. विकास शर्मा यांची अँकरिंग करण्याची एक वेगळी शैली होती मात्र ते या जगात नाहीत यावर विश्वास बसत नसल्याचं अर्णव गोस्वामी म्हणाले.

मान्यवरांकडून दु:ख व्यक्त

अर्णव गोस्वामी यांनी विकास शर्मा जमिनीवर राहून अँकरिंग करत होते. त्यासह त्यांच्याकडे गुणवत्ता असल्याचं म्हटलं. विकास शर्मांच्या निधनावर चित्रपट निर्माता अशोक पंडित, आमदार अभिजित सिंह सांगा, भाजप आमदार दिनेश चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. विकास शर्मा कानपूर येथे वास्तव्यास होते. नोएडाच्या कैलाश रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्याच रुग्णालयात त्यांचं निधन झालं. विकास शर्मा यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. विकास शर्मा 35 वर्षांचे होते.

कानपूरमध्ये अंत्यसंस्कार

विकास शर्मा यांच्यावर कानपूरमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या: 

Arnab Goswami Arrested LIVE | सोनिया सेना आणखी किती गळे दाबणार, अर्णव गोस्वामींच्या अटकेवरुन कंगनाचा घणाघात

अर्णव गोस्वामींना मोठा झटका, जवळपास 20 लाखाचा दंड

TRP scam | मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, रिपब्लिक चॅनेलच्या सीईओंना अटक

TRP Scam | फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक केलेले ‘ते’ 13 जण कोण?

(Republic Bharat anchor Vikas Sharma passes away)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.