AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना पुन्हा पसरतोय, एका आठवड्यात भारतात इतके रुग्ण; सरकारने काय म्हटलंय?

पुन्हा एकदा देशावर कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच हळू हळू ही रुग्णांची संख्या वाढत चालल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता सरकारही अलर्टमोडवर आलं आहे. काल म्हणजे 19 मे पर्यंत नक्की किती रुग्ण आढळले आहेत ते जाणून घेऊयात.

कोरोना पुन्हा पसरतोय, एका आठवड्यात भारतात इतके रुग्ण; सरकारने काय म्हटलंय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 20, 2025 | 5:04 PM
Share

पुन्हा एकदा देशावर कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं दिसत आहे. नुकताच अभिनेत्री शिल्पा शिरोडकरलाही कोरोनाची लागन झाल्याचं समोर आलं. तसेच हळू हळू रुग्णांची संख्या वाढत चालल्याचं दिसत आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक 

सिंगापूर आणि हाँगकाँग सारख्या आग्नेय आशियाई देशांमध्ये कोविड-19 च्या वाढत्या रुग्णांमध्ये, भारतातही चिंता वाढली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. देशातील विविध आरोग्य संस्थांच्या तज्ज्ञांसह अधिकाऱ्यांच्या या बैठकीत सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशियाई देशांमध्ये वाढत्या प्रकरणांमुळे भारत सरकार सतर्क झाले आहे, या बैठकीत नक्की काय सांगण्यात आलं आहे ते जाणून घेऊयात.

19 मे 2025 पर्यंत भारतात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?

सोमवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, आपत्कालीन वैद्यकीय मदत विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि केंद्र सरकारी रुग्णालयांमधील तज्ज्ञ उपस्थित होते. भारतातील कोविड-19 ची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे असा निष्कर्ष बैठकीत काढण्यात आला नाही, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी सांगितले की, “19 मे 2025 पर्यंत, भारतात कोविड-19 च्या सक्रिय रुग्णांची संख्या 257 आहे.

देशाच्या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता हा आकडा खूपच कमी आहे. यातील जवळजवळ सर्व रुग्ण फार गंभीर नाहीत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचीही आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. तथापि, आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकार मात्र अलर्टवर आलं असून तयारी मात्र करून ठेवत आहे.

नवीन प्रकार आहे का? 

कोविड-19 च्या नवीन प्रकारामुळे आशियातील अनेक देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलिकडच्या प्रकरणांमध्ये वाढ प्रामुख्याने JN.1 प्रकारामुळे झाली आहे, जो ओमिक्रॉन BA.2.86 प्रकाराचा एक नवीन प्रकार आहे . जागतिक आरोग्य संघटनेनुसार, JN.1 प्रकारात सुमारे 30 उत्परिवर्तने आहेत आणि त्यापैकी सर्वात गंभीर म्हणजे LF.7 आणि NB.1.8.

गेल्या आठवड्यात भारतात किती प्रकरणे?

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 12 मे पासून भारतात 164 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केरळमध्ये सर्वाधिक 69 प्रकरणे आहेत, त्यानंतर महाराष्ट्रात 44, तर तामिळनाडूमध्ये 34 रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय कर्नाटकमध्ये कोविड-19 चे 8 नवीन रुग्ण, गुजरातमध्ये 6 आणि दिल्लीमध्ये 3 रुग्ण आढळले. हरियाणा, राजस्थान आणि सिक्कीममध्ये एक नवीन रुग्ण आढळला आहे.

सिंगापूर, हाँगकाँगमध्ये गंभीर परिस्थिती

सिंगापूर आणि हाँगकाँग सारख्या आशियाई देशांमध्येही रुग्णांची संख्या वाढतेय. येथे लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. हाँगकाँगच्या सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनच्या एका अधिकाऱ्याने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, सामान्य परिस्थिती पूर्ववत झाल्यापासून, हाँगकाँगमध्ये दर सहा ते नऊ महिन्यांनी सक्रिय कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. 27 एप्रिल ते 3 मे दरम्यान देशात 14,200 रुग्ण आढळले आहेत. मे महिन्यात, हाँगकाँगमध्ये कोविड 19 चे 31 गंभीर रुग्ण आढळले. त्यामुळे आता आपले सरकारही आधीच अलर्ट मोडवर राहिलं आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....