AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आसामचे मुख्यमंत्री कोण?, सर्बानंद आणि हिंमत बिस्वा सरमा यांना दिल्लीत बोलावलं; आज फैसला

आसामच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी आज दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक होणरा आहे. (Sarbananda Sonowal Himant Biswa Sarma Was Called To Delhi)

आसामचे मुख्यमंत्री कोण?, सर्बानंद आणि हिंमत बिस्वा सरमा यांना दिल्लीत बोलावलं; आज फैसला
Sarbananda Sonowal- Himanta Biswa Sarma
| Updated on: May 08, 2021 | 7:28 AM
Share

नवी दिल्ली: आसामच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी आज दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक होणरा आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि राज्यातील पक्षाचे बडे नेते हिंमत बिस्वा सरमा यांना दिल्लीत पाचारण केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Sarbananda Sonowal Himant Biswa Sarma Was Called To Delhi)

भाजपने आसाममध्ये पुन्हा सत्ता राखली आहे. मात्र, हिंमत बिस्वा सरमा हे सुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असल्याने भाजपला आसामचा मुख्यमंत्री ठरविता आला नाही. त्यामुळे थेट जेपी नड्डा यांनीच दिल्लीत आसामच्या या दोन्ही बड्या नेत्यांना दिल्लीत पाचारण केलं आहे. आज सकाळी 10.30 वाजता हे दोन्ही नेते नड्डा यांना भेटणार असून त्यात राज्यातील नेतृत्वाचा तिढा सोडवण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आसाममध्ये सुरू असलेला मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स आज संपणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

म्हणून शर्यतीत

भाजपने विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून सर्बानंद सोनोवाल आणि हिंमत बिस्वा सरमा या दोन्हीपैकी एकाचेही नाव जाहीर केले नव्हते. त्यामुळे हे दोन्ही नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. येत्या एक दोन दिवसात मुख्यमंत्रीपदाचा हा तिढा सुटू शकतो, असं सांगितलं जात आहे.

काँग्रेसमधून भाजपात

2016मध्ये हिंमत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी त्यांना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. मात्र, 2016च्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भाजपने सोनोवाल यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. बिस्वा सरमा यांनी केवळ आसामच्या पूर्वेकडील भागातच नव्हे तर संपूर्ण आसाममध्ये भाजपला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून भाजप त्यातून मार्ग कसा काढणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Sarbananda Sonowal Himant Biswa Sarma Was Called To Delhi)

संबंधित बातम्या:

नितीन गडकरींकडे जबाबदारी देण्यामागची सुब्रमण्यम स्वामींची तळमळ समजून घ्या; शिवसेनेचा गडकरींना फुल्ल पाठिंबा

धक्कादायक! कोरोनानं वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

“धीर धरा, कुठं मरुन चाललेत?” ऑक्सिजन तुटवड्यावरुन रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य, सोशल मीडियावर जोरदार टीका

(Sarbananda Sonowal Himant Biswa Sarma Was Called To Delhi)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.