AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक वर्षे सोनं खरेदी करु नका,परदेशी जाऊ नका,असं का म्हणाले पंतप्रधान मोदी ?

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या तेलंगणा येथील सभेत जनतेला उद्देश्यून केलेल्या भाषणात सांगितले की सध्याच्या जागतिक संकटाच्या काळात जनतेने काटकसरीने राहायला शिकायला पाहिजेत. इंधनाची बचत करुन परकीय चलन वाचवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

एक वर्षे सोनं खरेदी करु नका,परदेशी जाऊ नका,असं का म्हणाले पंतप्रधान मोदी ?
pm modi
| Updated on: May 10, 2026 | 9:42 PM
Share

देशासाठी मरणे हीच केवळ देशभक्ती नसते तर देशासाठी जगणे आणि आपले कर्तव्य निभावणे ही देखील देशभक्ती आहे. यासाठी जागतिक संकटाच्या काळात काही संकल्प करावे लागतील आणि ते पूर्ण भावनेने पूर्ण करावे लागेल असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी येथे केले. तेलंगणात सुमारे ९,४०० कोटी रुपयांच्या विविध योजनांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधान यांच्या हस्ते व्हर्च्युअली करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

गेले दोन महिने मध्य पूर्वेतील युद्धामुळे नवे संकट निर्माण झाले आहे.त्यामुळे इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. देशवासियांवर या संकटाची झळ पोहचू नये यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे. नागरिकांवर ओझे पडू नये यासाठी सरकार सारे ओझे स्वत:च्या खांद्यावर घेत आहे. मात्र, पुरवठा साखळीवर सतत संकट असेल तर आम्ही किती उपाय केले तरी अडचणी वाढतच जातात. आता देशाला सर्वतोपरी ठेवत आपल्याला एकजूठ होऊन लढावे लागेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

येथे पोस्ट पाहा –

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की या जागतिक संकटाच्या समयी सर्वात मोठा संकल्प पेट्रोल डिझेलचा जपून वापर करणे हा आहे, कारण जर आपण इंधन जपून वापरले जर परकीय चलनाची बचत होईल असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की कोरोना काळात आपण वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मिटिंग, वीडियो कॉन्फरन्स आपलेसे केले आणि अनेक उपाय केले. आपल्याला त्यांची सवय देखील झाली. आजच्या काळाची गरज आहे की आपण त्या पद्धतींचा पुन्हा वापर करायला हवा. कारण हे देशाच्या हिताचे असेल आणि त्यांना पुन्हा एकदा प्राथमिकता देणे गरजेचे आहे.

येथे पोस्ट पाहा –

पीएम मोदी म्हणाले की सध्याच्या स्थितीत आपल्या परकीय चलन वाचण्यावर खूप जोर द्यावा लागणार आहे. कारण जगभरात पेट्रोल आणि डिझेल खूप महाग झाले आहे. यासाठी आपली जबाबदारी असेल की आपण इंधन वाचवायला हवे आणि यामुळे पेट्रोल आणि डिझेल खरेदीवर खर्च होणारी विदेशी मुद्रा वाचेल.

पेट्रोल – डिझेल आणि गॅस तसेच खतांचे दर खुप वाढले आहेत. नागरिकांवर ओझे येऊ नये म्हणून सरकार स्वत:च्या खांद्यावर ओझे घेत आहे. मात्र, पुरवठा साखळीवरील संकट कायमच असल्याने देशाला आता एकजूठ होऊन निर्णय घ्यावा लागेल असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की पेट्रोल आणि डिझेल वाचवण्यासाठी संकल्प करावा लागेल की ज्या शहरात मेट्रो आहे तेथे मेट्रोचा वापर करावा, कारमधून जायचे असेल तर कार पुलिंग करुन एकत्र निघावे.

परदेशात लग्न आणि सोने खरेदीला आळा

सामान पाठवण्यासाठी रेल्वेचा वापर करावा. म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची बचत होईल. परदेशात लग्नानंतर फिरायला जाण्याचे कल्चरल मध्यम वर्गीयात वाढत आहे.संकटात काळाचा विचार करुन आपण परदेशात जाणे एक वर्षांसाठी टाळावे. परकीय चलन वाचवण्यासाठी देशाच्या हिताचा विचार करुन वर्षभर आपण सणासुदीचे सोने खरेदी करु नये. या सर्व प्रयत्नातून आपण परकीय चलन वाचवावे अशी मागणी पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत