AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parliament Monsoon Session: विरोधी पक्षांची मानसिकता दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिलाविरोधी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्ला चढवला. नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. (narendra modi)

Parliament Monsoon Session: विरोधी पक्षांची मानसिकता दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिलाविरोधी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
narendra modi
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 3:10 PM
Share

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्ला चढवला. नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यांचं अभिनंदन करण्याऐवजी विरोधक गोंधळ घालत आहेत. दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिला मंत्री झाल्याचं काहींना पटलेलं दिसत नाही. त्यांची मानसिकता दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिलाविरोधी आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्ला चढवला. (Seems Some People Can’t Digest More Women, SCs, STs as Ministers, Says PM Modi)

लोकसभा आणि राज्यसभेत नव्या मंत्र्यांचा पंतप्रधानांनी परिचय करून देण्यास सुरुवात केली. मोदी मंत्र्यांचा परिचय करून देण्यासाठी उभे राहताच दोन्ही सभागृहात गोंधळ झाला होता. त्यावरून मोदींनी विरोधकांना सुनावले. लोकसभेत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी सदस्यांना शांत राहण्याचं आणि मंत्र्यांचा परिचय करू देण्याची विनंती केली. परंपरेला छेद देऊ नका. तुम्ही दीर्घकाळ सत्ता भोगली आहे. तुम्ही परंपरेला तोडून सभागृहाची प्रतिष्ठा कमी करू नका. सभागृहाची प्रतिष्ठा कायम ठेवा. पंतप्रधान हे सभागृहाचे नेते आहेत. ते नव्या मंत्र्यांचा परिचय करून देत आहेत. त्यामुळे सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं, असं आवाहन बिरला यांनी केलं.

मला वाटलं सभागृहात उत्साह असेल

आज दलित समाजातील काही नेते मंत्री झाले आहेत. अनेक मंत्री ग्रामीण भागातील आहेत. पण काही लोकांना हे पटलेलं नाही. दलित, आदिवासी, शेतकरी, महिला आणि ओबीसी आदी घटकातील लोक मोठ्या संख्येने मंत्री झाले आहेत. त्यामुळे सभागृहात उत्साहाचं वातावरण असेल असं मला वाटलं होतं. पण तसं झालं नाही, असंही ते म्हणाले. शेतकरी आणि ग्रामीण भागातील आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या समाजातील लोकांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यांची ओळख करून देत असताना विरोधकांना आनंद व्हायला हवा होता. पण दलित मंत्री बनावा, महिला मंत्री व्हाव्यात, ओबीसी मंत्री व्हावेत, शेतकऱ्यांची मुलं मंत्री व्हावेत हे काही काही लोकांना पटलेलं दिसत नाही. त्यामुळेच ते परिचय करून देत असताना गोंधळ घालत आहेत, अशी टीका मोदींनी केली.

प्रल्हाद जोशींचं शांततेचं आवाहन

राज्यसभेतही मोदी मंत्र्यांचा परिचय करून देत असताना गोंधळ झाला. त्यामुळे मोदींनी विरोधकांना फैलावर घेतलं. आज शेतकऱ्यांची मुलं मंत्री बनले आहेत. त्यांचा परिचय करून देत असल्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे. नव्या महिला मंत्र्यांचाही परिचय करून दिला जात आहे. पण त्यांचं नावही ऐकून घेण्यास काही लोक तयार नाहीत. ही कोणती महिला विरोधी मानसिकता आहे?, असा सवाल मोदींनी केला. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. तसेच नव्या मंत्र्यांची ओळख करून देण्यात येत असून त्यात व्यत्यय आणू नका, असं आवाहनही त्यांनी केलं. (Seems Some People Can’t Digest More Women, SCs, STs as Ministers, Says PM Modi)

संबंधित बातम्या:

ज्या पेगाससवर संसदेत रान उठलंय, ते नेमकं आहे काय, नेमकी हेरगिरी कशी केली जाते? वाचा सविस्तर

Monsoon Session Live : 8 व्या मिनिटाला गदारोळ, मोदी म्हणाले, महिला, दलित मंत्री झालेले बघवत नाही का?

लस घ्या, बाहुबली बना; पंतप्रधान म्हणतात, संसदेत प्रश्न विचारा, पण उत्तरं देण्याची संधीही द्या

(Seems Some People Can’t Digest More Women, SCs, STs as Ministers, Says PM Modi)

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका