AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar Narendra Modi Meet: अडीच वर्ष झाले तरी राज्यपालांकडून विधान परिषद सदस्यांची नियुक्ती नाही; पवारांची राज्यपालांविरोधात मोदींकडे तक्रार

Sharad Pawar Narendra Modi Meet: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांची पंतप्रधानांकडे तक्रार केली.

Sharad Pawar Narendra Modi Meet: अडीच वर्ष झाले तरी राज्यपालांकडून विधान परिषद सदस्यांची नियुक्ती नाही; पवारांची राज्यपालांविरोधात मोदींकडे तक्रार
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 4:54 PM
Share

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांची पंतप्रधानांकडे तक्रार केली. राज्य सरकारने राज्यपाल नियुक्त काही सदस्यांची नावे राज्यपालांना दिली आहेत. अडीच वर्ष झाली तरी या सदस्यांची नियुक्ती झाली नाही. याबाबत पंतप्रधानांच्या कानावर माहिती टाकली आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं. तुमच्या तक्रारीनंतर पंतप्रधानांनी काही आश्वासन दिलं का? काही प्रतिक्रिया दिली का? असा सवालही पवारांना करण्यात आला. त्यावर मोदींना मी प्रतिक्रिया विचारली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच पंतप्रधानांकडे लक्षद्विपच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी गेलो होतो. यावेळी महाराष्ट्राशी संबंधित दोन विषयांवर पंतप्रधानांशी बोलणं झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरावर छापे मारण्यात आले आहेत. संजय राऊत हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. राज्यसभेचे खासदार आहेत. याची कल्पना पंतप्रधानांना दिली आहे. राऊतांच्या घरी सेंट्रल एजन्सीने कारवाई केली. हा अन्याय आहे. 8 ते 10 एकर जमीन, फ्लॅट ताब्यात घेण्यात आला आहे. हा अन्याय आहे, असं पंतप्रधानांना सांगितल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. तसेच पंतप्रधानांची प्रतिक्रिया विचारली नाही. यावर ते गंभीरपणे विचार करतील आणि त्यावर काही तरी पावले उचलतील. इतर विषयावर बोललो नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. संजय राऊतांच्या विरोधात कारवाई करण्याची गरज काय होती? त्यांच्यावरील आरोप काय? ते केवळ सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली का? असा सवालही पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

व्हॅकेन्सी आहे, पण बदल नाही

येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल होईल का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केलं. मी यावर बोलू शकत नाही. कारण हा तीन पक्षाचा निर्णय आहे. हे तीन पक्षाचे नेते त्याबाबत निर्णय घेतील. त्याविषयी मला माहीत नाही. मला फक्त एकाच पक्षाबाबत माहीत आहे. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादीत व्हॅकेन्सी आहे. पण सध्या तरी पक्षात कोणताही बदल करण्यात येणार नाही. रिक्त जागांबाबत पक्ष नेत्यांशी चर्चा करून योग्य ती पावले उचलू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Sharad Pawar Narendra Modi Meet : संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय?; राऊतांवर अन्याय झाल्याची पवारांची मोदींकडे तक्रार

BMC Elections : मुंबई महापालिकेतील घराणेशाही संपवा, फडणवीसांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

Nagpur Yuva Sena | नागपुरात वरुण सरदेसाईंनी फुंकले युवा सेनेत प्राण, विद्यापीठातील सिनेट निवडणुकांचं दिलं टार्गेट

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.