AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेमंत सोरेन आणि केजरीवाल यांच्या अटकेत साम्य काय ? के.कविता बनणार माफीच्या साक्षीदार

ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहा समन्स बजावल्यानंतर काल अखेर अटक केली आहे. या आधी 31 जानेवारीला झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना देखील अटक झाली होती. या दोन नेत्यांच्या कारवाईत अनेक बाबी कॉमन आहेत.

हेमंत सोरेन आणि केजरीवाल यांच्या अटकेत साम्य काय ? के.कविता बनणार माफीच्या साक्षीदार
hemant soren and arvind kejriwal
| Updated on: Mar 27, 2024 | 1:18 PM
Share

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल रात्री दोन तास चौकशी केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) अखेर अटक केली. न्यायालयाने अटकेला रोखण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर गुरुवारी उशीरा ईडीचे अधिकारी त्यांच्या निवासस्थानी पोहचले. आधी त्यांची मेडीकल करण्यात आली. त्यानंतर त्यांनी लॉकअपमध्ये शिफ्ट केले. शुक्रवारी त्यांना राऊज एवेन्यू कोर्टात सादर करण्यात आले. परंतू मुख्यमंत्र्याला अटक झाल्याचे हे काही पहिले प्रकरण नाही. 31 जानेवारीला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना देखील रांचीतून अशीच अटक झाली होती. त्यामुळे ईडीने दोन महिन्यातच दोन मुख्यमंत्र्यांना अटक केली आहे. हेमंत सोरेन आणि केजरीवाल यांच्या अटक कारवाईत साम्य काय आहे ते पाहूयात…

माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची अटक

ईडीने मद्य घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एकूण नऊ समन्स बजावले होते. परंतू अरविंद केजरीवाल यांनी या समन्सला दाद न दिल्याने ईडीने कोर्टात त्यांची तक्रार देखील केली होती. ज्यानंतर अखेर कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला रोख लावण्यास नकार दिला, त्यानंतर लागलीच ईडीने रात्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावरील ईडीची कारवाई देखील या सारखीच आहे. कथित जमीन घोटाळ्यात सोरेन यांना देखील दहा समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी सोरेन यांची सुमारे 8 तास चौकशी करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. म्हणजेच दोन्ही नेत्यांना ते मुख्यमंत्री पदावर असताना आणि त्यांना दहा समन्स बजावल्यानंतर अटक करण्यात आली आहे.

के. कविता बनणार माफीचा साक्षीदार

गेल्या काही वर्षांत ईडीने कारवाईचा फास आवळत नेला आहे. या विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच ईडी कारवाई करते असा आरोप होत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर विधानसभा अध्यक्षांनी अटक झाल्यानंतरही केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत असे म्हटले आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. दोन महिन्यात ईडीने दोन मुख्यमत्र्यांना अटक केली आहे. यापूर्वी ईडीने माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के.कविता यांना देखील अटक केली आहे. आता के.कविता या अबकारी धोरणासंबंधीच्या प्रकरणात सरकारी साक्षीदार बनण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा