AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नकाशा बदलणार, पाकिस्तानातील सिंध भारतात सामील होऊ शकतो, राजनाथ सिंह यांनी दिले संकेत

Sindh Prant: भारत आणि पाकिस्तानची 1947 साली फाळणी झाली होती, त्यावेळी सिंध प्रांत पाकिस्तानात गेला होता. आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा भाग भारतात पुन्हा सामील होऊ शकतो असे विधान केले आहे.

नकाशा बदलणार, पाकिस्तानातील सिंध भारतात सामील होऊ शकतो, राजनाथ सिंह यांनी दिले संकेत
Rajnath singh on Sindh prant
| Updated on: Nov 23, 2025 | 10:51 PM
Share

भारत आणि पाकिस्तानची 1947 साली फाळणी झाली होती, त्यावेळी भारतीय संस्कृतीशी निगडीत असलेली अनेक ठिकाणे पाकिस्तानात गेली होती. यात सिंध प्रांताचाही समावेश आहे. अशातच आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात मोठे विधान केले आहे. सिंधची भूमी कदाचित भारताचा भाग नसेल, परंतु सांस्कृतिक दृष्टिकोनातून, सिंध नेहमीच भारताचा भाग राहील असं सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी सिंधचा भारतात समावेश करण्याबाबतही भाष्य केले आहे. राजनाथ सिंह नेमके काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

फाळणीनंतर सिंध प्रांत पाकिस्तानात गेला

राजधानी दिल्लीतील विज्ञान भवन येथे वर्ल्ड सिंधी हिंदू फाउंडेशन ऑफ असोसिएशन (VSHFA) द्वारे आयोजित “स्ट्रॉंग सोसायटी – स्ट्रॉंग इंडिया” कार्यक्रमात कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, फाळणीनंतर सिंधू नदीजवळील सिंध प्रांत पाकिस्तानात गेला आणि त्या प्रदेशात राहणारे सिंधी लोक भारतात आले. या सिंध प्रांताचे भारतापासून वेगळे होणे हे लालकृष्ण अडवाणींसारख्या नेत्यांच्या पिढीने कधीही स्वीकारले नाही.

सिंधू नदी पवित्र आहे

पुढे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिले आहे की, सिंधी हिंदू आणि आमच्या पिढीतील लोक अजूनही सिंधचे भारतापासून वेगळे होणे स्वीकारू शकलेले नाहीत. केवळ सिंधमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतातील हिंदू लोक सिंधू नदीला पवित्र मानत होते. सिंधमधील अनेक मुस्लिमांनाही असं वाटत होते की सिंधू नदीचे पाणी मक्केच्या झमझमच्या पाण्यापेक्षा कमी पवित्र नाही.’

सिंध भारतात परत सामील होऊ शकते

राजनाथ सिंह यांनी पुढे बोलताना म्हटले की, सिंध आज भारताचा भाग नसला तरी, संस्कृतीच्या दृष्टिकोनातून तो नेहमीच भारताचा भाग असेल, आणि जमिनीच्या बाबतीत, सीमा कधीही बदलू शकतात. काय माहित उद्या सिंध भारतात परत येऊ शकते. सिंधू नदीला पवित्र मानणारे सिंधमधील आपले लोक नेहमीच भारताचे राहतील. ते कुठेही असले तरी ते नेहमीच आपले राहतील.

सिंधी समुदायाची सुरुवात शून्यातून

आपल्या भाषणात राजनाथ सिंह म्हणाले की, ‘फाळणीनंतर, भारतातील सिंधी समुदायाची सुरुवात शून्यातून झाली, मात्र त्यांनी आता नवीन उंची गाठली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात सिंधी समुदायाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.’

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.