AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहिण वाढवणार भावाच्या अडचणी? मुख्यमंत्र्यांच्या बहिणीचा काँग्रेसमध्ये प्रवेश

राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. कधी भाऊ-भाऊ आमने -सामने असतात तर कधी बाप मुलगा आमने सामने असतात. पण आता बहिण आणि भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. कारण नुकतान मुख्यमंत्र्यांच्या बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

बहिण वाढवणार भावाच्या अडचणी? मुख्यमंत्र्यांच्या बहिणीचा काँग्रेसमध्ये प्रवेश
| Updated on: Jan 04, 2024 | 4:16 PM
Share

YS Sharmila in congress : राजकारणात कधीही काहीही होऊ शकते असे म्हटले जाते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांनी गुरुवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यासह त्यांनी आपला पक्ष वायएसआर तेलंगणा काँग्रेसमध्ये विलीन केला. मुख्यमंत्री जगन मोहन वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. बहिणी शर्मिलाच्या काँग्रेस प्रवेशाने भावाच्या अडचणी वाढल्या आहेत.

कोण आहेत वायएस शर्मिला?

YS शर्मिला यांचा जन्म 1974 मध्ये झाला. वडिलांकडूनच राजकारणाचा वारसा त्यांना मिळाला. शर्मिला यांचे वडील राजशेखर रेड्डी हे अविभाजित आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते. 2009 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या निधनानंतर जगन मोहन यांचे पुत्र वायएस जगन मोहन यांना मुख्यमंत्री बनवण्याची चर्चा होती, मात्र तसे झाले नाही.

जगन मोहन रेड्डी यांनी 2012 मध्ये वायएसआर काँग्रेसची स्थापना केली. त्यात काँग्रेसचे काही आमदारही सामील झाले. मात्र, काही महिन्यांनी जगन यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तुरुंगात जावे लागले. त्यावेळी आई विजयम्मा आणि बहीण शर्मिला भावासोबत उभ्या होत्या.

जगन मोहन तुरुंगात गेल्यानंतर शर्मिला यांनी राज्यात नव्याने स्थापन झालेल्या पक्षाला आणखी मजबूत करण्याचे काम केले. त्यांनी हजारो किलोमीटरचा पायी प्रवास केला. पदयात्रेने आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसचा पाठिंबाही वाढवला. त्यावेळी विधानसभेच्या 18 जागांवर पोटनिवडणूक झाली होती, त्यापैकी YSR काँग्रेसने 15 जागा जिंकल्या होत्या. लोकसभेची एक जागाही पक्षाच्या वाट्याला आली. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जगन मोहन यांच्या पक्षाने बंपर जागांसह निवडणूक जिंकली आणि ते मुख्यमंत्री बनले.

जगन मोहन मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे बहिणीशी मतभेद होऊ लागले. 2021 मध्ये त्यांनी आपला नवीन पक्ष YSR तेलंगणा स्थापन केला. त्याची आई विजयम्माही आपल्या मुलाची पार्टी सोडून आपली मुलगी शर्मिलाच्या पार्टीत आली होती.

तेलंगणा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा

नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत शर्मिला यांच्या पक्षाने भाग घेतला नाही आणि काँग्रेसला पाठिंबा दिला. 4 फेब्रुवारीला जेव्हा शर्मिला काँग्रेसमध्ये सामील होत होत्या, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘मी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहे कारण तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जिंकण्याची शक्यता आहे. केसीआर यांनी आपल्या 9 वर्षांच्या कार्यकाळात जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही.

तेलंगणात काँग्रेसने प्रथमच सरकार स्थापन केले आहे. वायएस शर्मिला त्यात सामील झाल्यानंतर शेजारच्या आंध्र प्रदेशात काँग्रेस आपली स्थिती आणखी मजबूत करू शकते.

Follow Us
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा.
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य.
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?.
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला.
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका.
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार.
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले.
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला.