झोपेत असताना साप कधीच जवळ येणार नाही; करा फक्त ही एक सोपी ट्रीक, जंगलांमध्ये लोक असाच वाचवतात आपला जीव
झोपेत असताना सर्पदंश होऊन मृत्यू झालेच्या घटना अनेकदा घडतात. कारण तुम्ही जेव्हा झोपेत असतात, तेव्हा तुम्हाला सर्पदंश झाला आहे, हे लवकर तुमच्या लक्षात येत नाही, त्यामुळे उपचाराला अनेकदा उशिर होतो.

भारतामध्ये दरवर्षी हजारो लोकांचा साप चावल्यामुळे मृत्यू होतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या लोकांना सर्पदंश झाला आहे, त्यापैकी अनेकांना वेळेत उपचार मिळत नाहीत, वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यूची शक्यता वाढते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर सर्पदंशाच्या घटना अधिक वाढतात. विशेष: रात्री झोपेत असताना अनेकदा साप चावल्याच्या घटना घडतात, परंतु झोपेत असल्यामुळे साप चावल्याचं लक्षात येत नाही, त्यामुळे उपचाराला वेळ होतो आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. भारतामध्ये ज्या सापांच्या प्रजाती आढळून येतात, त्यापैकी अवघ्या काही प्रजातीच या विषारी आहेत, यामध्ये मण्यार, फुरसे घोणस आणि नाग ज्याला आपण इंडियन कोब्रा असं म्हणतो. या प्राजी प्रचंड विषारी आहेत. या चारही सापांच्या प्रजाती महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच भागांमध्ये आढळून येतात.
यातील सर्वात घातक आणि धोकादायक सापांची प्रजात म्हणजे मण्यार ही एक सापाची अत्यंत विषारी अशी जात आहे. सापांच्या चाव्यामुळे जेवढे मृत्यू होतात, त्याला सर्वात जास्त हा साप जबाबदार असतो. कारण या सापाचं वैशिष्ट म्हणजे हा साप रात्रीच्यावेळी शिकारीसाठी बाहेर पडतो. अनेकदा तो घरात देखील घुसतो. रात्री तुम्ही झोपेत असताना तो तुमच्या अंथरुणामध्ये देखील घुसू शकतो. जर झोपेत चुकूनही तुमचा स्पर्श या सापला झाला तर धोका समजून तो तुम्हाला दंश करतो. या सापाचं वैशिष्ट म्हणजे याला खूप छोटे दात असतात, त्यामुळे तुम्ही जागे असताना देखील हा साप चावल्याचं तुमच्या लक्षात येत नाही, तर झोपेत लक्षात येण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे अनेकदा माणसाचा झोपेतच मृत्यू होतो.
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अशा सापांपासून वाचण्यासाठी काय करायचं, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कधीही जमिनीवर झोपायचं नाही. पूर्वीच्या काळी लोक झोपण्यासाठी बाज वापरत असतं, त्या पद्धतीची बाज तुम्ही वापरू शकतात. या बाजीच्या चारही पायाला दररोज झोपण्यापूर्वी थोडं रॉकेल किंवा पेट्रोल सारखा पदार्थ लावून झोपायचे, यामुळे दोन फायदे होतात, एक तर पेट्रोल, डिझेलच्या वासामुळे साप आसपास फिरकत नाहीत, दुसरी गोष्ट जरी सापाने वर चढण्याचा प्रयत्न केला तर तो पेट्रोल, किंवा रॉकेलमुळे खाली घसरतो, त्याला वर चढणं शक्यत होत नाही. ग्रामीण भागात आजही अनेकजण सापांपासून बचावासाठी ही ट्रिक वापरताना दिसतात.
