AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी भारतीय जवानांचा सन्मान, ३६ वायू सैनिकांसह १६ बीएसएफ जवानांना वीरता पुरस्कार

ऑपरेशन सिंदूरमध्ये साहस आणि शौर्य दाखवणाऱ्या भारतीय वायू सेनेच्या एकूण ३६ वायूसैनिकांना उद्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने १५ ऑगस्टला वीरता पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यात एक शौर्य चक्र, ९ वीर चक्र आणि २६ वायू सेना मेडल ( गॅलेंट्री ) प्रदान केले जाणार आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी भारतीय जवानांचा सन्मान, ३६ वायू सैनिकांसह १६ बीएसएफ जवानांना वीरता पुरस्कार
operation sindoor
| Updated on: Aug 14, 2025 | 6:45 PM
Share

ऑपरेशन सिंदूरमध्ये साहस आणि पराक्रम दाखवणाऱ्या भारतीय वायू सेनेच्या एकूण ३६ वायू सैनिकांना १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वीरता पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यात विंग कमांडर अभिमन्यू सिंह यांना शौर्य चक्राने गौरवले जाणार आहे. तसेच अन्य ९ जवानांना वीर चक्र पुरस्काराने गौरवले जाणार आहे. यात ४ ग्रुप कॅप्टन, एक विंग कमांडर, तीन स्क्वाड्रन लीडर आणि एका फ्लाईट लेफ्टनंट यांचा समावेश आहे. तर २६ वायू सैनिकांना वायू सेना मेडल ( गॅलेंट्री ) ने सन्मानित केले जाणार आहे.

२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ लोकांची बळी घेतला होता. त्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने मोहिम राबविली होती, ७ ते १० मे दरम्यान राबविलेल्या या मोहिमेत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरात घुसून भारताने ९ अतिरेकी प्रशिक्षण स्थळ उद्धवस्त केले. या ऑपरेशनमध्ये बीएसएफचे दोन जवान शहीद झाले. तर सात जवान जखमी झाले.

शौर्य चक्राने सन्मान

– विंग कमांडर अभिमन्यु सिंह

वीर चक्र सन्मान होणारे जवान

– ग्रुप कॅप्टन: आर. एस. सिद्धू, मनीष अरोरा, अनिमेष पाटणी, कुणाल कालरा

– विंग कमांडर: जॉय चंद्रा

– स्कॉड्रन लिडर: सार्थक कुमार, सिद्धांत सिंह, रिझवान मलिक

– फ्लाईट लेफ्टनंट: ए. एस. ठाकुर

सीमा सुरक्षा दलाच्या १६ जवानांचाही गौरव

पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान अद्वितीय वीरता आणि शौर्याचे प्रदर्शन केल्याबद्दल सीमा सुरक्षा दलाच्या ( बीएसएफ ) १६ कर्मचाऱ्यांनाही वीरता पदकाने गौरवण्यात येणार आहे. ज्या सैनिकांचा यात गौरव होणार आहे त्यात सब इन्स्पेक्टर व्यास देव, कॉन्स्टेबल सुद्दी राभा, अभिषेक श्रीवास्तव, सहायक , सेनानायक आणि कॉन्स्टेबल भूपेन्द्र बाजपेयी यांचा समावेश आहे.

ऑपरेशन सिंदूर साठी या जवानांना वीरता पदक( जीएम ) जाहीर करण्याची घोषणा केंद्र सरकारने ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला करण्यात आली आहे. यातील भारतीय जवानांनी शत्रूचे निगराणी करणारे कॅमेरे नष्ट केले,तर अन्य जवानांनी ड्रोन हल्ल्यांना नाकाम केले.

बीएसएफया निमलष्करी दलाच्या जवानांना देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर सैन्यांच्या परिचालन नियंत्रण अंतर्गत नियंत्रण रेषा ( एलओसी ) शिवाय २,२९० किलोमीटर लांबीच्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा ( आयबी ) सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

येथे पोस्ट पाहा –

या स्वातंत्र्य दिनी १६ बहादूर सीमा प्रहरींना ( सीमा रक्षक ) ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्यांच्या अभूर्तपूर्व साहस आणि अद्वितीय पराक्रमासाठी वीरता पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. बीएसएफने सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले की,’ हे पदक भारत की प्रथम रक्षा पंक्ती : सीमा सुरक्षा बलावरील राष्ट्राचा विश्वास आणि भरवशाचा हे प्रमाण आहे’

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.