AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खूशखबर, मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहचला…महाराष्ट्रात येणार या तारखेला

Monsoon hits Kerala: यंदा मान्सून केरळमध्ये दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. गेल्या २४ तासांपासून केरळमध्ये मान्सूनचा जोरदार पाऊस सुरु आहे. त्यानंतर ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहचल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे.

खूशखबर, मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहचला...महाराष्ट्रात येणार या तारखेला
Follow us
| Updated on: May 31, 2024 | 8:25 AM

गेल्या काही दिवसांपासून देशभरातील तापमान प्रचंड वाढले आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हापासून सुटका देणारी बातमी भारतीय हवामान विभागाने गुरुवारी दिली आहे. यंदा मान्सून केरळमध्ये दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. गेल्या २४ तासांपासून केरळमध्ये मान्सूनचा जोरदार पाऊस सुरु आहे. त्यानंतर ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहचल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. आता महाराष्ट्रात आठवडाभरात मान्सून येणार असल्याची शक्यता आहे.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस

मान्सून केरळमध्ये १ जून रोजी दाखल होत असतो. परंतु यंदा दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. यापूर्वी अंदमान निकोबारमध्ये मान्सून वेळेपूर्वीच १९ मे रोजी दाखल झाला होता. मान्सूनची वाटचाल अशीच सुरु राहिली तर महाराष्ट्रात येत्या आठवडाभरात मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागकडून व्यक्त करण्यात आला आहे. देशभरात यंदा चांगला मान्सून असणार आहे. सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला.

महाराष्ट्रात दिलासा मिळणार

मागील वर्षी देशभरातील अनेक भागांत मान्सूनने सरासरी गाठली नव्हती. महाराष्ट्रात कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळ निर्माण झाला होता. या पावसाचा परिणाम खरीप व रब्बी हंगामावर झाला होता. आता मे महिन्यातच राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठा संपला आहे. यामुळे अनेक शहरांमध्ये पाणी कपात लागू करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मान्सूनची केरळपर्यंत वाटचाल दमदार झाली आहे. मान्सून वेळे आधीच आल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

दिल्लीत 27 जूनपर्यंत मान्सून

अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि आसाममध्ये सामान्य मान्सून ५ जूनपर्यंत येतो. आता तो लवकर येण्याची शक्यता आहे. रविवारी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमधून आलेल्या चक्रीवादळ रेमलने मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागराकडे खेचला होता, परिणामी त्याची सुरुवात ईशान्येकडे झाली. स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले की, 27 जूनपर्यंत दिल्लीत मान्सून होण्याची शक्यता आहे.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.