AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रीम कोर्टाचे दोन कळीचे सवाल, शिंदे गटाच्या वकिलांचं टेन्शन वाढलं; कोर्ट म्हणालं, अपात्रतेची नोटीस मिळताच…

बहुमत चाचणी झाली नाही त्यामुळे अपात्रतेचा मुद्दा आला नाही. 30 जूनला बहुमत चाचणी होणार होती. पण 29 जूनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अध्यक्षांनी कमी वेळ देऊन स्वत:साठी अडचण निर्माण केली.

सुप्रीम कोर्टाचे दोन कळीचे सवाल, शिंदे गटाच्या वकिलांचं टेन्शन वाढलं; कोर्ट म्हणालं, अपात्रतेची नोटीस मिळताच...
eknath shindeImage Credit source: tv9 marathi
Reporter Sandeep Rajgolkar
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: | Updated on: Feb 16, 2023 | 12:28 PM
Share

नवी दिल्ली: शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवरून सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिंदे गटाच्या वकिलांनी राज्यातील सत्तासंघर्षाचा घटनाक्रम मांडतानाच शिंदे गटाची भक्कमपणे बाजू मांडली. यावेळी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी दोन महत्त्वाचे प्रश्न शिंदे गटाच्या वकिलांना विचारले. या अत्यंत कळीच्या मुद्द्याने या प्रकरणाचा रोखच बदलला जाण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा उपाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरही कोर्टाने टिप्पणी केली आहे.

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह यांनी आज युक्तिवाद केला. यावेळी दोन्ही वकिलांनी नबाम रेबिया प्रकरणाचे संदर्भही कोर्टासमोर मांडले. तसेच शिंदे गटाच्या 34 आमदारांच्या जीवाला धोका असल्याने ते आमदार महाराष्ट्रात परतू शकले नाहीत, असा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केला.

शिंदे गटाच्या दोन्ही वकिलांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शिंदे गटाच्या वकिलांना दोन महत्त्वाचे प्रश्न विचारले. अपात्रतेची नोटीस मिळताच अविश्वास प्रस्ताव कसा आला? असा सवाल चंद्रचूड यांनी केला. तसेच नोटीस दिल्यावर तुम्हाला अपात्रच करण्यात आलं असतं असं तुम्हाला का वाटतं? विधानसभा उपाध्यक्ष इतरही कारवाई करू शकले असते, असा सवालही चंद्रचूड यांनी विचारला. त्यामुळे शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे.

अध्यक्षांनी स्वत:चीच अडचण केली

बहुमत चाचणी झाली नाही त्यामुळे अपात्रतेचा मुद्दा आला नाही. 30 जूनला बहुमत चाचणी होणार होती. पण 29 जूनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अध्यक्षांनी कमी वेळ देऊन स्वत:साठी अडचण निर्माण केली. कदाचित राजकीय गरजेपोटी त्यांनी हे केलं असावं, अशी टिप्पणीही कोर्टाने केली आहे.

तर सरकार पडलं असतं

यावेळी शिंदे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनीही जोरदार युक्तिवाद केला. कायदेशीर सरकार पाडण्यात आलं. उपाध्यक्षांनी आमदारांना नोटीस बजावण्याची तत्परता दाखवली. नाही तर सरकार पडलं असतं, असा दावा सिब्बल यांनी केला.

प्रस्ताव नव्हे नोटीस होती

तसेच विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला नव्हता. त्यांना फक्त नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस म्हणजे प्रस्ताव नसतो. तसेच आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये म्हणूनच ही नोटीस देण्यात आली. तीही मेलद्वारे नोटीस देण्यात आली होती, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. तसेच या प्रकरणात नबाम रेबिया केस लागू होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.

अधिकार काढू शकत नाही

शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांनी 179चा दाखला दिला. तसेच आमदारांना लोकशाहीने पाच वर्षाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार अध्यक्ष काढून घेऊ शकत नाही. नोटीस दिल्यावर अध्यक्ष सदस्यांना एक दोन दिवसात अपात्र करतात, असं मनिंदर सिंग यांनी सांगितलं.

Follow Us
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण