AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम बुद्धांचा प्रेम, करुणा, अहिंसा आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगणं आजच्या समाजासाठी आवश्यक, मुख्यमंत्री केसीआर यांचं प्रतिपादन

अडीच हजार वर्षांपूर्वी जागतिक मानवतेला शांततामय सहअस्तित्वाचे तत्त्व देणारे बुद्ध ज्या भूमीवर चालले, त्या भूमीवर राहण्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे, असं मुख्यमंत्री यांनी नमूद केलं.

गौतम बुद्धांचा प्रेम, करुणा, अहिंसा आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगणं आजच्या समाजासाठी आवश्यक, मुख्यमंत्री केसीआर यांचं प्रतिपादन
| Updated on: May 06, 2023 | 2:10 AM
Share

हैदराबाद | “गौतम बुद्धांचा प्रेम, करुणा, अहिंसा आणि निसर्गाशी सुसंगत राहण्याचा मार्ग आजच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचे आचरण करून मानवी जीवन परिपूर्ण बनवता येतं”, असं मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना गौतम बुद्ध जयंती आणि बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री केसीआर यांनी बुद्धाच्या शिकवणी आणि उपक्रमांचे स्मरण केलं.

अडीच हजार वर्षांपूर्वी जागतिक मानवतेला शांततामय सहअस्तित्वाचे तत्त्व देणारे बुद्ध ज्या भूमीवर चालले, त्या भूमीवर राहण्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे, असं मुख्यमंत्री यांनी नमूद केलं. “भगवान बुद्धांनी रंग, जात इत्यादींच्या आधारे भेदभाव आणि द्वेषाच्या विरोधात शिकवलेली सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक तत्त्वे अमर आहेत. जोपर्यंत मानव समाज आहे तोपर्यंत बुद्धाची शिकवण समर्पक राहील” असं केसीआर यांनी सांगितलं.

तेलंगणाच्या भूमीवर बौद्ध धर्माचा प्रसार होणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचंही केसीआर यांनी स्पष्ट केलं. तेलंगणातील सामाजिक जीवन आणि संस्कृतीची मुळे बौद्ध धर्मात आहेत. तेलंगणात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. कृष्णा गोदावरीच्या खोऱ्यात हजारो वर्षांपासून चमकणारे बुद्ध हे आजही त्याचा जिवंत पुरावा आहे”, असे मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितलं.

राज्य सरकारने नागार्जुन सागर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकसित केलेले ‘बुद्धवनम’ जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. “संपूर्ण तेलंगणात पसरलेल्या प्राचीन बौद्ध मंदिरांचे पुनरुज्जीवन करून मध्य तेलंगणात बुद्धाची शिकवण जगासमोर मांडण्याच्या निर्धाराने राज्य सरकारचे उपक्रम सुरू आहेत. तेलंगणातील लोक सर्व क्षेत्रात आनंदाने राहावेत यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे. राज्य सरकार एससी, एसटी, अल्पसंख्याक, महिला, सर्व लोकांच्या विकासासाठी योजना राबवून गौतम बुद्धांच्या आकांक्षांना आदरांजली अर्पण करत आहे”, असंही शेवटी केसीआर म्हणाले.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत