AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम बुद्धांचा प्रेम, करुणा, अहिंसा आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगणं आजच्या समाजासाठी आवश्यक, मुख्यमंत्री केसीआर यांचं प्रतिपादन

अडीच हजार वर्षांपूर्वी जागतिक मानवतेला शांततामय सहअस्तित्वाचे तत्त्व देणारे बुद्ध ज्या भूमीवर चालले, त्या भूमीवर राहण्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे, असं मुख्यमंत्री यांनी नमूद केलं.

गौतम बुद्धांचा प्रेम, करुणा, अहिंसा आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगणं आजच्या समाजासाठी आवश्यक, मुख्यमंत्री केसीआर यांचं प्रतिपादन
| Updated on: May 06, 2023 | 2:10 AM
Share

हैदराबाद | “गौतम बुद्धांचा प्रेम, करुणा, अहिंसा आणि निसर्गाशी सुसंगत राहण्याचा मार्ग आजच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचे आचरण करून मानवी जीवन परिपूर्ण बनवता येतं”, असं मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना गौतम बुद्ध जयंती आणि बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री केसीआर यांनी बुद्धाच्या शिकवणी आणि उपक्रमांचे स्मरण केलं.

अडीच हजार वर्षांपूर्वी जागतिक मानवतेला शांततामय सहअस्तित्वाचे तत्त्व देणारे बुद्ध ज्या भूमीवर चालले, त्या भूमीवर राहण्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे, असं मुख्यमंत्री यांनी नमूद केलं. “भगवान बुद्धांनी रंग, जात इत्यादींच्या आधारे भेदभाव आणि द्वेषाच्या विरोधात शिकवलेली सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक तत्त्वे अमर आहेत. जोपर्यंत मानव समाज आहे तोपर्यंत बुद्धाची शिकवण समर्पक राहील” असं केसीआर यांनी सांगितलं.

तेलंगणाच्या भूमीवर बौद्ध धर्माचा प्रसार होणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचंही केसीआर यांनी स्पष्ट केलं. तेलंगणातील सामाजिक जीवन आणि संस्कृतीची मुळे बौद्ध धर्मात आहेत. तेलंगणात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. कृष्णा गोदावरीच्या खोऱ्यात हजारो वर्षांपासून चमकणारे बुद्ध हे आजही त्याचा जिवंत पुरावा आहे”, असे मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितलं.

राज्य सरकारने नागार्जुन सागर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकसित केलेले ‘बुद्धवनम’ जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. “संपूर्ण तेलंगणात पसरलेल्या प्राचीन बौद्ध मंदिरांचे पुनरुज्जीवन करून मध्य तेलंगणात बुद्धाची शिकवण जगासमोर मांडण्याच्या निर्धाराने राज्य सरकारचे उपक्रम सुरू आहेत. तेलंगणातील लोक सर्व क्षेत्रात आनंदाने राहावेत यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे. राज्य सरकार एससी, एसटी, अल्पसंख्याक, महिला, सर्व लोकांच्या विकासासाठी योजना राबवून गौतम बुद्धांच्या आकांक्षांना आदरांजली अर्पण करत आहे”, असंही शेवटी केसीआर म्हणाले.

Follow Us
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.