AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम बुद्धांचा प्रेम, करुणा, अहिंसा आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगणं आजच्या समाजासाठी आवश्यक, मुख्यमंत्री केसीआर यांचं प्रतिपादन

अडीच हजार वर्षांपूर्वी जागतिक मानवतेला शांततामय सहअस्तित्वाचे तत्त्व देणारे बुद्ध ज्या भूमीवर चालले, त्या भूमीवर राहण्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे, असं मुख्यमंत्री यांनी नमूद केलं.

गौतम बुद्धांचा प्रेम, करुणा, अहिंसा आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगणं आजच्या समाजासाठी आवश्यक, मुख्यमंत्री केसीआर यांचं प्रतिपादन
| Updated on: May 06, 2023 | 2:10 AM
Share

हैदराबाद | “गौतम बुद्धांचा प्रेम, करुणा, अहिंसा आणि निसर्गाशी सुसंगत राहण्याचा मार्ग आजच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचे आचरण करून मानवी जीवन परिपूर्ण बनवता येतं”, असं मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना गौतम बुद्ध जयंती आणि बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री केसीआर यांनी बुद्धाच्या शिकवणी आणि उपक्रमांचे स्मरण केलं.

अडीच हजार वर्षांपूर्वी जागतिक मानवतेला शांततामय सहअस्तित्वाचे तत्त्व देणारे बुद्ध ज्या भूमीवर चालले, त्या भूमीवर राहण्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे, असं मुख्यमंत्री यांनी नमूद केलं. “भगवान बुद्धांनी रंग, जात इत्यादींच्या आधारे भेदभाव आणि द्वेषाच्या विरोधात शिकवलेली सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक तत्त्वे अमर आहेत. जोपर्यंत मानव समाज आहे तोपर्यंत बुद्धाची शिकवण समर्पक राहील” असं केसीआर यांनी सांगितलं.

तेलंगणाच्या भूमीवर बौद्ध धर्माचा प्रसार होणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचंही केसीआर यांनी स्पष्ट केलं. तेलंगणातील सामाजिक जीवन आणि संस्कृतीची मुळे बौद्ध धर्मात आहेत. तेलंगणात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. कृष्णा गोदावरीच्या खोऱ्यात हजारो वर्षांपासून चमकणारे बुद्ध हे आजही त्याचा जिवंत पुरावा आहे”, असे मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितलं.

राज्य सरकारने नागार्जुन सागर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकसित केलेले ‘बुद्धवनम’ जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. “संपूर्ण तेलंगणात पसरलेल्या प्राचीन बौद्ध मंदिरांचे पुनरुज्जीवन करून मध्य तेलंगणात बुद्धाची शिकवण जगासमोर मांडण्याच्या निर्धाराने राज्य सरकारचे उपक्रम सुरू आहेत. तेलंगणातील लोक सर्व क्षेत्रात आनंदाने राहावेत यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे. राज्य सरकार एससी, एसटी, अल्पसंख्याक, महिला, सर्व लोकांच्या विकासासाठी योजना राबवून गौतम बुद्धांच्या आकांक्षांना आदरांजली अर्पण करत आहे”, असंही शेवटी केसीआर म्हणाले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.