AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम बुद्धांचा प्रेम, करुणा, अहिंसा आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगणं आजच्या समाजासाठी आवश्यक, मुख्यमंत्री केसीआर यांचं प्रतिपादन

अडीच हजार वर्षांपूर्वी जागतिक मानवतेला शांततामय सहअस्तित्वाचे तत्त्व देणारे बुद्ध ज्या भूमीवर चालले, त्या भूमीवर राहण्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे, असं मुख्यमंत्री यांनी नमूद केलं.

गौतम बुद्धांचा प्रेम, करुणा, अहिंसा आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगणं आजच्या समाजासाठी आवश्यक, मुख्यमंत्री केसीआर यांचं प्रतिपादन
| Updated on: May 06, 2023 | 2:10 AM
Share

हैदराबाद | “गौतम बुद्धांचा प्रेम, करुणा, अहिंसा आणि निसर्गाशी सुसंगत राहण्याचा मार्ग आजच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचे आचरण करून मानवी जीवन परिपूर्ण बनवता येतं”, असं मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना गौतम बुद्ध जयंती आणि बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री केसीआर यांनी बुद्धाच्या शिकवणी आणि उपक्रमांचे स्मरण केलं.

अडीच हजार वर्षांपूर्वी जागतिक मानवतेला शांततामय सहअस्तित्वाचे तत्त्व देणारे बुद्ध ज्या भूमीवर चालले, त्या भूमीवर राहण्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे, असं मुख्यमंत्री यांनी नमूद केलं. “भगवान बुद्धांनी रंग, जात इत्यादींच्या आधारे भेदभाव आणि द्वेषाच्या विरोधात शिकवलेली सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक तत्त्वे अमर आहेत. जोपर्यंत मानव समाज आहे तोपर्यंत बुद्धाची शिकवण समर्पक राहील” असं केसीआर यांनी सांगितलं.

तेलंगणाच्या भूमीवर बौद्ध धर्माचा प्रसार होणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचंही केसीआर यांनी स्पष्ट केलं. तेलंगणातील सामाजिक जीवन आणि संस्कृतीची मुळे बौद्ध धर्मात आहेत. तेलंगणात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. कृष्णा गोदावरीच्या खोऱ्यात हजारो वर्षांपासून चमकणारे बुद्ध हे आजही त्याचा जिवंत पुरावा आहे”, असे मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितलं.

राज्य सरकारने नागार्जुन सागर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकसित केलेले ‘बुद्धवनम’ जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. “संपूर्ण तेलंगणात पसरलेल्या प्राचीन बौद्ध मंदिरांचे पुनरुज्जीवन करून मध्य तेलंगणात बुद्धाची शिकवण जगासमोर मांडण्याच्या निर्धाराने राज्य सरकारचे उपक्रम सुरू आहेत. तेलंगणातील लोक सर्व क्षेत्रात आनंदाने राहावेत यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे. राज्य सरकार एससी, एसटी, अल्पसंख्याक, महिला, सर्व लोकांच्या विकासासाठी योजना राबवून गौतम बुद्धांच्या आकांक्षांना आदरांजली अर्पण करत आहे”, असंही शेवटी केसीआर म्हणाले.

Follow Us
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका.
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स.
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण.
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो....
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार.
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट....
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.