AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. ट्रायल कोर्टाने 20 जून रोजी मंजूर केलेला जामिनाला स्थगिती दिली आहे. ईडीने ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले होते. केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jun 25, 2024 | 3:38 PM
Share

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. कारण उच्च न्यायालयाने त्यांच्या जामिनाला स्थगिती दिली आहे. ट्रायल कोर्टाच्या आदेशातील अनेक त्रुटींचा हवाला देत ईडीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय. त्यामुळे कथित दारू घोटाळ्यात अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सध्या तुरुंगातच राहावे लागणार आहे.

न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन यांच्या खंडपीठाने ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देऊन २१ जून रोजी निर्णय राखून ठेवला होता. निकाल लागेपर्यंत जामीन आदेशाची अंमलबजावणी केली जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.

ट्रायल कोर्टाचे विशेष न्यायाधीश न्याय बिंदू यांनी 20 जून रोजी केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. त्यावेळी केजरीवाल यांना एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिन देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांना देश सोडून न जाणे आणि साक्षीदार किंवा पुराव्यावर प्रभाव टाकू नये अशा अटींसह हा जामीन देण्यात आला होता. गुरुवारी रात्री आठ वाजताच्या निर्णयानंतर केजरीवाल यांची शुक्रवारी सुटका होणार होती. पण त्यानंतर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला आहे.

अरविंद केजरीवाल यांनीही आता जामिनावरील अंतरिम स्थगितीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, न्यायालयाने त्वरित सुनावणी देण्यास किंवा स्थगिती उठविण्यास नकार देत प्रकरण २६ जूनपर्यंत पुढे ढकलले होते. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचे सांगितले.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना २१ मार्च रोजी कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी न्यायालयाने त्यांना २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. केजरीवाल यांना पूर्वनिर्धारित अटींखाली 2 जून रोजी आत्मसमर्पण केल्यानंतर पुन्हा तुरुंगात जावे लागले. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीसाठी बनवलेल्या अबकारी धोरणात दारू व्यापाऱ्यांना बेकायदेशीर लाभ देऊन लाच घेतल्याचा आरोप आहे आणि त्याचा वापर गोव्याच्या निवडणुकीतही करण्यात आल्याचा आरोप आहे.

Follow Us
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...