AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. ट्रायल कोर्टाने 20 जून रोजी मंजूर केलेला जामिनाला स्थगिती दिली आहे. ईडीने ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले होते. केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका
| Updated on: Jun 25, 2024 | 3:38 PM
Share

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. कारण उच्च न्यायालयाने त्यांच्या जामिनाला स्थगिती दिली आहे. ट्रायल कोर्टाच्या आदेशातील अनेक त्रुटींचा हवाला देत ईडीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय. त्यामुळे कथित दारू घोटाळ्यात अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सध्या तुरुंगातच राहावे लागणार आहे.

न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन यांच्या खंडपीठाने ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देऊन २१ जून रोजी निर्णय राखून ठेवला होता. निकाल लागेपर्यंत जामीन आदेशाची अंमलबजावणी केली जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.

ट्रायल कोर्टाचे विशेष न्यायाधीश न्याय बिंदू यांनी 20 जून रोजी केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. त्यावेळी केजरीवाल यांना एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिन देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांना देश सोडून न जाणे आणि साक्षीदार किंवा पुराव्यावर प्रभाव टाकू नये अशा अटींसह हा जामीन देण्यात आला होता. गुरुवारी रात्री आठ वाजताच्या निर्णयानंतर केजरीवाल यांची शुक्रवारी सुटका होणार होती. पण त्यानंतर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला आहे.

अरविंद केजरीवाल यांनीही आता जामिनावरील अंतरिम स्थगितीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, न्यायालयाने त्वरित सुनावणी देण्यास किंवा स्थगिती उठविण्यास नकार देत प्रकरण २६ जूनपर्यंत पुढे ढकलले होते. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचे सांगितले.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना २१ मार्च रोजी कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी न्यायालयाने त्यांना २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. केजरीवाल यांना पूर्वनिर्धारित अटींखाली 2 जून रोजी आत्मसमर्पण केल्यानंतर पुन्हा तुरुंगात जावे लागले. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीसाठी बनवलेल्या अबकारी धोरणात दारू व्यापाऱ्यांना बेकायदेशीर लाभ देऊन लाच घेतल्याचा आरोप आहे आणि त्याचा वापर गोव्याच्या निवडणुकीतही करण्यात आल्याचा आरोप आहे.

Follow Us
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची...
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची....
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज.
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ.
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार.....
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार......
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात...
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात....
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला.
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्.
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल...
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल....